पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्राणायामाद्वारे मनावर पकड‎ मिळवण्याचा अनोखा मार्ग

जीवनात दुःख येणे आणि दुःखी होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.‎असे कोणतेही दुःख बनलेच नाही, जे सुखाशिवाय येईल आणि असे‎कोणतेही सुख बनले नाही, जे दुःखाशिवाय येईल. हे दोन्ही एकाच वेळी‎येतात. यांची समज म्हणजेच मुक्ती आहे. एक शब्द आहे- स्पेस. याचा‎सरळ अर्थ होतो - जागा तयार करा. आपल्या भावनांमध्ये, आपल्या‎विचारांमध्ये एक स्पेस ठेवा. विचार बाहेरून येतात, विचार आपण करत‎असतो. मग आपण त्या विचाराशी आपले संपूर्ण व्यक्तिमत्त्व, अस्तित्व‎जोडून घेतो. ऋषीमुनी सांगून गेले आहेत की माणसाचे शरीर आणि‎आत्म्याला चिकटवण्याचे काम मन करते आणि ज्याचे शरीर आणि‎आत्मा जितके जास्त चिकटलेले असतील तो तितकाच अशांत असतो.‎ जरासे मन बाजूला करा, आत्मा आणि शरीरात स्पेस येईल आणि येथूनच‎आपण शांत होऊ. याला नियंत्रित करण्यासाठी कोणतेही औषधही नाही.‎मनाचे संचालन श्वासाने होते. प्राणायाम दररोज अत्यंत गांभीर्याने केला,‎नियमित केला तर आपली मनावर पकड निर्माण होईल. तेव्हा-तेव्हा ती‎स्पेस निर्माण होईल, जी आपल्याला शांत करते.‎‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *