काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर अर्शदीपसिंहने तिलक वर्माच्या त्वचेच्या रंगाची खिल्ली उडवल्याबाबतची एक पोस्ट पाहिली. तिलकने ती गोष्ट सहजपणे टाळली आणि सोशल मीडियावरही त्याकडे सामान्य पद्धतीनेच पाहिले गेले. पण हीच खरी समस्या आहे. आपण अशा गोष्टींना सामान्य मानतो. कारण त्याबाबत आपण पुरेसे संवेदनशील नाही. समस्या फक्त अर्शदीपपुरती मर्यादित नाही. ही भारतीय समाजाची समस्या आहे आणि आपण सगळ्यांनीच ‘यात एवढे काय मोठे आहे’ असे म्हणत ती स्वीकारली आहे. धनराज पिल्ले यांचे उदाहरण घ्या. पिल्ले जेव्हा चर्चेत आले, तेव्हा त्यांनी आपल्या प्रतिभेने सगळ्यांना थक्क केले होते. त्यांना रोखणे अशक्य वाटत होते. पण हॉकी सामन्यांमध्ये त्यांच्या त्वचेच्या रंगावर टिप्पणी करणारे शब्द सतत ऐकू येत होते. स्वतः पिल्ले यांनी मला ही घटना सांगितली होती. तेव्हाही त्यांना त्यात काही असामान्य वाटले नव्हते. उलट ते सामान्यच मानले गेले. कारण आपण असेच बोलतो, मग त्यात एवढे मोठे काय आहे? यामध्ये कोलकात्यात खेळून करिअर घडवणाऱ्या नायजेरियन फुटबॉलपटूंचाही मुद्दा जोडता येईल. त्यांच्यापैकी काही आजही खूप लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करणे थांबवले नाही. चीमा ओकोरी याचे उदाहरण आहेत. ते भारतात खेळलेले सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. पण त्यांनाही ‘काळा चित्ता’ असे म्हटले जात होते. हे सर्व इतके सामान्य झाले आहे की अशा शब्दांच्या वापरात आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. कदाचित अर्शदीप सिंहला मर्यादा कुठे आखायची हे समजले नसेल. त्याच्यासाठी हे सर्व फक्त विनोद आणि हलकीफुलकी चेष्टा असू शकते. अगदी तिलक वर्मालाही कदाचित यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजले नसेल, म्हणून त्याने ते प्रकरण तिथेच सोडून दिले. पण अशा प्रकरणांमध्ये आपल्याला अधिक शिक्षण आणि संवेदनशीलतेची गरज आहे आणि हे जितक्या लवकर होईल तितके भारतासाठी चांगले ठरेल. आजही आपण कोलकात्यात एखादा सप्ताहांताचा सामना पाहायला गेलो. व एखादा आफ्रिकन खेळाडू खेळत असेल तर जवळपास निश्चित आहे की एखादा प्रेक्षक त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करेल. अशावेळी त्या खेळाडूची जबाबदारी आहे की त्याने लगेच ही बाब रेफरीच्या लक्षात आणून द्यावी. पण तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचेही कर्तव्य आहे की अशा व्यक्तीला थांबवावे आणि समज द्यावी. हे एक सामूहिक अभियान असायला हवे, जे फक्त अधिकारी आणि प्रशासकांवर सोडून चालणार नाही. आपल्याकडे अशा लोकांची मोठी संख्या आहे. हे लोक त्वचेच्या रंगावरून अपमान करणे हा आपला विशेषाधिकार समजतात. शतकानुशतके आपल्याला या विषाणूवर कोणतीही लस सापडली नाही, पण आता ती विकसित करण्याची वेळ आली आहे. खेळाडूंनीही या वाईट प्रवृत्तीविरोधात एकजूट दाखवून केवळ प्रतीकात्मकतेपलीकडे जाऊन वर्णद्वेष सहन केला जाणार नाही, हा निर्धार प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वर्णद्वेषी टिप्पण्यांचे बळी ठरलेले पण बोलणे टाळत राहिले तेही या वाईट प्रवृत्तीला वाढवण्याइतकेच दोषी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की मानवी सन्मानापुढे खेळाची कोणतीही किंमत नाही आणि समाजाप्रती त्यांचीही जबाबदारी आहे.आगामी काळात बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात- जिथे खेळाडूंवर सतत चाहते आणि इतर लोकांची नजर असते- त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सजग राहण्याची गरज आहे. पूर्वी अशा गोष्टी बोलल्या जात असल्या तरी त्या सार्वजनिक होत नव्हत्या. कारण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर येत नव्हती. पण आता एक्स आणि इन्स्टाग्रामवरच संपूर्ण आयुष्य जगले जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ यातील फरक स्पष्टपणे समजावून सांगणारा ओरिएंटेशन कोर्स उपयुक्त ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बीसीसीआय आणि फ्रँचायझींनी संवेदनशीलतेवर आधारित ओरिएंटेशन कोर्स सुरू करण्याचा विचार करायला हवा. सोशल मीडियाच्या या काळात खेळाडूंनी पूर्वीपेक्षा अधिक सजग राहण्याची गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




