सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच उमर खालिदला जामीन देण्यास पूर्वी दिलेल्या नकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमर पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. यावरून देशातील सर्वोच्च न्यायालय स्वतः राज्यसत्ता आणि घटनात्मक स्वातंत्र्य यांच्यात योग्य समतोल शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. दशकानुदशके भारतीय न्यायशास्त्र एका मूलभूत तत्त्वावर आधारित राहिले आहे : जामीन हा नियम आहे, तुरुंगवास हा अपवाद. न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णा अय्यर यांनी राजस्थान राज्य विरुद्ध बालचंद (1977) प्रकरणात हे तत्त्व स्पष्टपणे मांडले होते. दोष सिद्ध होण्यापूर्वी वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. या तत्त्वाची पुन्हा पुन्हा पुष्टी झाली. त्यात गुडीकांती नरसिंहुलू विरुद्ध लोक अभियोजक (1978) या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणात न्यायालयाने म्हटले होते की, दोष सिद्ध होण्यापूर्वी स्वातंत्र्यापासून वंचित करणे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच योग्य ठरू शकते. अलीकडील काळात भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब (2021) या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता की, यूएपीएतील कठोर तरतुदीही अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या घटनात्मक हमींना निष्प्रभ करू शकत नाहीत. विशेषतः दीर्घ तुरुंगवास आणि खटल्यातील विलंब हे अन्यायाचे साधन ठरत असतील, तर परिस्थिती वेगळी मानली जाईल. न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, अशा परिस्थितीत यूएपीएच्या कलम 43 डी(5) मधील कठोरताही कमी केली जाऊ शकते. मात्र, या स्थापित तत्त्वांनंतरही उमर खालिद सप्टेंबर 2020 पासून दिल्ली दंगल कट प्रकरणात तुरुंगात आहे. खटल्यात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतो : राज्याकडे सर्व तपास आणि सरकारी यंत्रणा असूनही योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसेल, तर आरोपीला अनिश्चित काळ तुरुंगात ठेवणे योग्य आहे का? हे दोष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षा देण्यासारखे नाही का? जानेवारी 2026 मध्ये न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने उमर खालिद आणि शर्जिल इमामला जामीन नाकारला होता. इतर अनेक सहआरोपींना दिलासा मिळाला असतानाही हा निर्णय झाला. खंडपीठाने म्हटले होते की, यूएपीए प्रकरणांमध्ये खटल्यातील विलंब हा जामिनासाठी ‘ट्रम्प कार्ड’ बनू शकत नाही. तसेच आरोपांचे गांभीर्यही त्यांनी अधोरेखित केले होते. मात्र काही महिन्यांनंतर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने त्या पूर्वीच्या निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदवले. 18 मे 2026 रोजी यूएपीएशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात आरोपीला जामीन देताना खंडपीठाने ठामपणे पुन्हा नमूद केले की, जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास अपवाद आहे- अगदी यूएपीए प्रकरणांमध्येही. खंडपीठाने असेही म्हटले की, उमर खालिदला जामीन नाकारण्याचा पूर्वीचा निर्णय भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब या प्रकरणातील मोठ्या खंडपीठाच्या निर्णयाशी सुसंगत वाटत नाही. याचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. कारण एखाद्या आरोपीला दोष सिद्ध न होता आणि खटल्यात कोणतीही ठोस प्रगती नसताना पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले जाऊ शकते, तर प्रक्रिया स्वतःच शिक्षेमध्ये बदलते.अशा परिस्थितीत दहा वर्षांनंतर आरोपी निर्दोष सुटला, तरी त्याच्या आयुष्यातील हरवलेली वर्षे, मलिन झालेली प्रतिमा, तुटलेले कौटुंबिक जीवन आणि तुरुंगवासातील मानसिक आघात परत मिळू शकत नाहीत. हा मुद्दा केवळ उमर खालिदपुरता मर्यादित नाही. सर्व सरकारांकडून यूएपीएसारख्या कठोर कायद्यांचा वाढता वापर हा यामागचा मोठा प्रश्न आहे. हे कायदे मुळात दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या गंभीर धोक्यांसाठी बनवले गेले होते. मात्र हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील टिप्पणींवरून असे दिसते की, न्यायालयाला याची जाणीव आहे की कठोर कायदेशीर तरतुदींवर अति अवलंबित्व किंवा अंतहीन प्रक्रियात्मक विलंब हेच संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या स्वातंत्र्याच्या आश्वासनाला कमकुवत करू शकतात.प्रश्न अधिक मोठा आहे. भारतीय प्रजासत्ताक राज्यसत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातील घटनात्मक समतोल टिकवून ठेवू इच्छिते का? सर्वोच्च न्यायालयाने योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. आता देशाने त्याच्या उत्तराला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) यूएपीएसारखे कठोर कायदे मुळातच दहशतवाद,राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




