काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर अर्शदीपसिंहने तिलक वर्माच्या त्वचेच्या रंगाची खिल्ली उडवल्याबाबतची एक पोस्ट पाहिली. तिलकने ती गोष्ट सहजपणे टाळली आणि सोशल मीडियावरही त्याकडे सामान्य पद्धतीनेच पाहिले गेले. पण हीच खरी समस्या आहे. आपण अशा गोष्टींना सामान्य मानतो. कारण त्याबाबत आपण पुरेसे संवेदनशील नाही. समस्या फक्त अर्शदीपपुरती मर्यादित नाही. ही भारतीय समाजाची समस्या आहे आणि आपण सगळ्यांनीच ‘यात एवढे काय मोठे आहे’ असे म्हणत ती स्वीकारली आहे. धनराज पिल्ले यांचे उदाहरण घ्या. पिल्ले जेव्हा चर्चेत आले, तेव्हा त्यांनी आपल्या प्रतिभेने सगळ्यांना थक्क केले होते. त्यांना रोखणे अशक्य वाटत होते. पण हॉकी सामन्यांमध्ये त्यांच्या त्वचेच्या रंगावर टिप्पणी करणारे शब्द सतत ऐकू येत होते. स्वतः पिल्ले यांनी मला ही घटना सांगितली होती. तेव्हाही त्यांना त्यात काही असामान्य वाटले नव्हते. उलट ते सामान्यच मानले गेले. कारण आपण असेच बोलतो, मग त्यात एवढे मोठे काय आहे? यामध्ये कोलकात्यात खेळून करिअर घडवणाऱ्या नायजेरियन फुटबॉलपटूंचाही मुद्दा जोडता येईल. त्यांच्यापैकी काही आजही खूप लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करणे थांबवले नाही. चीमा ओकोरी याचे उदाहरण आहेत. ते भारतात खेळलेले सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. पण त्यांनाही ‘काळा चित्ता’ असे म्हटले जात होते. हे सर्व इतके सामान्य झाले आहे की अशा शब्दांच्या वापरात आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. कदाचित अर्शदीप सिंहला मर्यादा कुठे आखायची हे समजले नसेल. त्याच्यासाठी हे सर्व फक्त विनोद आणि हलकीफुलकी चेष्टा असू शकते. अगदी तिलक वर्मालाही कदाचित यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजले नसेल, म्हणून त्याने ते प्रकरण तिथेच सोडून दिले. पण अशा प्रकरणांमध्ये आपल्याला अधिक शिक्षण आणि संवेदनशीलतेची गरज आहे आणि हे जितक्या लवकर होईल तितके भारतासाठी चांगले ठरेल. आजही आपण कोलकात्यात एखादा सप्ताहांताचा सामना पाहायला गेलो. व एखादा आफ्रिकन खेळाडू खेळत असेल तर जवळपास निश्चित आहे की एखादा प्रेक्षक त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करेल. अशावेळी त्या खेळाडूची जबाबदारी आहे की त्याने लगेच ही बाब रेफरीच्या लक्षात आणून द्यावी. पण तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचेही कर्तव्य आहे की अशा व्यक्तीला थांबवावे आणि समज द्यावी. हे एक सामूहिक अभियान असायला हवे, जे फक्त अधिकारी आणि प्रशासकांवर सोडून चालणार नाही. आपल्याकडे अशा लोकांची मोठी संख्या आहे. हे लोक त्वचेच्या रंगावरून अपमान करणे हा आपला विशेषाधिकार समजतात. शतकानुशतके आपल्याला या विषाणूवर कोणतीही लस सापडली नाही, पण आता ती विकसित करण्याची वेळ आली आहे. खेळाडूंनीही या वाईट प्रवृत्तीविरोधात एकजूट दाखवून केवळ प्रतीकात्मकतेपलीकडे जाऊन वर्णद्वेष सहन केला जाणार नाही, हा निर्धार प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वर्णद्वेषी टिप्पण्यांचे बळी ठरलेले पण बोलणे टाळत राहिले तेही या वाईट प्रवृत्तीला वाढवण्याइतकेच दोषी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की मानवी सन्मानापुढे खेळाची कोणतीही किंमत नाही आणि समाजाप्रती त्यांचीही जबाबदारी आहे.आगामी काळात बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात- जिथे खेळाडूंवर सतत चाहते आणि इतर लोकांची नजर असते- त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सजग राहण्याची गरज आहे. पूर्वी अशा गोष्टी बोलल्या जात असल्या तरी त्या सार्वजनिक होत नव्हत्या. कारण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर येत नव्हती. पण आता एक्स आणि इन्स्टाग्रामवरच संपूर्ण आयुष्य जगले जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ यातील फरक स्पष्टपणे समजावून सांगणारा ओरिएंटेशन कोर्स उपयुक्त ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात खेळाडूंनी पूर्वीपेक्षा अधिक सजग राहण्याची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




