सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच उमर खालिदला जामीन देण्यास पूर्वी दिलेल्या नकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उमर पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. यावरून देशातील सर्वोच्च न्यायालय स्वतः राज्यसत्ता आणि घटनात्मक स्वातंत्र्य यांच्यात योग्य समतोल शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. दशकानुदशके भारतीय न्यायशास्त्र एका मूलभूत तत्त्वावर आधारित राहिले आहे : जामीन हा नियम आहे, तुरुंगवास हा अपवाद. न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णा अय्यर यांनी राजस्थान राज्य विरुद्ध बालचंद (1977) प्रकरणात हे तत्त्व स्पष्टपणे मांडले होते. दोष सिद्ध होण्यापूर्वी वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. या तत्त्वाची पुन्हा पुन्हा पुष्टी झाली. त्यात गुडीकांती नरसिंहुलू विरुद्ध लोक अभियोजक (1978) या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणात न्यायालयाने म्हटले होते की, दोष सिद्ध होण्यापूर्वी स्वातंत्र्यापासून वंचित करणे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच योग्य ठरू शकते. अलीकडील काळात भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब (2021) या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता की, यूएपीएतील कठोर तरतुदीही अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या घटनात्मक हमींना निष्प्रभ करू शकत नाहीत. विशेषतः दीर्घ तुरुंगवास आणि खटल्यातील विलंब हे अन्यायाचे साधन ठरत असतील, तर परिस्थिती वेगळी मानली जाईल. न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, अशा परिस्थितीत यूएपीएच्या कलम 43 डी(5) मधील कठोरताही कमी केली जाऊ शकते. मात्र, या स्थापित तत्त्वांनंतरही उमर खालिद सप्टेंबर 2020 पासून दिल्ली दंगल कट प्रकरणात तुरुंगात आहे. खटल्यात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतो : राज्याकडे सर्व तपास आणि सरकारी यंत्रणा असूनही योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसेल, तर आरोपीला अनिश्चित काळ तुरुंगात ठेवणे योग्य आहे का? हे दोष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षा देण्यासारखे नाही का? जानेवारी 2026 मध्ये न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने उमर खालिद आणि शर्जिल इमामला जामीन नाकारला होता. इतर अनेक सहआरोपींना दिलासा मिळाला असतानाही हा निर्णय झाला. खंडपीठाने म्हटले होते की, यूएपीए प्रकरणांमध्ये खटल्यातील विलंब हा जामिनासाठी ‘ट्रम्प कार्ड’ बनू शकत नाही. तसेच आरोपांचे गांभीर्यही त्यांनी अधोरेखित केले होते. मात्र काही महिन्यांनंतर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने त्या पूर्वीच्या निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदवले. 18 मे 2026 रोजी यूएपीएशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात आरोपीला जामीन देताना खंडपीठाने ठामपणे पुन्हा नमूद केले की, जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास अपवाद आहे- अगदी यूएपीए प्रकरणांमध्येही. खंडपीठाने असेही म्हटले की, उमर खालिदला जामीन नाकारण्याचा पूर्वीचा निर्णय भारत सरकार विरुद्ध के.ए. नजीब या प्रकरणातील मोठ्या खंडपीठाच्या निर्णयाशी सुसंगत वाटत नाही. याचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. कारण एखाद्या आरोपीला दोष सिद्ध न होता आणि खटल्यात कोणतीही ठोस प्रगती नसताना पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले जाऊ शकते, तर प्रक्रिया स्वतःच शिक्षेमध्ये बदलते.अशा परिस्थितीत दहा वर्षांनंतर आरोपी निर्दोष सुटला, तरी त्याच्या आयुष्यातील हरवलेली वर्षे, मलिन झालेली प्रतिमा, तुटलेले कौटुंबिक जीवन आणि तुरुंगवासातील मानसिक आघात परत मिळू शकत नाहीत. हा मुद्दा केवळ उमर खालिदपुरता मर्यादित नाही. सर्व सरकारांकडून यूएपीएसारख्या कठोर कायद्यांचा वाढता वापर हा यामागचा मोठा प्रश्न आहे. हे कायदे मुळात दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या गंभीर धोक्यांसाठी बनवले गेले होते. मात्र हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील टिप्पणींवरून असे दिसते की, न्यायालयाला याची जाणीव आहे की कठोर कायदेशीर तरतुदींवर अति अवलंबित्व किंवा अंतहीन प्रक्रियात्मक विलंब हेच संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या स्वातंत्र्याच्या आश्वासनाला कमकुवत करू शकतात.प्रश्न अधिक मोठा आहे. भारतीय प्रजासत्ताक राज्यसत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातील घटनात्मक समतोल टिकवून ठेवू इच्छिते का? सर्वोच्च न्यायालयाने योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. आता देशाने त्याच्या उत्तराला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) यूएपीएसारखे कठोर कायदे मुळातच दहशतवाद,राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने हळूहळू त्यांचा विस्तार राजकीय मतभेद आणि वैचारिक संघर्षांपर्यंत झाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- विधानसभा निवडणुकांबाबतची अफवा: नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये निवडणुका होणार नाहीत!
- "नोकरी नाही, लग्न जमेना"; हताश ३२ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल; पुण्यात हळहळ
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान; जाणून घ्या अटी आणि पात्रता.
महाराष्ट्र
- विधानसभा निवडणुकांबाबतची अफवा: नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये निवडणुका होणार नाहीत!
- "नोकरी नाही, लग्न जमेना"; हताश ३२ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल; पुण्यात हळहळ
- नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान; जाणून घ्या अटी आणि पात्रता.
- महायुतीत सर्व काही आलबेल नाही? सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या बैठकीकडे मित्रपक्षांच्या मंत्र्यांची पाठ.
गुन्हा
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
- यवतमाळ: आईच्या वादाचा भीषण सूड! यवतमाळमधील बंद हॉस्पिटलच्या वऱ्हांड्यात स्टाफ नर्सची गळा चिरून हत्या; आरोपीला अटक.
- पुणे: आता वाचलीस, पुढच्या वेळी काटा काढू!: गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या महिलेवर कारने जीवघेणा हल्ला; पुण्यात खळबळ.
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.
- अमेरिकेला ठेंगा! रशियाकडून इंधन खरेदीत भारत जगात दुसरा, केली विक्रमी खरेदी; आकडे पाहून थक्क व्हाल.
- गोव्यात विरोधकांचे 'नशीब' फुटके; अंतर्गत मतभेदांमुळे गोवेकरांचा अपेक्षाभंग.
- तमिळनाडू: लज्जास्पद! डेटवर गेलेल्या विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तिघांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना बेड्या.


























Subscribe to my channel



