जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी चीनने कोणती जागा निवडली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ही जागा जगातील सर्वात गुंतागुंतीच्या भू-राजकीय आणि भूकंपाच्या दृष्टीने अस्थिर असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारताच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर, तिबेटमध्ये चीन यार्लंग त्सांगपो नदीवर एका अभूतपूर्व प्रकल्पाची उभारणी करत आहे. ही जगातील सर्वाधिक उंचावरून वाहणारी प्रमुख नदी आहे. भारतात याच नदीला आपण ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणतो. वीजनिर्मिती क्षमतेच्या बाबतीत हे महाकाय धरण चीनच्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणालाही खूप मागे टाकेल. सध्या हेच जगातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या जलाशयामुळे भारताचा ईशान्य भाग आणि त्रिभुज प्रदेश (डेल्टा) असलेल्या बांगलादेशात राहणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या डोक्यावर पाण्याचा एक प्रचंड मोठा साठा रोखून ठेवला जाईल. याबाबत सर्वात चिंताजनक इशारे परदेशी टीकाकारांकडून नव्हे, तर खुद्द चीनच्याच वैज्ञानिकांकडून दिले जात आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात बांधकाम सुरू असलेल्या जागेवरील गंभीर भूगर्भीय धोके नमूद करण्यात आले आहेत. भूवैज्ञानिकांचा निष्कर्ष असा आहे की, येथील भौगोलिक रचना अतिशय नाजूक आहे. त्यांनी असा इशारा दिला आहे की, येथे येणारे भूकंप मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवू शकतात. कारण यामुळे जलाशय आणि आजूबाजूच्या पायाभूत सुविधा, अशा दोन्ही गोष्टी धोक्यात येऊ शकतात. आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी जलाशयाचे उतार मजबूत करावेत, संरक्षक भिंती बांधाव्यात आणि प्रकल्पाच्या प्रमुख भागांची नव्याने रचना करावी, अशी शिफारस या शोधनिबंधाच्या लेखकांनी केली आहे. जेव्हा एखाद्या कम्युनिस्ट राजवटीखाली काम करणारे वैज्ञानिक असे इशारे देतात, तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. हे नवीन धरण ब्रह्मपुत्रा नदीच्या ‘ग्रेट बेंड’वर बांधले जात आहे. या ठिकाणी, भारतात प्रवेश करण्यापूर्वी ही नदी जगातील सर्वात खोल आणि सर्वात लांब दरीतून तीव्र उतारावरून खाली येते. हे ठिकाण हिमालयाच्या भूकंपप्रवण पट्ट्याच्या अगदी मध्यभागी स्थित आहे. हा पट्टा भारतीय आणि युरेशियन भूगर्भीय-थर (टेक्टोनिक प्लेट्स) संथ गतीने होणाऱ्या धडकेमुळे तयार झाला आहे. हा पृथ्वीवरील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक भाग आहे. येथे विनाशकारी भूकंप येण्याचा जुना इतिहास आहे. केवळ भूकंपाने एखाद्या धरणाचे नुकसान होऊ शकते, एवढाच धोका नाही, तर एक महाकाय जलाशय स्वतःच भूगर्भीय दबाव वाढवून भूकंपाला निमंत्रण देऊ शकतो. याचे एक संभाव्य उदाहरण चीनमध्येच पाहायला मिळाले होते. 2008 मध्ये तिबेटच्या पठाराच्या पूर्व सीमेवर आलेल्या भूकंपामुळे अनेक लोक मारले गेले. यात सर्वाधिक लोक सिचुआन प्रांतातील होते. एका महत्त्वपूर्ण संशोधनाचा निष्कर्ष असा होता की, बहुधा नवीन ‘जिपिंगपू’ धरणातील पाण्याच्या प्रचंड वजनामुळे खालील भूस्तरातील भेगेवर दबाव वाढला असावा आणि कदाचित त्यामुळेच अनेक दशके किंवा शतके आधीच तो भूकंप आला असावा. पण या वैज्ञानिक शक्यतेचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी चीनने त्याहूनही मोठा धरण प्रकल्प सुरू केला आहे. तोही यापेक्षा अधिक नाजूक भूगर्भीय क्षेत्रात. मात्र, हिमालयातील परिसंस्था राष्ट्रीय सीमा मानत नाही आणि एखादे मोठे धरण फुटल्यास त्याचे परिणामही सीमा मानणार नाहीत. 2025 मध्ये म्यानमारमध्ये आलेला शक्तिशाली भूकंप, हा भूकंपप्रवण भाग एकमेकांशी किती जोडलेला आहे, याचाच पुरावा होता. त्याचे धक्के सुमारे 1,000 किलोमीटर दूर बँकॉकपर्यंत जाणवले होते आणि तिथे एक उंच इमारत कोसळली होती. ब्रह्मपुत्रा ही ईशान्य भारताची जीवनरेखा आहे. ती लाखो लोकांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. बांगलादेशात हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे स्रोत आहे. चीनने मेकाँग नदीवर बांधलेल्या महाकाय धरणांप्रमाणेच या महाकाय धरणामुळेही (सुपर-डॅम) नदीचा प्रवाह बदलण्याचा धोका आहे. तसेच, पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेला गाळ खालच्या भागापर्यंत पोहोचण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपत्कालीन स्थितीत जलाशयातील साठवलेले पाणी सोडल्यास, दाट लोकवस्ती असलेल्या सखल मैदानी प्रदेशात विनाशकारी महापूर येऊ शकतो. तिबेटमधील अभियांत्रिकीच्या एका चुकीमुळे सुरू होणारी घटना बांगलादेशापर्यंत पसरणाऱ्या मानवी शोकांतिकेत बदलू शकते. चीनने पाण्याला राजनैतिक दबावाचे आणखी एक शस्त्र बनवले आहे.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) हिमालयातील परिसंस्था राष्ट्रीय सीमा मानत नाही; आणि एखादे मोठे धरण फुटल्यास त्याचे परिणामही सीमा मानणार नाहीत. 2025 मध्ये म्यानमारमध्ये आलेला भूकंप हा भूकंपप्रवण भाग एकमेकांशी किती जोडलेला आहे, याचाच पुरावा होता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
- मुंबई: ठाण्यातील स्टेजवर मोठा प्रसंग एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट, आमदार प्रताप सरनाईकांनी तातडीने आग केली विझवली!
महाराष्ट्र
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- सातारा: मी कायमचा निरोप घेतोय.. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील लिपिक कामाच्या ताणामुळे रात्रभर बेपत्ता झाल्याने खळबळ, नंतर आला समोर!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती


























Subscribe to my channel




