भारताच्या लोकशाहीकडे केवळ निवडणुकीतील लढती किंवा संस्थांच्या कमकुवत होण्याच्या इशाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागलेल्यांसाठी गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी ताजेतवाने चित्र ठरल्या असाव्यात. ऑनलाइन उपरोध म्हणून सुरू झालेली घटना आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वाधिक उल्लेखनीय आणि यशस्वी तरुणांच्या नेतृत्वाखालील राजकीय आंदोलनांपैकी एक बनली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक गटाची घोषणा होती-‘आळशी आणि बेरोजगारांचा आवाज.’ मात्र काही दिवसांत हा गट समाजमाध्यमांवर प्रबळ शक्ती म्हणून उदयास आला. पाहता पाहता त्याचे अनुयायी भाजपपेक्षाही जास्त झाले. मात्र या विनोदामागील वास्तव म्हणजे त्याने समोर आणलेल्या खऱ्या तक्रारी होत्या. विद्यापीठातून पदवी घेतलेल्या तरुणांत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असतानाही उच्च शिक्षण हीच सामाजिक प्रगतीची एकमेव आशा असल्याचे त्यांना वाटते. ते स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक वर्षे घालवतात. मात्र प्रश्नपत्रिका फुटणे, मूल्यमापनातील अनियमितता व अचानक निकाल रद्द होणे यामुळे स्वप्नांवर घाला घातला जातो. यावर्षीही प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांना कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) पुन्हा द्यावी लागली. 3 मेची परीक्षा रद्द झाल्याचे समजल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा शोकांतिकांमुळेच आर्थिक चिंता व्यापक नैतिक संतापात बदलल्या.कॉक्रोच आंदोलन या संतापाचा आवाज बनले. या आंदोलनाशी कोणताही राजकीय पक्ष जोडलेला नव्हता. नागरी समाजातील वैचारिकदृष्ट्या विविध घटकांचा त्याला पाठिंबा होता. जूनपर्यंत हे आंदोलन समाजमाध्यमांमधून रस्त्यावर उतरले. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राजधानीसह प्रमुख शहरांत हजारो विद्यार्थी, नागरी सेवा परीक्षांचे उमेदवार व चिंतित लोक एकत्र आले. या आंदोलनाचे विकेंद्रित स्वरूप, शिक्षणासंबंधी चिंतांची प्रामाणिकता व संस्थात्मक जबाबदारीची नैतिक मागणी स्पष्ट दिसली. आंदोलक दिल्लीतील जंतर-मंतर येथे जमले. तेथून संसदेकडे मोर्चा काढण्याचे आवाहन केले. हे ठिकाण आंदोलनस्थळापासून अवघ्या दहा मिनिटांच्या पायी अंतरावर होते. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. अनेकांना रस्त्यावर मारहाण केली. पाण्याचे फवारे आणि कथितरीत्या पेलेट गनचाही वापर केला. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुमारे 180 जण जखमी झाले. मात्र त्यामुळे आंदोलन दडपले गेले नाही. उलट जनक्षोभ आणखी वाढला आणि आंदोलन अनेक शहरांमध्ये व गावांमध्ये पसरले. 2019 मधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन किंवा 2020-21 मधील शेतकरी आंदोलनाच्या तुलनेत या विद्यार्थी आंदोलनाला अल्पसंख्याकांच्या हक्कांपुरते किंवा मर्यादित हितसंबंधांचे आंदोलन म्हणून रंगवता आले नाही. कारण हे ‘कॉक्रोच’ एका समाजघटकाचे प्रतिनिधित्व करतात. तो मतदारसंख्येच्या जवळपास निम्मा भाग आहे. त्यातील बहुतांश कुटुंबे मध्यमवर्गीय आहेत. यात पारंपरिकरीत्या भाजपला मतदान करणाऱ्या कुटुंबांचाही समावेश आहे. सत्ताधारी पक्षासाठी हा वर्ग नाराज होणे म्हणजे निवडणुकीतील अपयशाला निमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळेच सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. भारतातील तरुणांनी नेत्यांना पुन्हा एकदा आठवण करून दिली की, राजकीय व्यवस्था शक्तिशाली झाली तरी ती जनतेच्या सामूहिक इच्छेकडे अनिश्चित काळ दुर्लक्ष करता येत नाही. संस्था कमकुवत करता येतात. राजकीय विरोधकांनाही दाबता येते; मात्र तरुणांच्या आंदोलनांना प्रेरणा देणाऱ्या त्या अस्वस्थ ऊर्जेला रोखता येत नाही. लोकशाही केवळ विधिमंडळ, न्यायालये, निवडणूक आयोग यांच्यातच नसते. ती नागरिकांवरही अवलंबून असते. नागरिकांनी दाखवून दिले की, लोकशाहीची भावना दडपशाहीपलीकडची आहे. कॉक्रोच आंदोलन हे सत्ताधाऱ्यांसाठी केवळ अल्पकालीन राजकीय डोकेदुखी नाही. कारण अनेक वर्षांच्या केंद्रीकरणानंतर व कार्यकारी सत्तेच्या वर्चस्वानंतरही भारतीय लोकशाहीतील अंतिम सत्ता जनतेकडेच राहते, या विश्वासाला त्याने पुन्हा बळ दिले. भारतातील जनता कुठेही जाणार नाही आणि आपली लोकशाहीही नाही. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) तरुणांच्या आंदोलनांना प्रेरणा देणाऱ्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवणे सोपे नसते. लोकशाही केवळ विधिमंडळ, न्यायालये, निवडणूक आयोग यांच्यापुरती मर्यादित नसून ती जनतेवरही अवलंबून असते. भारतातील जनतेने हेच दाखवून दिले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



