जय पवार यांची मोठी मागणी Image Credit source: social media
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबद्दलचं, त्यांच्या निधनाबद्दलचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. 28 जानेवारी रोजी ते मुंबईहून बारामतील विमानाने जात होते, मात्र लँडिंगदरम्यान ते वमान क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर त्यात आणखी काही स्फोट झाले. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचं निधन झालं, तसेच त्यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, विमानातील पायलटस को-पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांनीही जीव गमावला. VSR कंपनीचं हे खासगी विमान होतं. अजित दादांना जाऊन 20 पेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत, मात्र त्यांच्या या विमान अपघाताचं गूढ काही अजून उकललेलं नाहीये.
त्यातच त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह अनेक नेत्यांनी, अगदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनीदेखील हा अपघात नसून घातपात नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. रोह्त पवार यांनी तर अनेक पत्रकार परिषदा घेत अपघातासंबंधी काही मुद्दे उपस्थित केले, त्यातील काही त्रुटी दाखवून दिल्या आणि काही पुरावे सादर करत हा घातपात असू शकतो अशी सपष्ट शंका बोलून दाखवली. त्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
तसेच अपघातग्रस्त विमान ज्या व्हीएस आर कंपनीचं आहे, त्यासंदर्भतही रोहित पवार यांनी कंपनीच्या मालकाबद्दलही काही दावे केले. तसेच सत्तेतल्या काही लोकांकडून कंपनी वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही त्यांनी लावला. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली.
जय पवार यांनी केली मोठी मागणी
याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांचा मुलगा, जय पवार यांनीही या विषयावर पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं आहे. जय पवार यांनी काही तासांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली असून ती खूप चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा एक फोटो टाकला असून त्यासह काही जकूरही पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी ब्लॅक बॉक्सबद्दलही लिहील आहे. तसेच VSR कंपनीला उड्डाण चालवण्यास बंदी घालण्याची मोठी मागणीही त्यांनी केली आहे. या पोस्टसह अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पहिल्यांदाच अजित दादांच्या अपघातावर जाहीरपणे प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
काय आहे जय पवार यांची पोस्ट ?
” विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, ” असं जय पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. जय पवार यांनीही व्हीएसआरच्या चौकशीची मागणी करत, रोहित पवार यांच्याप्रमाणे भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




