प्रो. मनोज कुमार झा यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎बोलण्याची शैली सुसंस्कृत असल्यास कठोर मतही सन्मानाने मांडता येते‎

लोकशाही केवळ मतदान, सरकार किंवा सत्तांतर‎यापुरती मर्यादित नसते. ती सतत सुरू राहणारी संवादाची‎ प्रक्रिया असते. या प्रक्रियेत सहमतीइतकेच‎ असहमतीलाही स्थान असते. मात्र संवादात संयम,‎संवेदनशीलता आणि परस्परांविषयी आदर टिकून राहतो,‎तेव्हाच तो सशक्त राहतो. भाषेत अपमान, कटुता व‎उत्तेजना असते तेव्हा विरोध हळूहळू वैरात रुपांतरित ‎होतो.‎ सध्या भारतीय सार्वजनिक जीवनात हीच सर्वात मोठी‎चिंता बनली आहे. संसद असो, टीव्हीवरील चर्चासत्रे‎असोत, निवडणूक सभा असोत किंवा सोशल‎मीडियावरील चर्चा — सर्वत्र भाषेतील संयम कमी‎होताना दिसतो. विचारांपेक्षा उपरोधिक टीका, तर्कांपेक्षा‎टोमणे आणि संवादापेक्षा गोंधळ अधिक वाढताना‎दिसतो. त्यामुळे लोकशाही ही विचारमंथनाचे व्यासपीठ न‎राहता केवळ आक्रमक प्रदर्शनाचे माध्यम बनत‎असल्याची भावना निर्माण होते. भारतीय लोकशाही‎परंपरेत मतभेदांना नेहमीच सन्मानाने व्यक्त करण्याची‎संस्कृती राहिली आहे. एखाद्या धोरणावर कठोर टीका‎होऊ शकते.‎ एखाद्या विचारसरणीशी तीव्र असहमती असू शकते; परंतु‎व्यक्तीच्या सन्मानावर हल्ला करणे ही लोकशाही संस्कृती‎मानली जात नाही. असहमती ही लोकशाहीची ताकद‎आहे तर अपमान हा तिच्या आत्म्याला धक्का देणारा‎प्रकार ठरतो.आजचा विरोधाभास असा आहे की‎सार्वजनिक जीवनात भाषेचा उद्देश समजावून‎सांगण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला हरवणे हा अधिक झाला आहे.‎शब्द आता संवादाचे पूल बांधत नाहीत, तर दरी निर्माण‎करतात. वेगळे मत मांडणाऱ्या व्यक्तींना लगेच‎देशविरोधी, व्यवस्था समर्थक किंवा अन्य कोणत्या तरी‎चौकटीत बसवले जाते.‎ ही प्रवृत्ती केवळ राजकीय मतभेद मर्यादित करत नाही, तर‎समाजातील संवादाच्या शक्यताही कमकुवत करते.‎भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची विविधता.‎अनेक भाषा, धर्म, जाती आणि संस्कृतींनी बनलेल्या या‎देशात संवादाची भाषा नैसर्गिकपणे समावेशक आणि‎संवेदनशील असणे आवश्यक आहे.‎ मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय भाषाशैली अधिक‎फुटीरवादी होताना दिसत आहे. ‘आम्ही विरुद्ध ते’ या‎मानसिकतेचा प्रभाव संवादावरही पडत आहे. त्यामुळे‎समस्येवर तोडगा शोधण्यापेक्षा विरोधकाला नैतिकदृष्ट्या‎चुकीचे ठरवण्यावर अधिक भर दिला जात आहे.‎ सोशल मीडियाने हा प्रश्न आणखी तीव्र केला आहे. या‎माध्यमाने संवाद अधिक लोकाभिमुख केला. पण‎त्याचवेळी संवादातील सभ्यपणा कमी केला.‎ आता एखाद्या विचाराची गंभीरता महत्त्वाची राहिलेली‎नाही; तो किती वेगाने व्हायरल होतो. हे अधिक महत्त्वाचे‎ठरते. संयमी आणि विवेकपूर्ण मतांपेक्षा प्रक्षोभक‎प्रतिक्रिया अधिक वेगाने पसरतात.‎ ट्रोल संस्कृतीमुळे असहमतीचे रूपांतर अनेकदा‎शिवीगाळीत झाले आहे. त्यामुळे कोणाचा युक्तिवाद‎अधिक भक्कम आहे. यापेक्षा कोणाची प्रतिक्रिया अधिक‎आक्रमक आहे, हेच जास्त महत्त्वाचे बनले आहे.‎त्यामुळेच आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोण सत्तेवर‎आहे हा नाही, तर आपण एकमेकांशी कोणत्या भाषेत‎संवाद साधतो, हा आहे.‎ (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे)‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *