काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर अर्शदीपसिंहने तिलक वर्माच्या त्वचेच्या रंगाची खिल्ली उडवल्याबाबतची एक पोस्ट पाहिली. तिलकने ती गोष्ट सहजपणे टाळली आणि सोशल मीडियावरही त्याकडे सामान्य पद्धतीनेच पाहिले गेले. पण हीच खरी समस्या आहे. आपण अशा गोष्टींना सामान्य मानतो. कारण त्याबाबत आपण पुरेसे संवेदनशील नाही. समस्या फक्त अर्शदीपपुरती मर्यादित नाही. ही भारतीय समाजाची समस्या आहे आणि आपण सगळ्यांनीच ‘यात एवढे काय मोठे आहे’ असे म्हणत ती स्वीकारली आहे. धनराज पिल्ले यांचे उदाहरण घ्या. पिल्ले जेव्हा चर्चेत आले, तेव्हा त्यांनी आपल्या प्रतिभेने सगळ्यांना थक्क केले होते. त्यांना रोखणे अशक्य वाटत होते. पण हॉकी सामन्यांमध्ये त्यांच्या त्वचेच्या रंगावर टिप्पणी करणारे शब्द सतत ऐकू येत होते. स्वतः पिल्ले यांनी मला ही घटना सांगितली होती. तेव्हाही त्यांना त्यात काही असामान्य वाटले नव्हते. उलट ते सामान्यच मानले गेले. कारण आपण असेच बोलतो, मग त्यात एवढे मोठे काय आहे? यामध्ये कोलकात्यात खेळून करिअर घडवणाऱ्या नायजेरियन फुटबॉलपटूंचाही मुद्दा जोडता येईल. त्यांच्यापैकी काही आजही खूप लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करणे थांबवले नाही. चीमा ओकोरी याचे उदाहरण आहेत. ते भारतात खेळलेले सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. पण त्यांनाही ‘काळा चित्ता’ असे म्हटले जात होते. हे सर्व इतके सामान्य झाले आहे की अशा शब्दांच्या वापरात आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. कदाचित अर्शदीप सिंहला मर्यादा कुठे आखायची हे समजले नसेल. त्याच्यासाठी हे सर्व फक्त विनोद आणि हलकीफुलकी चेष्टा असू शकते. अगदी तिलक वर्मालाही कदाचित यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजले नसेल, म्हणून त्याने ते प्रकरण तिथेच सोडून दिले. पण अशा प्रकरणांमध्ये आपल्याला अधिक शिक्षण आणि संवेदनशीलतेची गरज आहे आणि हे जितक्या लवकर होईल तितके भारतासाठी चांगले ठरेल. आजही आपण कोलकात्यात एखादा सप्ताहांताचा सामना पाहायला गेलो. व एखादा आफ्रिकन खेळाडू खेळत असेल तर जवळपास निश्चित आहे की एखादा प्रेक्षक त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करेल. अशावेळी त्या खेळाडूची जबाबदारी आहे की त्याने लगेच ही बाब रेफरीच्या लक्षात आणून द्यावी. पण तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचेही कर्तव्य आहे की अशा व्यक्तीला थांबवावे आणि समज द्यावी. हे एक सामूहिक अभियान असायला हवे, जे फक्त अधिकारी आणि प्रशासकांवर सोडून चालणार नाही. आपल्याकडे अशा लोकांची मोठी संख्या आहे. हे लोक त्वचेच्या रंगावरून अपमान करणे हा आपला विशेषाधिकार समजतात. शतकानुशतके आपल्याला या विषाणूवर कोणतीही लस सापडली नाही, पण आता ती विकसित करण्याची वेळ आली आहे. खेळाडूंनीही या वाईट प्रवृत्तीविरोधात एकजूट दाखवून केवळ प्रतीकात्मकतेपलीकडे जाऊन वर्णद्वेष सहन केला जाणार नाही, हा निर्धार प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वर्णद्वेषी टिप्पण्यांचे बळी ठरलेले पण बोलणे टाळत राहिले तेही या वाईट प्रवृत्तीला वाढवण्याइतकेच दोषी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की मानवी सन्मानापुढे खेळाची कोणतीही किंमत नाही आणि समाजाप्रती त्यांचीही जबाबदारी आहे.आगामी काळात बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात- जिथे खेळाडूंवर सतत चाहते आणि इतर लोकांची नजर असते- त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सजग राहण्याची गरज आहे. पूर्वी अशा गोष्टी बोलल्या जात असल्या तरी त्या सार्वजनिक होत नव्हत्या. कारण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर येत नव्हती. पण आता एक्स आणि इन्स्टाग्रामवरच संपूर्ण आयुष्य जगले जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ यातील फरक स्पष्टपणे समजावून सांगणारा ओरिएंटेशन कोर्स उपयुक्त ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात खेळाडूंनी पूर्वीपेक्षा अधिक सजग राहण्याची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कुर्ल्यातील दुर्घटना ठरली राजकीय आखाडा! झाड कोसळून वृद्धाच्या मृत्यूवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, 'ठाकरे गटाचा २५ वर्षांचा हिशेब काढू!'
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- मुंबई-गोवा महामार्गावर चाकांचा खोळंबा! वाकण ते नागोठणे दरम्यान मैलोनमैल वाहतूक कोंडी; पुराच्या पाण्यामुळे चालक-प्रवासी बेहाल!
- कोकण रेल्वेचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या तासनतास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल!
महाराष्ट्र
- मुंबई-गोवा महामार्गावर चाकांचा खोळंबा! वाकण ते नागोठणे दरम्यान मैलोनमैल वाहतूक कोंडी; पुराच्या पाण्यामुळे चालक-प्रवासी बेहाल!
- कोकण रेल्वेचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या तासनतास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल!
- ५०० रुपयांच्या दंडाचा धाक! मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट; 'फुकट्या' प्रवाशांना रेल्वेचा दणका!
- सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आधीच साजरी होणार! जुलैपासून महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; ८व्या वेतन आयोगाबाबतही मोठी अपडेट!
गुन्हा
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!
- म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू
- E20 इथेनॉल मिश्रित इंधन वाहनांसाठी सुरक्षित, पण मायलेजवर होणार किंचित परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकीचे मोठे स्पष्टीकरण!



























Subscribe to my channel


