लोकशाही केवळ मतदान, सरकार किंवा सत्तांतरयापुरती मर्यादित नसते. ती सतत सुरू राहणारी संवादाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत सहमतीइतकेच असहमतीलाही स्थान असते. मात्र संवादात संयम,संवेदनशीलता आणि परस्परांविषयी आदर टिकून राहतो,तेव्हाच तो सशक्त राहतो. भाषेत अपमान, कटुता वउत्तेजना असते तेव्हा विरोध हळूहळू वैरात रुपांतरित होतो. सध्या भारतीय सार्वजनिक जीवनात हीच सर्वात मोठीचिंता बनली आहे. संसद असो, टीव्हीवरील चर्चासत्रेअसोत, निवडणूक सभा असोत किंवा सोशलमीडियावरील चर्चा — सर्वत्र भाषेतील संयम कमीहोताना दिसतो. विचारांपेक्षा उपरोधिक टीका, तर्कांपेक्षाटोमणे आणि संवादापेक्षा गोंधळ अधिक वाढतानादिसतो. त्यामुळे लोकशाही ही विचारमंथनाचे व्यासपीठ नराहता केवळ आक्रमक प्रदर्शनाचे माध्यम बनतअसल्याची भावना निर्माण होते. भारतीय लोकशाहीपरंपरेत मतभेदांना नेहमीच सन्मानाने व्यक्त करण्याचीसंस्कृती राहिली आहे. एखाद्या धोरणावर कठोर टीकाहोऊ शकते. एखाद्या विचारसरणीशी तीव्र असहमती असू शकते; परंतुव्यक्तीच्या सन्मानावर हल्ला करणे ही लोकशाही संस्कृतीमानली जात नाही. असहमती ही लोकशाहीची ताकदआहे तर अपमान हा तिच्या आत्म्याला धक्का देणाराप्रकार ठरतो.आजचा विरोधाभास असा आहे कीसार्वजनिक जीवनात भाषेचा उद्देश समजावूनसांगण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला हरवणे हा अधिक झाला आहे.शब्द आता संवादाचे पूल बांधत नाहीत, तर दरी निर्माणकरतात. वेगळे मत मांडणाऱ्या व्यक्तींना लगेचदेशविरोधी, व्यवस्था समर्थक किंवा अन्य कोणत्या तरीचौकटीत बसवले जाते. ही प्रवृत्ती केवळ राजकीय मतभेद मर्यादित करत नाही, तरसमाजातील संवादाच्या शक्यताही कमकुवत करते.भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची विविधता.अनेक भाषा, धर्म, जाती आणि संस्कृतींनी बनलेल्या यादेशात संवादाची भाषा नैसर्गिकपणे समावेशक आणिसंवेदनशील असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय भाषाशैली अधिकफुटीरवादी होताना दिसत आहे. ‘आम्ही विरुद्ध ते’ यामानसिकतेचा प्रभाव संवादावरही पडत आहे. त्यामुळेसमस्येवर तोडगा शोधण्यापेक्षा विरोधकाला नैतिकदृष्ट्याचुकीचे ठरवण्यावर अधिक भर दिला जात आहे. सोशल मीडियाने हा प्रश्न आणखी तीव्र केला आहे. यामाध्यमाने संवाद अधिक लोकाभिमुख केला. पणत्याचवेळी संवादातील सभ्यपणा कमी केला. आता एखाद्या विचाराची गंभीरता महत्त्वाची राहिलेलीनाही; तो किती वेगाने व्हायरल होतो. हे अधिक महत्त्वाचेठरते. संयमी आणि विवेकपूर्ण मतांपेक्षा प्रक्षोभकप्रतिक्रिया अधिक वेगाने पसरतात. ट्रोल संस्कृतीमुळे असहमतीचे रूपांतर अनेकदाशिवीगाळीत झाले आहे. त्यामुळे कोणाचा युक्तिवादअधिक भक्कम आहे. यापेक्षा कोणाची प्रतिक्रिया अधिकआक्रमक आहे, हेच जास्त महत्त्वाचे बनले आहे.त्यामुळेच आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोण सत्तेवरआहे हा नाही, तर आपण एकमेकांशी कोणत्या भाषेतसंवाद साधतो, हा आहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




