
Mumbai : महाराष्ट्रातील उष्णतेचा पारा वाढण्यास आता सुरुवात झाली आहे. काल 4 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता होती आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळाली. तर विदर्भातील अकोल्यात 38 अंशांपर्यंत सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं असून, तीव्र उन्हाचा तडाखा आजही जाणवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पूर्वसूचनांमुळे सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
उष्णतेचा यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल 33-37 अंश सेल्सियस, किमान 22-22 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य तीकाळजी घ्यावी. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत भट्टीची जाणीव
उन्हाळ्याची सुरुवातच मुंबईकरांसाठी उन्हाच्या तडाख्याने झाली आहे. सांताक्रूझ येथे बुधवारी 38.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे 35.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यात कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक तापमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईमध्ये बुधवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 5.7 अंशांनी, तर कुलाबा येथे 4.5 अंशांनी अधिक होता. डहाणू येथे 6.2, तर अलिबाग येथे 4.2 अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. कोकण विभागात पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना आज, गुरुवारीही उष्ण आणि आर्द्र वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये बुधवारच्या तुलनेत आज, गुरुवारी तापमानाचा ताप किंचित कमी होऊ शकेल.
किमान तापमानाचा पाराही चढा
24 तासांमध्ये तापमानाचा पारा एकाएकी चढल्याने मुंबईकरांना झळांची तीव्रता अधिक जाणवली. दुपारी उशिरापर्यंत मुंबईकरांनी गरम झळांची जाणीव होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. आर्द्रता वाढल्याने किमान तापमानाचा पाराही चढा होता. कुलाबा येथे काल बुधवारी 24 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले, तर सांताक्रूझ येथे 22.6 किमान तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवर अनुक्रमे 2.3 आणि 2.6 अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा किमान तापमान अधिक असल्याची नोंद झाली. डहाणू येथे किमान तापमान सरासरीपेक्षा 3.2 अंशांनी अधिक होते. प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणारे वारे यामुळे कोकण विभागातील तापमान आणि आर्द्रता वाढली. ही प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आज, गुरुवारपर्यंत थोडी दूर जाईल. त्यामुळे मुंबईमध्ये उष्मा कमी जाणवेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी वर्तवला.
शहर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
महाराष्ट्र
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- अमरावती: पेपरफुटीने संतापला युवा वर्ग! अमरावतीत MPSC विरोधात शेकडोंचा 'आक्रोश मोर्चा'; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
- पुणे: भीमाशंकरवाडीतील ९६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून हिरवा कंदील, प्रत्येकाला मिळणार ५०० चौरस फुटाचा भूखंड
- यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!





























Subscribe to my channel




