
Kolhapur : मूळ शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर उभारी घेण्यासाठी प्रयत्न करणारी ठाकरे सेना जिल्ह्यात आता केवळ नावापुरताच राहिली आहे. एकही आमदार नसल्यामुळे मरगळलेल्या ठाकरे सेनेला एखाद्या आमदाराने उभारी मिळेल, या आशेचाही आता भंग झाला आहे. विधानसभा निवडणुकीने ठाकरे सेनेला (Thackeray Sena) त्यांचे स्थान दाखवून दिले आहे. जनतेशी नाळ जोडण्याचे आव्हान आता ठाकरेसेनेसमोर उभे राहिले आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेचे एकेकाळी सहा आमदार आणि दोन खासदार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुण्याईमुळे महापालिकेसह खासदारकीपर्यंत शिवसेनेने चांगले संघटन केले होते. त्यांनी जिल्ह्यात आपली ताकद वाढविली होती. त्यांच्या बिंदू चौकातील जाहीर सभेस मोठा प्रतिसाद मिळत होता. 'वाघ तो वाघ' म्हणून शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांत शिवसेनेच्या शाखा निघत होत्या. त्या फलकावर शाखा क्रमांक लिहिला जात होता. त्या फलकावर ठाकरे आणि वाघाचे छायाचित्र असायचे.
संघटन काय असते हे त्यांनी कोल्हापुरात दाखवून दिले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला सुरुंग लावला. एक शिवसेना दुभंगली. आजपर्यंत शिवसेनेने असे अनेक धक्के जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पचवले होते. मात्र, येथे धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचेही नाव पळविल्यामुळे शिंदेंचा प्रभाव ठाकरेंना रोखता आला नाही.
|
Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं... |
ज्या शिवसेनेचा प्रचार प्रारंभ कोल्हापुरातून होत होता, तेथेच विधानसभेला ठाकरे सेनेला एकही आमदार मिळविता आला नाही. निवडणुकीत एका रात्रीत दुसत्या पक्षातून आलेल्या के. पी. पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. परंतु, कट्टर शिवसैनिक असलेल्या सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासाठी एकही जाहीर सभा घेतली नाही. त्याचबरोबर ठाकरे सेनेत असलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील या दोघांनाही उमेदवारी न मिळाल्याने पक्ष बदलला. त्यांना थांबविणेही ठाकरे सेनेला शक्य झाले नाही. त्यामुळे उरलीसुरली ताकदसुद्धा या निवडणुकीत संपली की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ठाकरे सेनेची अद्यापही पाहिजे तितकी नाळ जनतेशी जुळली नाही. त्यांचा कनेक्ट किती आहे, त्यांचे अंतर्गत राजकरण या सर्वांचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. एखादा आमदार पक्षात असेल तर तेथील कार्यकर्त्यांना उभारी मिळते. गल्लीबोळातील कामे करून घेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. शासकीय अधिकाऱ्याऱ्यांसोबत बैठक लावता येते. मात्र, यावर आता ठाकरे सेनेच्या कार्यकत्यांना मर्यादा येणार आहेत. त्याना पुन्हा एकदा ओमाने सच्चा शिवसैनिक तयार करावा लागणार आहे.
ज्या ताकदीने पूर्वीची शिवसेना आक्रमक होती, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उत्तरत होती, तो कट्टर शिवसैनिक तयार करावा लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकही नेता रसद पुरविणार नाही. खंबीर बैंकबोन नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचा म्हणावा तितका प्रभाव कोल्हापुरातील जनतेवर नाही, कार्यकर्त्यांवर नाही. त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
दृष्टिक्षेपात...
पक्षाच्या माजी आमदारांचा रामराम
संघटनवाढीला आल्या मर्यादा
अपेक्षित मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकार्याची नाराजी
जिल्ह्यात खबीर पक्ष नेतृत्वाचा अभाव
कार्यकत्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




