‘शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो... तुमच्यापैकी प्रत्येकाप्रमाणेच दरवर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थी आपल्या पाठीवरील बॅगपेक्षा कितीतरी मोठे ओझे घेऊन विद्यापीठात प्रवेश करतात. कधी वर्गात बसण्याची संधीच मिळाली नाही, अशा पालकांची स्वप्ने घेऊन काहीजण येतात. आजवर कुणीही पदवीदानाचा गाऊन परिधान केला नाही अशा कुटुंबातील काही जण असतात. अनेक जण स्वतः न निवडलेलीही जबाबदारी घेऊन आलेले असतात. तुमच्यापैकी कुणाचीही अशीच परिस्थिती असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही केवळ पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली नसते. तुम्ही आपल्या कुटुंबाच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहात.’ इंदूरमध्ये गुरुवारी सकाळी मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात अशाच शब्दांत केली. मी विद्यार्थ्यांना विचारले, ‘तुमच्यापैकी कुटुंबात प्रथमच पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे किती जण आहेत?’ तेव्हा अनेकांनी हात वर केले. त्यानंतर मी त्यांना एका व्यक्तीची कथा सांगितली. त्यांचा जन्म तामिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील एका छोट्या शेतकरी कुटुंबात झाला होता. त्या कुटुंबासाठी महत्त्वाकांक्षेपेक्षा जगणे अधिक महत्त्वाचे होते. त्यांचे वडील पहिलीनंतरच शाळा सोडून गेले होते. आई कधीच शाळेत गेली नव्हती. तिला नोटा मोजतानाही अडचण येत असे. घरात पुस्तके नव्हती. वीज नव्हती. मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. बीजगणित, भौतिकशास्त्र किंवा करिअरची निवड याविषयी समजावून सांगणारेही घरात कोणी नव्हते, कारण त्या वाटेवर आधी कुणी चाललेच नव्हते. त्यांनी कोणत्याही शिकवणीशिवाय आणि कौटुंबिक मदतीशिवाय सरकारी शाळेत शिक्षण घेतले. प्रवेश परीक्षा देण्यासाठी ते मद्रास (आताचे चेन्नई) येथे गेले. तेव्हा शिक्षकांनी त्यांना सांगितले, ‘परीक्षेवर लक्ष केंद्रित कर, इतरांच्या कपड्यांकडे नाही.’ त्यांनी तसेच केले आणि परतले. काही आठवड्यांनी एका रात्री रॉकेलचा दिवा विझल्यानंतर आई म्हणाली, ‘तुझ्यासाठी एक पत्र आले होते. ते छपराखालील बांबूमध्ये ठेवले आहे.’ त्यांनी पत्र उघडले, तर ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील ऑटोमोबाइल अभियांत्रिकीच्या प्रवेशाचे पत्र होते. पुढे हाच पहिल्या पिढीतील पदवीधर आर. वेलुसामी ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे अध्यक्ष बनले. आज वेलुसामी हजारो कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात. ते देशभर लोकप्रिय असलेल्या स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही-300, एक्सयूव्ही-700 आणि थार रॉक्ससारख्या गाड्या तयार करतात. आता 2026 मध्ये येऊया. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील बिशू लिम्बूने घरात विश्वासार्ह वीज किंवा इंटरनेट नसल्याने रॉकेलच्या दिव्याच्या मंद प्रकाशात नीट परीक्षेची तयारी केली. त्यांचे वडील छोटे शेतकरी आहेत. आई प्रत्येक रुपया जपून खर्च करत होती. मात्र डॉक्टरांचा पांढरा कोट फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठीच असतो, हे मान्य करण्यास बिशूने नकार दिला. त्याने नीट-2026 मध्ये 720 पैकी 610 गुण मिळवले आणि आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची तयारी करत आहे. आता राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील कापरेन गावातील सूरज सैनीकडे वळूया. तो बारावीपर्यंत हिंदी माध्यमात शिकला. सुट्यांमध्ये कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गावातील घरांना रंग देण्याचे काम करत असे. बारावीपर्यंत त्याला नीट परीक्षेबद्दल माहितीही नव्हती, कारण त्या मार्गावर आधी कुटुंबातील कोणी गेले नव्हते. पहिल्या प्रयत्नातून त्याला हे समजले की, योग्य दिशा नसेल तर केवळ मेहनत पुरेशी नसते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्याने अथक परिश्रम केले, 583 गुण मिळवले आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. फंडा असा की, तुमच्या प्रवेशपत्रावर फक्त तुमचे नाव असते; पण त्यातून घडणारे भविष्य संपूर्ण कुटुंबाचे असते. तुम्ही केवळ विद्यार्थी नसता तर नकाशा नसताना जंगलातून स्वतःचा मार्ग शोधणारे धाडसी वाटाडे असता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



