लोकशाही केवळ मतदान, सरकार किंवा सत्तांतरयापुरती मर्यादित नसते. ती सतत सुरू राहणारी संवादाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत सहमतीइतकेच असहमतीलाही स्थान असते. मात्र संवादात संयम,संवेदनशीलता आणि परस्परांविषयी आदर टिकून राहतो,तेव्हाच तो सशक्त राहतो. भाषेत अपमान, कटुता वउत्तेजना असते तेव्हा विरोध हळूहळू वैरात रुपांतरित होतो. सध्या भारतीय सार्वजनिक जीवनात हीच सर्वात मोठीचिंता बनली आहे. संसद असो, टीव्हीवरील चर्चासत्रेअसोत, निवडणूक सभा असोत किंवा सोशलमीडियावरील चर्चा — सर्वत्र भाषेतील संयम कमीहोताना दिसतो. विचारांपेक्षा उपरोधिक टीका, तर्कांपेक्षाटोमणे आणि संवादापेक्षा गोंधळ अधिक वाढतानादिसतो. त्यामुळे लोकशाही ही विचारमंथनाचे व्यासपीठ नराहता केवळ आक्रमक प्रदर्शनाचे माध्यम बनतअसल्याची भावना निर्माण होते. भारतीय लोकशाहीपरंपरेत मतभेदांना नेहमीच सन्मानाने व्यक्त करण्याचीसंस्कृती राहिली आहे. एखाद्या धोरणावर कठोर टीकाहोऊ शकते. एखाद्या विचारसरणीशी तीव्र असहमती असू शकते; परंतुव्यक्तीच्या सन्मानावर हल्ला करणे ही लोकशाही संस्कृतीमानली जात नाही. असहमती ही लोकशाहीची ताकदआहे तर अपमान हा तिच्या आत्म्याला धक्का देणाराप्रकार ठरतो.आजचा विरोधाभास असा आहे कीसार्वजनिक जीवनात भाषेचा उद्देश समजावूनसांगण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला हरवणे हा अधिक झाला आहे.शब्द आता संवादाचे पूल बांधत नाहीत, तर दरी निर्माणकरतात. वेगळे मत मांडणाऱ्या व्यक्तींना लगेचदेशविरोधी, व्यवस्था समर्थक किंवा अन्य कोणत्या तरीचौकटीत बसवले जाते. ही प्रवृत्ती केवळ राजकीय मतभेद मर्यादित करत नाही, तरसमाजातील संवादाच्या शक्यताही कमकुवत करते.भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची विविधता.अनेक भाषा, धर्म, जाती आणि संस्कृतींनी बनलेल्या यादेशात संवादाची भाषा नैसर्गिकपणे समावेशक आणिसंवेदनशील असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय भाषाशैली अधिकफुटीरवादी होताना दिसत आहे. ‘आम्ही विरुद्ध ते’ यामानसिकतेचा प्रभाव संवादावरही पडत आहे. त्यामुळेसमस्येवर तोडगा शोधण्यापेक्षा विरोधकाला नैतिकदृष्ट्याचुकीचे ठरवण्यावर अधिक भर दिला जात आहे. सोशल मीडियाने हा प्रश्न आणखी तीव्र केला आहे. यामाध्यमाने संवाद अधिक लोकाभिमुख केला. पणत्याचवेळी संवादातील सभ्यपणा कमी केला. आता एखाद्या विचाराची गंभीरता महत्त्वाची राहिलेलीनाही; तो किती वेगाने व्हायरल होतो. हे अधिक महत्त्वाचेठरते. संयमी आणि विवेकपूर्ण मतांपेक्षा प्रक्षोभकप्रतिक्रिया अधिक वेगाने पसरतात. ट्रोल संस्कृतीमुळे असहमतीचे रूपांतर अनेकदाशिवीगाळीत झाले आहे. त्यामुळे कोणाचा युक्तिवादअधिक भक्कम आहे. यापेक्षा कोणाची प्रतिक्रिया अधिकआक्रमक आहे, हेच जास्त महत्त्वाचे बनले आहे.त्यामुळेच आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोण सत्तेवरआहे हा नाही, तर आपण एकमेकांशी कोणत्या भाषेतसंवाद साधतो, हा आहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

