देशात विद्यार्थी आंदोलनांच्या रूपाने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. युवकांचे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न राहता देशातील अनेक शहरांत पसरले आहे. इतिहासाचा मागोवा घेतला तर विद्यार्थी आंदोलने अनेकदा सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहेत. 1973 मध्ये गुजरातमधील मोरबी महाविद्यालयात भोजनालयाच्या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अल्पावधीतच देशव्यापी जनआंदोलनात रूपांतरित झाले. या आंदोलनामुळे दोन मुख्यमंत्र्यांना पद सोडावे लागले, आणीबाणीच्या घोषणेची पार्श्वभूमी तयार झाली आणि अखेरीस 1977 मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या राजकीय उलथापालथीची प्रक्रिया सुरू झाली. इतिहासातील दोन घटना कधीच तंतोतंत सारख्या नसतात. त्यामुळे सध्याचे आंदोलन कोणत्या दिशेने जाईल, याबाबत आताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. आज रस्त्यावर उतरलेल्या युवकांच्या संतापाकडे दुर्लक्ष झाले. त्यावर तातडीने व प्रभावी उपाय केले नाहीत, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, याचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. डिसेंबर 1973 मध्ये मोरबी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर 40 विद्यार्थ्यांना निलंबित केले गेले. महाविद्यालय अनिश्चित काळासाठी बंद ठेवावे लागले. काही दिवसांतच अहमदाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातही आंदोलन सुरू झाले. जानेवारी 1974 पर्यंत गुजरात विद्यापीठातील विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले. राज्यभरातील विद्यार्थी संघटनांनी तीन दिवसांच्या संपाची हाक दिली. महागाई,भ्रष्टाचाराने आधीच नाराज मध्यमवर्गही आंदोलनात सहभागी झाला. विविध स्थानिक आंदोलने एकत्र येऊन नवनिर्माण समितीच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. या समितीने व्यवस्थेत व बदलांची मागणी केली. मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. गुजरात विधानसभा बरखास्त केली. नव्याने निवडणुका घेण्यात आल्या. काँग्रेसचे (ओ) ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)ही या आंदोलनात सहभागी झाली होती. या आंदोलनामुळे राज्यात जनसंघ (भाजपचे पूर्वरूप) बळकट होण्यास मोठी मदत झाली. सुरुवातीला जनसंघ बिगर काँग्रेस आघाड्यांचा भाग बनला . अखेरीस 1995 मध्ये भाजपने स्वतःच्या बळावर गुजरातमध्ये सत्ता मिळवली. त्यानंतर आजपर्यंत पक्ष सत्तेबाहेर गेलेला नाही. 1974 मध्ये जयप्रकाश नारायण गुजरातमध्ये आले. तेथील आंदोलनातून प्रेरणा घेऊन त्यांनी बिहारमध्ये काँग्रेस सरकारविरोधात व्यापक आंदोलन उभे केले. त्यात लालू यादव आणि नितीश कुमार यांसारखे युवा विद्यार्थी नेते सहभागी झाले. पुढील अनेक दशकांपर्यंत त्यांनी बिहारच्या राजकारणात वर्चस्व राखले. अखेरीस मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांचे सरकारही सत्तेबाहेर गेले. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे आंदोलन गुजरात,बिहारच्या सीमांपलीकडे जाऊन केंद्र सरकारविरोधातील व्यापक जनआंदोलन बनले. त्याच काळात जेपी यांनी ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा दिली. सुरुवातीला जंतर-मंतरवरील आंदोलन आणि त्यानंतर लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सहभागानंतरही हे आंदोलन फार प्रभाव न टाकता संपेल, असे अनेकांना वाटत होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आयोजित ‘संसद चलो’ मोर्चात दिल्लीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोक उतरले. त्यानंतर या आंदोलनात विद्यार्थीच नव्हे, तर इतर अनेक घटक सहभागी झाले. मुलांच्या भवितव्याची चिंता असलेले पालक, उच्च शिक्षणाच्या संधींबाबत चिंतित शालेय विद्यार्थी, युवकांना पाठिंबा देणारे ज्येष्ठ नागरिक, ऑटोचालक, बेरोजगार तरुण, विविध सामाजिक स्तरांतील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. हे आंदोलन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्याला अजून स्पष्ट, संघटित स्वरूप मिळायचे आहे. या आंदोलनाला स्वतःचा ‘जेपी’ मिळालेला नाही. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होण्यापूर्वी परिस्थिती हाताळण्याची संधी सरकारकडे आहे. इतिहासातून एखादा धडा घ्यायचा असेल, तर जनतेच्या संतापाकडे दुर्लक्ष करणे ही राजकीयदृष्ट्या शहाणपणाची बाब ठरत नाही. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) इतिहासातून धडा घेणे महत्त्वाचे...1974 मध्ये जयप्रकाश नारायण गुजरातेत आले होते. तेथील नवनिर्माण आंदोलनातून प्रेरणा घेत त्यांनी बिहारमध्ये काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन केले. त्यात लालू यादव , नितीश कुमार यांसारखे विद्यार्थी नेते तयार होऊन त्यांनी बिहार राजकारणावर प्रभाव गाजवला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार; सुरक्षारक्षकाकडूनच चालली होती ड्रग्जची तस्करी, नशेच्या गोळ्यांसह चरस जप्त
- मुंबई: थलपती विजयच्या 'जन नायकन'ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
- नाशिक: विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २० लाखांचा संशयास्पद व भेसळयुक्त माल जप्त
- नागपुर: सोन्या-चांदीत गुंतवणुकीचे भरघोस आमिष दाखवून कंत्राटदाराला ३६ लाखांनी गंडा
महाराष्ट्र
- नागपूर: मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार; सुरक्षारक्षकाकडूनच चालली होती ड्रग्जची तस्करी, नशेच्या गोळ्यांसह चरस जप्त
- गडचिरोली: बॅटरीशी खेळताना झालेल्या भीषण स्फोटात १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
- मुंबई: थलपती विजयच्या 'जन नायकन'ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
- नाशिक: विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २० लाखांचा संशयास्पद व भेसळयुक्त माल जप्त
गुन्हा
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"

























Subscribe to my channel




