लग्न ठरत असताना किंवा लग्न ठरल्यानंतर मुली अनेक स्वप्न रंगवतात असतात. लग्न म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. कारण त्या एका दिवसानंतर सर्वकाही बदलून जातं…पण भारतात असं एक ठिकाण आहे, जिथे घरातील सर्व भावांसोबत एक मुलगी लग्न करते. भारतातील विवाह पद्धतींची विविधता जगभरात ज्ञात आहे. अशीच एक अनोखी आणि फार कमी लोकांना माहिती नसलेली परंपरा सध्या सर्वत्र चर्चेत आहे, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात. विशेष म्हणजे हे लग्न पूर्णपणे परस्पर संमतीने केले जाते आणि स्थानिक रीतिरिवाजांनुसार ते वैध मानले जाते. असे लग्न भारतात कुठे आणि का होतात… जाणून घ्या…
सर्व भावांनी एकाच मुलीशी लग्न करण्याची ही परंपरा प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात दिसून येते. काही काळापूर्वी हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स गिरी भागात दोन भावांनी एकाच मुलीशी लग्न केले. पारंपारिक विधींनुसार हा विवाह सोहळा पार पडला आणि त्यांच्या विवाहासाठी सर्व सहभागी लोकांची स्पष्ट संमती होती.
हिमाचल प्रदेशातील हट्टा जमातीच्या काही भागात अजूनही या प्रकारची विवाह प्रथा पाळली जाते. स्थानिक भाषेत या विवाहांना “जजदा लग्न” असे देखील म्हणतात. सिरमौर जिल्ह्याव्यतिरिक्त, अशी परंपरा ऐतिहासिकदृष्ट्या जौनसर-बावर (उत्तराखंड) आणि किन्नौर प्रदेशात देखील दिसून येते.
या परंपरेमागील मुख्य कारण म्हणजे कुटुंबाची जमीन आणि मालमत्तेचे विभाजन टाळणे असे मानले जाते. डोंगराळ भागात लागवडीयोग्य जमीन मर्यादित असल्याने, मालमत्ता एकाकडेच टिकवून ठेवण्यासाठी असे विवाह केले जात होते. लग्नानंतर, संपूर्ण कुटुंब संयुक्तपणे मुलीची जबाबदारी स्वीकारते.
या विवाह पद्धतीत, मोठा भाऊ हा सहसा मुलाचा कायदेशीर पिता मानला जातो. परिसरातील वडीलधारी आणि समाजातील ज्येष्ठ सदस्यांच्या मते, हे सर्व संबंध परंपरा आणि परस्पर संमतीच्या आधारावर स्थापित केले जातात.
पण, 1970 आणि 1980 च्या दशकापासून अशा विवाहांची प्रथा लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. आधुनिक शिक्षण, कायदेशीर जागरूकता आणि सामाजिक बदलांमुळे असे विवाह आता दुर्मिळ झाले आहेत. आजकाल, या प्रकारच्या लग्नांचे सार्वजनिकरित्या प्रसारण क्वचितच केले जाते आणि त्यांची संख्या देखील अत्यंत मर्यादित आहे.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




