न्यायालयांमध्ये एआय वापरासाठी सर्वोच्चन्यायालयाने नियमांचा मसुदा जारी केला आहे. परंतुखटल्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या न्यायालयांमध्येएआयच्या तात्पुरत्या वापरामुळे अडचणी आणि वाद वाढूशकतात. याच्याशी संबंधित 4 पैलू असे : 1. संविधानाच्या अनुच्छेद-145 नुसार सर्वोच्चन्यायालयाला नियम बनवण्याचा अधिकार आहे.त्याअंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालय नियम 2013 लामंजुरी दिली होती. परंतु एआयच्या मसुद्यात हे नियमकोणत्या कायद्यानुसार बनवले आहेत हे लिहिलेले नाही.जिल्हा न्यायालये राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या अधीनअसतात. परंतु उच्च न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन मानले जात नाही. अखिल भारतीय न्यायिकसेवेच्या स्थापनेमुळे मोठ्या प्रमाणावर न्यायालयीनसुधारणा होऊ शकते. परंतु त्यासाठीही सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन आदेश जारी करत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय आदेशाने उच्च न्यायालयेआणि जिल्हा न्यायालयांमध्ये एआय लागू केल्यासघटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. 2. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसारएआयला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे ॲडव्होकेट्सॲक्टअंतर्गत एआयद्वारे तयार केलेल्या कोणत्याहीचुकीच्या माहितीसाठी वकीलच जबाबदार असतील.भारतात अद्याप डेटा सुरक्षा कायदा आणि त्यासंबंधीचेनियम लागू झालेले नाहीत. प्रलंबित, जुन्या प्रकरणांमधीलकोट्यवधी लोकांच्या संवेदनशील न्यायालयीन आणिखासगी डेटाचा एआयच्या माध्यमातून व्यावसायिक वापरकरणे घटनाबाह्य ठरेल. यापूर्वी वादी-प्रतिवादी आणिवकिलांची संमती आवश्यक आहे. अनेक न्यायाधीशांनीएआयच्या गैरवापरामुळे वाढणाऱ्या अराजकतेबद्दल चिंताव्यक्त केली आहे. पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने सर्वजिल्हा न्यायालयांना आदेश दिला आहे की, एआयप्लॅटफॉर्मचा वापर कायदेशीर संशोधन आणि न्यायालयीननिकालांमध्ये करता येणार नाही. 3. कोरोनाच्या काळात न्यायालयांमध्ये घाईघाईनेऑनलाइन सुनावणी आणि खटल्यांचे थेट प्रक्षेपण सुरूझाले होते. परंतु 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचेसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निकालानुसार अद्यापनियमांमध्ये आवश्यक ते बदल झालेले नाहीत.न्यायालयीन सुनावणीच्या डेटाचा व्यावसायिक वापररोखण्यासाठी स्पष्ट नियम नसल्याने न्यायालयीनप्रशासनावरील हल्ले वाढत आहेत. न्यायालयांमध्येव्हॉट्सॲप, झूम आणि यूट्यूबसारख्या परदेशीप्लॅटफॉर्मच्या असुरक्षित वापराविरोधात संघ विचारक के.एन. गोविंदाचार्य यांनी याचिका दाखल केली होती.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले होते की, दोन वर्षांच्याआत स्वदेशी टेक प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. मात्रअद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 4. एआयचे सर्व मोठे प्लॅटफॉर्म परदेशी आहेत.भारताच्या बँकिंग प्रणालीला मायथोससारख्या एआयच्यासुनामीपासून वाचवण्यासाठी अर्थमंत्री चिंतेत आहेत.एआयचा गैरवापर रोखण्यासाठी आयटी ॲक्टमध्येही स्पष्टतरतुदी नाहीत. मसुद्यात डेटाची सुरक्षा आणि तक्रारनिवारणाच्या आवश्यक तरतुदी नसल्याने जिल्हान्यायालयांमध्ये वकील आणि न्यायाधीशांच्या अडचणीवाढू शकतात. पंतप्रधानांनी तंत्रज्ञान आणि एआयच्यावापरातून गरीब कैद्यांची सुटका आणि खटल्यांच्याओझ्यातून मुक्तीचे आवाहन केले होते. परंतु सर्वोच्चन्यायालयाच्या मसुद्यात एआयच्या माध्यमातून न्यायालयीनसुधारणा, छोट्या खटल्यांचा जलद निपटारा आणिसर्वसामान्यांना लवकर न्याय देण्याचा रोडमॅप नाही. जिल्हान्यायालयांमध्ये पाणी, स्वच्छतागृह आणि बसण्याचीप्राथमिक सुविधाही नाही. मग एआयसाठी पायाभूतसुविधा कशा विकसित होतील? एआयच्या संस्थात्मकवापरासाठी न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या पाचही स्तंभांशी-जनता, सरकार, न्यायालयीन प्रशासन, वकील आणिन्यायाधीशांशी विचारविनिमय करणे गरजेचे आहे.त्यानुसारच संसदेत कायदा तयार व्हावा आणि सर्वोच्चन्यायालय व उच्च न्यायालयांच्या नियमांमध्ये बदलव्हावेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अद्याप डेटा सुरक्षा कायदा आणित्यासंबंधीचे नियम लागू झालेले नाहीत.प्रलंबित, जुन्या प्रकरणांमधील कोट्यवधीलोकांच्या संवेदनशील खासगी डेटाचाएआयच्या माध्यमातून व्यावसायिकवापर करणे घटनाबाह्य ठरेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


