काही दिवसांपूर्वी पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात तरुण महिलांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात आदर्श स्त्रीला तीन वर्गांत विभागले जाते. तिला मुलगी, पत्नी, आई म्हणूनच पाहिले जाते. राहुल पुढे म्हणाले की, यापैकी कोणत्याही एका भूमिकेत पाहिले जाण्यात काहीही गैर नाही, परंतु हीच तुमची एकमेव ओळख असू शकत नाही. अनेक महिला उत्तम व्यावसायिक असतात. त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्ने या पारंपरिक भूमिकांच्या पलीकडे असतात. मात्र, आपले ध्येय गाठण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकदा अडथळ्यांनी भरलेला असतो. हे अडथळे समाज आणि समाजाला चालवणारी विचारसरणी त्यांच्यासमोर उभी करते. या अडथळ्यांविरुद्ध आणि या विचारसरणीविरुद्ध लढणे आणि त्यांना दूर करणे गरजेचे आहे. उपस्थित महिलांच्या जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात राहुल यांचा शेवटचा संदेश होता: ‘पिंजरा तोडा, पितृसत्ता संपवा.’ आतापर्यंत अशा प्रकारच्या गोष्टी जगभरातील शैक्षणिक सेमिनार आणि परिषदांमध्ये सतत ऐकायला मिळत होत्या. पण पहिल्यांदाच या गोष्टींना भारतातील मुख्य प्रवाहातील राजकारणात आणले गेले आहे. अमेरिकेतील ‘आयव्ही लीग’ विद्यापीठांमध्ये ‘मागा’ विचारसरणीचा खूप कमी किंवा अजिबात प्रभाव दिसत नाही. भारतातही ‘जेएनयू’ला अनेकदा वेगळेच जग मानले गेले आहे. केरळ किंवा बंगाल (जेव्हा राज्यात सीपीएमचे सरकार होते) सोडले, तर ‘जेएनयू’च्या राजकीय संस्कृतीचा राष्ट्रीय मुख्य प्रवाहाशी फारच कमी संबंध राहिला आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा (आणि सोशियोलॉजी) इतिहासही काहीसा असाच राहिला आहे. मुख्य प्रवाहातील राजकारणात त्यांची भूमिका क्वचितच त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या बरोबरीची राहिली असेल. म्हणूनच, राहुल गांधींचे पितृसत्तेविरुद्धचे पाऊल नवीन आणि वेगळे आहे. ‘पितृसत्ता संपवा’ हे आवाहन वरून लादलेली बौद्धिक चर्चा मानली जाऊ नये आणि तिचा महिलांच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नाही असे वाटू नये, याची खात्री करण्यासाठी पुण्यात राहुल यांची मांडणी खूप वेगळी होती. त्यांनी हे विवेचन एका मोठ्या जन-कार्यक्रमासारखे मांडले. मंचावर अनेक तरुण महिलांना बोलावण्यात आले होते. यापैकी जवळपास सर्व जणी विद्यार्थिनी होत्या किंवा नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुण महिला होत्या. त्यांनी त्यांचे शिक्षण आणि इतर ध्येयांबद्दल सांगितले. तसेच, त्यांना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो, यावरही त्यांनी भाष्य केले. यात शहर आणि गाव अशा दोन्ही ठिकाणांहून आलेल्या महिला होत्या. त्या विविध भषा उत्तम बोलत होत्या. काही उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या; एक आदिवासी महिला होती आणि एक महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातील सफाई कर्मचाऱ्याची मुलगी होती. या सफाई कर्मचाऱ्याच्या मुलीने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधून शिक्षण घेतले होते. तिला पत्रकार व्हायचे आहे, परंतु तिला वारंवार सांगितले जाते की ती पत्रकार होऊ शकत नाही, तिने लग्नाचा विचार केला पाहिजे. सर्व महिलांनी आपली बाजू अशा प्रकारे मांडली की दैनंदिन जीवनावर पितृसत्तेचा होणारा वाईट परिणाम समजून घेता येईल. त्यांनी सांगितले की, गावाबाहेरील शाळांमध्ये जाणे किती कठीण आहे; सार्वजनिक वाहतूक किती असुरक्षित आहे, मग बसेस भरलेल्या असोत किंवा रिकाम्या; सोशल मीडियाचा वापर त्यांना लाजवण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कसा केला जातो, केवळ लिहून ट्रोल करण्याच्या माध्यमातून नव्हे, तर फोटो आणि व्हिडिओमध्ये छेडछाड करूनही त्रास दिला जातो. महिला वकिलांना कमी लेखण्याच्या विचारसरणीमुळे कायदेशीर प्रकरणे पात्रतेच्या आधारावर नाही, तर लिंगभेदाच्या आधारावर दिली जातात. तसेच, नागरिक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्यावर त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ कशी नोंदवली जाते आणि महिलांना अभिव्यक्तीचे इतके स्वातंत्र्य दिले जाऊ शकत नाही, असे कसे ऐकवले जाते. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ एखादा विचार उदाहरणांद्वारे समजावून सांगणे एवढाच नव्हता. या प्रयत्नामागील हेतू अत्यंत सखोल आणि राजकीय होता. बंगालमधील विजयानंतर भाजपचा राजकीय प्रभाव खूप वाढला होता. पण कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आंदोलनाने- विशेषतः जंतरमंतरवरील निदर्शनांनी- देशातील राजकीय चर्चेची दिशा बदलून टाकली आहे. याच संधीचा फायदा घेत राहुल गांधी राजकीय चर्चेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 2027 मध्ये अनेक विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि विद्यार्थी व महिला हा नक्कीच एक महत्त्वाचा मतदार गट आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आतापर्यंत ज्या प्रकारच्या गोष्टी शैक्षणिक चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये ऐकायला मिळायच्या, त्या पहिल्यांदाच मुख्य प्रवाहातील राजकारणात आणल्या गेल्या आहेत. ‘पितृसत्ता संपवा’ या संदेशाचा महिलांवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
- मुंबई: ठाण्यातील स्टेजवर मोठा प्रसंग एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट, आमदार प्रताप सरनाईकांनी तातडीने आग केली विझवली!
महाराष्ट्र
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- सातारा: मी कायमचा निरोप घेतोय.. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील लिपिक कामाच्या ताणामुळे रात्रभर बेपत्ता झाल्याने खळबळ, नंतर आला समोर!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती


























Subscribe to my channel




