पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:भौतिक यशासोबत अध्यात्माचा‎ समतोल राखायला शिकावे‎

अयोध्येतील राम मंदिरात ‘सीईओ’ची नियुक्ती करण्यात आली आहे.‎शास्त्रांमध्ये सांगितले आहे की, जेव्हाही पूजा कराल किंवा एखाद्या‎मंदिरात जाल, तेव्हा तुम्ही जसे आहात तसे व्हा. स्वतःच्या स्वभावापेक्षा‎वेगळे वागून देवदर्शन घेतले किंवा पूजा केली, तर तुम्ही केवळ कर्मकांड‎करत असता. आता प्रश्न असा पडतो की, स्वतःच्या मूळ स्वभावात‎कसे राहायचे? जगातील पहिले सीईओ अग्रवाल समाजाचे पितृपुरुष‎महाराजा अग्रसेन हे होते. त्यांनी प्रत्येक काम एका मोहिमेसारखे केले.‎ प्रजा आहे म्हणून राजा आहे, राजामुळे प्रजा नाही, हे त्यांनी दाखवून‎दिले होते. आज जे लोक व्यवस्थापनाच्या मोठ्या पदांवर बसले आहेत,‎त्यांना प्रसिद्धी मिळाली, संपत्ती मिळाली, पण त्यांचे आयुष्य मात्र निघून‎गेले. आपला मूळ स्वभाव काय आहे, हेच ते कधी ओळखू शकले‎नाहीत. अगदी कुशल लोकही इतरांच्या हातातील ‘रिमोट कंट्रोल’ बनले‎ आहेत. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या 8.5% लोक 60‎वर्षांच्या वर (60-प्लस) गेले आहेत, पण आता आपल्याला कोणते‎आयुष्य जगायचे आहे, हेच त्यांना अजूनही समजलेले नाही. भौतिक‎यशामध्ये अध्यात्माची जोड कशी द्यावी, याचा समतोल एक ‘सीईओ’‎राखत असतो. कदाचित राम मंदिराची व्यवस्था आता या गोष्टीचे एक‎आदर्श उदाहरण बनेल.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *