पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रेम, श्रद्धा आणि स्नेहामुळे‎ जीवनात भक्ती अवतरते

ईश्वर हा संशयाचा नाही, तर जिज्ञासेचा विषय आहे. जेव्हा संशय अति‎वाढतो, तेव्हा लोक आपले अज्ञानही देवावर आरोपित करू लागतात.‎अज्ञान आणि अहंकार आपल्याला ईश्वरापासून दूर नेतो. काकभुशुंडी जी‎म्हणतात- ‘ते सठ हठ बस संसय करहीं, निज अग्यान राम पर धरहीं.’‎म्हणजेच, ते मूर्ख लोक हट्टापायी संशय घेतात आणि स्वतःचे अज्ञान प्रभू‎श्रीरामांवर आरोपित करतात. त्यांनी असे यासाठी म्हटले कारण पक्षिराज‎गरुडाला श्रीरामांबद्दल संशय निर्माण झाला होता. त्या संशयाचे निरसन‎करण्यासाठी काकभुशुंडीजींनी त्यांना रामचरित्र ऐकवले. ईश्वराशी जोडले‎जाण्याचा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे‎भक्ती होय. जीवनात तीन गोष्टी लयबद्ध झाल्या, तर भक्ती सहजपणे‎उतरते- प्रेम, श्रद्धा आणि स्नेह. प्रेम हे बरोबरीच्या व्यक्तींसोबत होते, ते‎समान पातळीवर असते. श्रद्धा ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींबद्दल असते.‎तर स्नेह हा लहानांबद्दल असतो. हे तिन्ही जर लयबद्ध झाले, एकमेकांमध्ये‎मिसळून गेले, तर त्याचे रूपांतर भक्तीत होते. भक्त जिज्ञासू असतो, परंतु‎तो संशयग्रस्त नसतो. ‎‎

This post was originally published on this site.



राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *