लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारतासाठी एखादी दूरदृष्टी असू शकते; मात्र ती नेमकी काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत नाही. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमध्ये भारताविषयीची त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली दिसत नाही. त्यांनी विविधतेचा, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता यांसारख्या सर्वपरिचित मुद्द्यांचाच पुनरुच्चार केला. उदाहरणार्थ- राहुल गांधी यांची आर्थिक दृष्टी काय आहे? एकविसाव्या शतकातील भारतासाठी त्यांची भू-राजकीय रूपरेषा काय आहे? शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी त्यांचे ठोस प्रस्ताव कोणते आहेत? त्यांच्या पत्रकार परिषदांचा केंद्रबिंदू प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, उद्योगपतींवर आरोप आणि ग्रेट निकोबारसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना विरोध हाच राहिला आहे. पण राहुल गांधी यांनी श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या अंतराळ केंद्राला भेट दिली आहे का? तेथून चांद्र मोहिमा प्रक्षेपित केल्या जातात. त्यांनी अलीकडेच 350 किलो वजनवाहू निम्न-पृथ्वी कक्षेतील उपग्रहांसह विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास घडवणाऱ्या स्कायरूट एअरोस्पेससह अनेक स्पेस-टेक स्टार्टअप्सशी संवाद साधला आहे का? पहिल्याच प्रयत्नात हे प्रक्षेपण यशस्वी झाले, तर स्पेसएक्सलाही पहिल्या प्रक्षेपणात सलग तीन अपयशांचा सामना करावा लागला होता. 18 जुलै रोजी स्कायरूटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खासगी क्षेत्रातून उपग्रह प्रक्षेपण क्षमता असलेला भारत अमेरिका आणि चीननंतर तिसरा देश ठरला. अंतराळ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वैद्यकीय उपकरणे अशा क्षेत्रांतील तरुणांची प्रगती दुर्लक्षित करून राहुल गांधी मूळ मुद्द्यापासून दूर जात आहेत. यापैकी अनेक नवकल्पना आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असून त्यावर गंभीर लक्ष, चर्चा व विचारमंथन होण्याची गरज आहे. भारताला असा सक्षम विरोधी पक्षनेता हवा. अशा नेत्याने देशासाठी सकारात्मक दिशा मांडावी; केवळ राजकीय वक्तव्यांपुरता स्वतःला मर्यादित ठेवणारा नव्हे. अलीकडील विद्यार्थी आंदोलनांदरम्यानही राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी कोणताही नवा प्रस्ताव मांडला नाही. नीट परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेतील (एनटीए) दीर्घकाळ प्रलंबित सुधारणा न झाल्याबद्दल सरकारलाच जबाबदार धरले जाईल. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण दबावामुळे सरकारला नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची कार्यबल समिती स्थापन करावी लागली. मात्र राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ पाठांतरावर नव्हे, तर त्यांच्या सर्जनशील विचारक्षमतेवर आधारित असावे, अशा शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर त्यांनी चर्चा केली नाही. नीट परीक्षा जेईईप्रमाणे पूर्णपणे डिजिटल करावी. कारण जेईईमध्ये कधीही प्रश्नपत्रिका फुटल्याची समस्या उद्भवली नाही, असा सल्लाही फारच कमी नेत्यांनी कार्यबल समितीला दिला. रस्त्यावरच्या आंदोलनांच्या दबावामुळे अनेकदा माघार घेणारे सरकार आहे. हे राहुल गांधी यांचे भाग्य म्हणावे लागेल. 2020 मधील शाहीन बाग आंदोलनादरम्यान अनेक महिने रस्ते बंद राहिले. त्यानंतर शेतकरी आंदोलनातही सरकारने माघार घेण्याचा आणि आंदोलकांना समाधान देण्याचा मार्ग स्वीकारला. आंदोलकांना शांत करण्याच्या सरकारच्या धोरणातून त्याची सर्वात मोठी कमकुवत बाजू समोर आली. विरोधकांनीही या कथित कमकुवतपणाचा फायदा घेण्यास वेळ लावला नाही. परिणामी संसदेतील चर्चेचाही स्तर खालावला. याच कारणामुळे प्रियंका गांधी यांनीही भावाच्या पावलावर पाऊल ठेवत कार्यबल समितीचे सदस्य, शास्त्रज्ञ आणि आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांच्यावर गोमूत्राच्या औषधी गुणांवरील त्यांच्या विश्वासाबाबत टीका केली. त्यामुळे खरा मुद्दाच मागे पडला—कार्यबल समिती नीट परीक्षा पूर्णपणे गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटण्यापासून सुरक्षित कशी करणार? विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातही नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुधारणांऐवजी राजकीय मुद्दा बनवण्यात आले. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अंतराळ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व वैद्यकीय उपकरणे अशा क्षेत्रांत तरुणांनी केलेल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून आपण मूळ मुद्द्यापासून भरकटत आहोत. यापैकी अनेक नवकल्पना आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




