लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारतासाठी एखादी दूरदृष्टी असू शकते; मात्र ती नेमकी काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत नाही. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमध्ये भारताविषयीची त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली दिसत नाही. त्यांनी विविधतेचा, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता यांसारख्या सर्वपरिचित मुद्द्यांचाच पुनरुच्चार केला. उदाहरणार्थ- राहुल गांधी यांची आर्थिक दृष्टी काय आहे? एकविसाव्या शतकातील भारतासाठी त्यांची भू-राजकीय रूपरेषा काय आहे? शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी त्यांचे ठोस प्रस्ताव कोणते आहेत? त्यांच्या पत्रकार परिषदांचा केंद्रबिंदू प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, उद्योगपतींवर आरोप आणि ग्रेट निकोबारसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना विरोध हाच राहिला आहे. पण राहुल गांधी यांनी श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या अंतराळ केंद्राला भेट दिली आहे का? तेथून चांद्र मोहिमा प्रक्षेपित केल्या जातात. त्यांनी अलीकडेच 350 किलो वजनवाहू निम्न-पृथ्वी कक्षेतील उपग्रहांसह विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास घडवणाऱ्या स्कायरूट एअरोस्पेससह अनेक स्पेस-टेक स्टार्टअप्सशी संवाद साधला आहे का? पहिल्याच प्रयत्नात हे प्रक्षेपण यशस्वी झाले, तर स्पेसएक्सलाही पहिल्या प्रक्षेपणात सलग तीन अपयशांचा सामना करावा लागला होता. 18 जुलै रोजी स्कायरूटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खासगी क्षेत्रातून उपग्रह प्रक्षेपण क्षमता असलेला भारत अमेरिका आणि चीननंतर तिसरा देश ठरला. अंतराळ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वैद्यकीय उपकरणे अशा क्षेत्रांतील तरुणांची प्रगती दुर्लक्षित करून राहुल गांधी मूळ मुद्द्यापासून दूर जात आहेत. यापैकी अनेक नवकल्पना आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असून त्यावर गंभीर लक्ष, चर्चा व विचारमंथन होण्याची गरज आहे. भारताला असा सक्षम विरोधी पक्षनेता हवा. अशा नेत्याने देशासाठी सकारात्मक दिशा मांडावी; केवळ राजकीय वक्तव्यांपुरता स्वतःला मर्यादित ठेवणारा नव्हे. अलीकडील विद्यार्थी आंदोलनांदरम्यानही राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी कोणताही नवा प्रस्ताव मांडला नाही. नीट परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेतील (एनटीए) दीर्घकाळ प्रलंबित सुधारणा न झाल्याबद्दल सरकारलाच जबाबदार धरले जाईल. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण दबावामुळे सरकारला नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची कार्यबल समिती स्थापन करावी लागली. मात्र राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ पाठांतरावर नव्हे, तर त्यांच्या सर्जनशील विचारक्षमतेवर आधारित असावे, अशा शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर त्यांनी चर्चा केली नाही. नीट परीक्षा जेईईप्रमाणे पूर्णपणे डिजिटल करावी. कारण जेईईमध्ये कधीही प्रश्नपत्रिका फुटल्याची समस्या उद्भवली नाही, असा सल्लाही फारच कमी नेत्यांनी कार्यबल समितीला दिला. रस्त्यावरच्या आंदोलनांच्या दबावामुळे अनेकदा माघार घेणारे सरकार आहे. हे राहुल गांधी यांचे भाग्य म्हणावे लागेल. 2020 मधील शाहीन बाग आंदोलनादरम्यान अनेक महिने रस्ते बंद राहिले. त्यानंतर शेतकरी आंदोलनातही सरकारने माघार घेण्याचा आणि आंदोलकांना समाधान देण्याचा मार्ग स्वीकारला. आंदोलकांना शांत करण्याच्या सरकारच्या धोरणातून त्याची सर्वात मोठी कमकुवत बाजू समोर आली. विरोधकांनीही या कथित कमकुवतपणाचा फायदा घेण्यास वेळ लावला नाही. परिणामी संसदेतील चर्चेचाही स्तर खालावला. याच कारणामुळे प्रियंका गांधी यांनीही भावाच्या पावलावर पाऊल ठेवत कार्यबल समितीचे सदस्य, शास्त्रज्ञ आणि आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांच्यावर गोमूत्राच्या औषधी गुणांवरील त्यांच्या विश्वासाबाबत टीका केली. त्यामुळे खरा मुद्दाच मागे पडला—कार्यबल समिती नीट परीक्षा पूर्णपणे गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटण्यापासून सुरक्षित कशी करणार? विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातही नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुधारणांऐवजी राजकीय मुद्दा बनवण्यात आले. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अंतराळ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व वैद्यकीय उपकरणे अशा क्षेत्रांत तरुणांनी केलेल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून आपण मूळ मुद्द्यापासून भरकटत आहोत. यापैकी अनेक नवकल्पना आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



