काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर अर्शदीपसिंहने तिलक वर्माच्या त्वचेच्या रंगाची खिल्ली उडवल्याबाबतची एक पोस्ट पाहिली. तिलकने ती गोष्ट सहजपणे टाळली आणि सोशल मीडियावरही त्याकडे सामान्य पद्धतीनेच पाहिले गेले. पण हीच खरी समस्या आहे. आपण अशा गोष्टींना सामान्य मानतो. कारण त्याबाबत आपण पुरेसे संवेदनशील नाही. समस्या फक्त अर्शदीपपुरती मर्यादित नाही. ही भारतीय समाजाची समस्या आहे आणि आपण सगळ्यांनीच ‘यात एवढे काय मोठे आहे’ असे म्हणत ती स्वीकारली आहे. धनराज पिल्ले यांचे उदाहरण घ्या. पिल्ले जेव्हा चर्चेत आले, तेव्हा त्यांनी आपल्या प्रतिभेने सगळ्यांना थक्क केले होते. त्यांना रोखणे अशक्य वाटत होते. पण हॉकी सामन्यांमध्ये त्यांच्या त्वचेच्या रंगावर टिप्पणी करणारे शब्द सतत ऐकू येत होते. स्वतः पिल्ले यांनी मला ही घटना सांगितली होती. तेव्हाही त्यांना त्यात काही असामान्य वाटले नव्हते. उलट ते सामान्यच मानले गेले. कारण आपण असेच बोलतो, मग त्यात एवढे मोठे काय आहे? यामध्ये कोलकात्यात खेळून करिअर घडवणाऱ्या नायजेरियन फुटबॉलपटूंचाही मुद्दा जोडता येईल. त्यांच्यापैकी काही आजही खूप लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करणे थांबवले नाही. चीमा ओकोरी याचे उदाहरण आहेत. ते भारतात खेळलेले सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. पण त्यांनाही ‘काळा चित्ता’ असे म्हटले जात होते. हे सर्व इतके सामान्य झाले आहे की अशा शब्दांच्या वापरात आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. कदाचित अर्शदीप सिंहला मर्यादा कुठे आखायची हे समजले नसेल. त्याच्यासाठी हे सर्व फक्त विनोद आणि हलकीफुलकी चेष्टा असू शकते. अगदी तिलक वर्मालाही कदाचित यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजले नसेल, म्हणून त्याने ते प्रकरण तिथेच सोडून दिले. पण अशा प्रकरणांमध्ये आपल्याला अधिक शिक्षण आणि संवेदनशीलतेची गरज आहे आणि हे जितक्या लवकर होईल तितके भारतासाठी चांगले ठरेल. आजही आपण कोलकात्यात एखादा सप्ताहांताचा सामना पाहायला गेलो. व एखादा आफ्रिकन खेळाडू खेळत असेल तर जवळपास निश्चित आहे की एखादा प्रेक्षक त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करेल. अशावेळी त्या खेळाडूची जबाबदारी आहे की त्याने लगेच ही बाब रेफरीच्या लक्षात आणून द्यावी. पण तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचेही कर्तव्य आहे की अशा व्यक्तीला थांबवावे आणि समज द्यावी. हे एक सामूहिक अभियान असायला हवे, जे फक्त अधिकारी आणि प्रशासकांवर सोडून चालणार नाही. आपल्याकडे अशा लोकांची मोठी संख्या आहे. हे लोक त्वचेच्या रंगावरून अपमान करणे हा आपला विशेषाधिकार समजतात. शतकानुशतके आपल्याला या विषाणूवर कोणतीही लस सापडली नाही, पण आता ती विकसित करण्याची वेळ आली आहे. खेळाडूंनीही या वाईट प्रवृत्तीविरोधात एकजूट दाखवून केवळ प्रतीकात्मकतेपलीकडे जाऊन वर्णद्वेष सहन केला जाणार नाही, हा निर्धार प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वर्णद्वेषी टिप्पण्यांचे बळी ठरलेले पण बोलणे टाळत राहिले तेही या वाईट प्रवृत्तीला वाढवण्याइतकेच दोषी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की मानवी सन्मानापुढे खेळाची कोणतीही किंमत नाही आणि समाजाप्रती त्यांचीही जबाबदारी आहे.आगामी काळात बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात- जिथे खेळाडूंवर सतत चाहते आणि इतर लोकांची नजर असते- त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सजग राहण्याची गरज आहे. पूर्वी अशा गोष्टी बोलल्या जात असल्या तरी त्या सार्वजनिक होत नव्हत्या. कारण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर येत नव्हती. पण आता एक्स आणि इन्स्टाग्रामवरच संपूर्ण आयुष्य जगले जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ यातील फरक स्पष्टपणे समजावून सांगणारा ओरिएंटेशन कोर्स उपयुक्त ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात खेळाडूंनी पूर्वीपेक्षा अधिक सजग राहण्याची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



