भारताच्या लोकशाहीकडे केवळ निवडणुकीतील लढती किंवा संस्थांच्या कमकुवत होण्याच्या इशाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागलेल्यांसाठी गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी ताजेतवाने चित्र ठरल्या असाव्यात. ऑनलाइन उपरोध म्हणून सुरू झालेली घटना आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वाधिक उल्लेखनीय आणि यशस्वी तरुणांच्या नेतृत्वाखालील राजकीय आंदोलनांपैकी एक बनली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक गटाची घोषणा होती-‘आळशी आणि बेरोजगारांचा आवाज.’ मात्र काही दिवसांत हा गट समाजमाध्यमांवर प्रबळ शक्ती म्हणून उदयास आला. पाहता पाहता त्याचे अनुयायी भाजपपेक्षाही जास्त झाले. मात्र या विनोदामागील वास्तव म्हणजे त्याने समोर आणलेल्या खऱ्या तक्रारी होत्या. विद्यापीठातून पदवी घेतलेल्या तरुणांत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असतानाही उच्च शिक्षण हीच सामाजिक प्रगतीची एकमेव आशा असल्याचे त्यांना वाटते. ते स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक वर्षे घालवतात. मात्र प्रश्नपत्रिका फुटणे, मूल्यमापनातील अनियमितता व अचानक निकाल रद्द होणे यामुळे स्वप्नांवर घाला घातला जातो. यावर्षीही प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांना कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) पुन्हा द्यावी लागली. 3 मेची परीक्षा रद्द झाल्याचे समजल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा शोकांतिकांमुळेच आर्थिक चिंता व्यापक नैतिक संतापात बदलल्या.कॉक्रोच आंदोलन या संतापाचा आवाज बनले. या आंदोलनाशी कोणताही राजकीय पक्ष जोडलेला नव्हता. नागरी समाजातील वैचारिकदृष्ट्या विविध घटकांचा त्याला पाठिंबा होता. जूनपर्यंत हे आंदोलन समाजमाध्यमांमधून रस्त्यावर उतरले. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राजधानीसह प्रमुख शहरांत हजारो विद्यार्थी, नागरी सेवा परीक्षांचे उमेदवार व चिंतित लोक एकत्र आले. या आंदोलनाचे विकेंद्रित स्वरूप, शिक्षणासंबंधी चिंतांची प्रामाणिकता व संस्थात्मक जबाबदारीची नैतिक मागणी स्पष्ट दिसली. आंदोलक दिल्लीतील जंतर-मंतर येथे जमले. तेथून संसदेकडे मोर्चा काढण्याचे आवाहन केले. हे ठिकाण आंदोलनस्थळापासून अवघ्या दहा मिनिटांच्या पायी अंतरावर होते. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. अनेकांना रस्त्यावर मारहाण केली. पाण्याचे फवारे आणि कथितरीत्या पेलेट गनचाही वापर केला. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुमारे 180 जण जखमी झाले. मात्र त्यामुळे आंदोलन दडपले गेले नाही. उलट जनक्षोभ आणखी वाढला आणि आंदोलन अनेक शहरांमध्ये व गावांमध्ये पसरले. 2019 मधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन किंवा 2020-21 मधील शेतकरी आंदोलनाच्या तुलनेत या विद्यार्थी आंदोलनाला अल्पसंख्याकांच्या हक्कांपुरते किंवा मर्यादित हितसंबंधांचे आंदोलन म्हणून रंगवता आले नाही. कारण हे ‘कॉक्रोच’ एका समाजघटकाचे प्रतिनिधित्व करतात. तो मतदारसंख्येच्या जवळपास निम्मा भाग आहे. त्यातील बहुतांश कुटुंबे मध्यमवर्गीय आहेत. यात पारंपरिकरीत्या भाजपला मतदान करणाऱ्या कुटुंबांचाही समावेश आहे. सत्ताधारी पक्षासाठी हा वर्ग नाराज होणे म्हणजे निवडणुकीतील अपयशाला निमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळेच सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. भारतातील तरुणांनी नेत्यांना पुन्हा एकदा आठवण करून दिली की, राजकीय व्यवस्था शक्तिशाली झाली तरी ती जनतेच्या सामूहिक इच्छेकडे अनिश्चित काळ दुर्लक्ष करता येत नाही. संस्था कमकुवत करता येतात. राजकीय विरोधकांनाही दाबता येते; मात्र तरुणांच्या आंदोलनांना प्रेरणा देणाऱ्या त्या अस्वस्थ ऊर्जेला रोखता येत नाही. लोकशाही केवळ विधिमंडळ, न्यायालये, निवडणूक आयोग यांच्यातच नसते. ती नागरिकांवरही अवलंबून असते. नागरिकांनी दाखवून दिले की, लोकशाहीची भावना दडपशाहीपलीकडची आहे. कॉक्रोच आंदोलन हे सत्ताधाऱ्यांसाठी केवळ अल्पकालीन राजकीय डोकेदुखी नाही. कारण अनेक वर्षांच्या केंद्रीकरणानंतर व कार्यकारी सत्तेच्या वर्चस्वानंतरही भारतीय लोकशाहीतील अंतिम सत्ता जनतेकडेच राहते, या विश्वासाला त्याने पुन्हा बळ दिले. भारतातील जनता कुठेही जाणार नाही आणि आपली लोकशाहीही नाही. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) तरुणांच्या आंदोलनांना प्रेरणा देणाऱ्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवणे सोपे नसते. लोकशाही केवळ विधिमंडळ, न्यायालये, निवडणूक आयोग यांच्यापुरती मर्यादित नसून ती जनतेवरही अवलंबून असते. भारतातील जनतेने हेच दाखवून दिले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




