सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच उमर खालिदला जामीन देण्यास पूर्वी दिलेल्या नकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमर पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. यावरून देशातील सर्वोच्च न्यायालय स्वतः राज्यसत्ता आणि घटनात्मक स्वातंत्र्य यांच्यात योग्य समतोल शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. दशकानुदशके भारतीय न्यायशास्त्र एका मूलभूत तत्त्वावर आधारित राहिले आहे : जामीन हा नियम आहे, तुरुंगवास हा अपवाद. न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णा अय्यर यांनी राजस्थान राज्य विरुद्ध बालचंद (1977) प्रकरणात हे तत्त्व स्पष्टपणे मांडले होते. दोष सिद्ध होण्यापूर्वी वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. या तत्त्वाची पुन्हा पुन्हा पुष्टी झाली. त्यात गुडीकांती नरसिंहुलू विरुद्ध लोक अभियोजक (1978) या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणात न्यायालयाने म्हटले होते की, दोष सिद्ध होण्यापूर्वी स्वातंत्र्यापासून वंचित करणे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच योग्य ठरू शकते. अलीकडील काळात भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब (2021) या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता की, यूएपीएतील कठोर तरतुदीही अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या घटनात्मक हमींना निष्प्रभ करू शकत नाहीत. विशेषतः दीर्घ तुरुंगवास आणि खटल्यातील विलंब हे अन्यायाचे साधन ठरत असतील, तर परिस्थिती वेगळी मानली जाईल. न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, अशा परिस्थितीत यूएपीएच्या कलम 43 डी(5) मधील कठोरताही कमी केली जाऊ शकते. मात्र, या स्थापित तत्त्वांनंतरही उमर खालिद सप्टेंबर 2020 पासून दिल्ली दंगल कट प्रकरणात तुरुंगात आहे. खटल्यात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतो : राज्याकडे सर्व तपास आणि सरकारी यंत्रणा असूनही योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसेल, तर आरोपीला अनिश्चित काळ तुरुंगात ठेवणे योग्य आहे का? हे दोष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षा देण्यासारखे नाही का? जानेवारी 2026 मध्ये न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने उमर खालिद आणि शर्जिल इमामला जामीन नाकारला होता. इतर अनेक सहआरोपींना दिलासा मिळाला असतानाही हा निर्णय झाला. खंडपीठाने म्हटले होते की, यूएपीए प्रकरणांमध्ये खटल्यातील विलंब हा जामिनासाठी ‘ट्रम्प कार्ड’ बनू शकत नाही. तसेच आरोपांचे गांभीर्यही त्यांनी अधोरेखित केले होते. मात्र काही महिन्यांनंतर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने त्या पूर्वीच्या निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदवले. 18 मे 2026 रोजी यूएपीएशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात आरोपीला जामीन देताना खंडपीठाने ठामपणे पुन्हा नमूद केले की, जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास अपवाद आहे- अगदी यूएपीए प्रकरणांमध्येही. खंडपीठाने असेही म्हटले की, उमर खालिदला जामीन नाकारण्याचा पूर्वीचा निर्णय भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब या प्रकरणातील मोठ्या खंडपीठाच्या निर्णयाशी सुसंगत वाटत नाही. याचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. कारण एखाद्या आरोपीला दोष सिद्ध न होता आणि खटल्यात कोणतीही ठोस प्रगती नसताना पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले जाऊ शकते, तर प्रक्रिया स्वतःच शिक्षेमध्ये बदलते.अशा परिस्थितीत दहा वर्षांनंतर आरोपी निर्दोष सुटला, तरी त्याच्या आयुष्यातील हरवलेली वर्षे, मलिन झालेली प्रतिमा, तुटलेले कौटुंबिक जीवन आणि तुरुंगवासातील मानसिक आघात परत मिळू शकत नाहीत. हा मुद्दा केवळ उमर खालिदपुरता मर्यादित नाही. सर्व सरकारांकडून यूएपीएसारख्या कठोर कायद्यांचा वाढता वापर हा यामागचा मोठा प्रश्न आहे. हे कायदे मुळात दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या गंभीर धोक्यांसाठी बनवले गेले होते. मात्र हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील टिप्पणींवरून असे दिसते की, न्यायालयाला याची जाणीव आहे की कठोर कायदेशीर तरतुदींवर अति अवलंबित्व किंवा अंतहीन प्रक्रियात्मक विलंब हेच संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या स्वातंत्र्याच्या आश्वासनाला कमकुवत करू शकतात.प्रश्न अधिक मोठा आहे. भारतीय प्रजासत्ताक राज्यसत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातील घटनात्मक समतोल टिकवून ठेवू इच्छिते का? सर्वोच्च न्यायालयाने योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. आता देशाने त्याच्या उत्तराला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) यूएपीएसारखे कठोर कायदे मुळातच दहशतवाद,राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- कुर्ल्यातील दुर्घटना ठरली राजकीय आखाडा! झाड कोसळून वृद्धाच्या मृत्यूवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, 'ठाकरे गटाचा २५ वर्षांचा हिशेब काढू!'
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- मुंबई-गोवा महामार्गावर चाकांचा खोळंबा! वाकण ते नागोठणे दरम्यान मैलोनमैल वाहतूक कोंडी; पुराच्या पाण्यामुळे चालक-प्रवासी बेहाल!
- कोकण रेल्वेचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या तासनतास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल!
महाराष्ट्र
- मुंबई-गोवा महामार्गावर चाकांचा खोळंबा! वाकण ते नागोठणे दरम्यान मैलोनमैल वाहतूक कोंडी; पुराच्या पाण्यामुळे चालक-प्रवासी बेहाल!
- कोकण रेल्वेचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या तासनतास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल!
- ५०० रुपयांच्या दंडाचा धाक! मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट; 'फुकट्या' प्रवाशांना रेल्वेचा दणका!
- सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आधीच साजरी होणार! जुलैपासून महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; ८व्या वेतन आयोगाबाबतही मोठी अपडेट!
गुन्हा
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!
- म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू
- E20 इथेनॉल मिश्रित इंधन वाहनांसाठी सुरक्षित, पण मायलेजवर होणार किंचित परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकीचे मोठे स्पष्टीकरण!



























Subscribe to my channel


