अटल पेन्शन योजना (APY) 2015 मध्ये सुरू करण्यात आली. खाजगी असंघटित किंवा छोट्या व्यवसायात काम करणारी अशी लोकं ज्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्थिर स्रोत नाही अशांसाठी सरकार अटल योजना स्किम आणली आहे. या लोकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन मिळविण्यासाठी व्यक्तींना त्यांच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये दरमहा पगारातून लहान रक्कम गुंतवावी लागते. ही योजना बरीच फायदेशीर असली तरी ती प्रत्येकासाठी योग्य नाही.
या योजनेसाठी सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने हे निकष पूर्ण केले नाहीत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर अटल पेन्शन योजनेच्या लाभांसाठी कोण पात्र नाही आणि त्यामागील कारणे काय आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
अटल पेन्शन योजनेचे फायदे कोण घेऊ शकत नाहीत?
1. निर्धारित वयोमर्यादे बाहेरचे लोकं – अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी एक विशिष्ट वयोमर्यादा आहे. जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. सरकारचा असा विश्वास आहे की या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्हणून, ही योजना फक्त 18 ते 40 वयोगटातील नियमित योगदान देऊ शकणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही निर्धारित वयोमर्यादेबाहेर असाल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
2. इनकम टॅक्स भरणारे – जर तुम्हाला टॅक्स भरावा लागत असेल, म्हणजेच तुम्ही कर भरता असाल तर तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी पात्र राहणार नाही. कारण सरकारने ही योजना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुरू केली आहे. जे व्यक्ती सामान्यतः कर भरत नाहीत आणि त्यांना भविष्यातील पेन्शन लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे. मात्र करदात्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
3. बँक खाते नसलेली लोकं – अटल पेन्शन योजना (APY) ही पूर्णपणे बँक-लिंक्ड योजना आहे. जर तुमचे बँक खाते नसेल किंवा तुमचे खाते आधारशी जोडलेले नसेल, तर तुम्ही या योजनेत नोंदणी करू शकत नाही. कारण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी व्यक्तीच्या मासिक पगारातून बँक खात्यातून थेट पैसे कापले जाते आणि तुमचे पेन्शन त्याच खात्यात जमा केले जाते. म्हणून, बँक खाते असणे अनिवार्य आहे.
4. भारतीय नागरिक नसलेले – अटल पेन्शन योजना (APY) फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. परदेशी नागरिक या योजनेचे फायदे घेऊ शकत नाहीत.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत काय उपलब्ध आहे?
या योजनेसाठी पात्र असलेल्यांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर निश्चित मासिक पेन्शन मिळते. पाच पेन्शन पर्याय आहेत: दरमहा 1 हजार रूपये दरमहा 2 हजार रूपये, दरमहा 3 हजार रूपये, दरमहा 4 हजार रूपये आणि दरमहा 5 हजार रूपये इतकं आहे. तुम्ही तुमच्या गरजा आणि क्षमतांनुसार कोणताही पेन्शन प्लॅन निवडू शकता.
किती गुंतवणूक आवश्यक आहे?
या योजनेतील गुंतवणूक रक्कम तुमच्या वयावर आणि निवडलेल्या पेन्शनवर अवलंबून असते. जर एखादी व्यक्ती 18 व्या वर्षी सामील झाली आणि तिला 5 हजार रुपये पेन्शन हवे असेल तर तिला दरमहा अंदाजे 210 रुपये गुंतवावे लागतील. दरम्यान जर एखादी व्यक्ती 30 व्या ही योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरूवात केली असेल तर तिला 5 हजार रुपये पेन्शनसाठी दरमहा अंदाजे 577 रुपये जमा करावे लागतील. जितक्या लवकर तुम्ही योजनेचा लाभ घ्याल तितकी कमी गुंतवणूक करावी लागेल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



