राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला जे जमलेनाही, ते त्यांनी कर्नाटकात करून दाखवले.राजस्थानमध्ये पक्षाने अशोक गेहलोत आणि सचिनपायलट यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवण्याचेआश्वासन दिले होते, मात्र गेहलोत यांनी तसे होऊ दिलेनाही. त्यांनी तर पक्षालाच आव्हान दिले होते. पक्षश्रेष्ठीपायलट यांना राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बनवूशकले नाहीत, जेणेकरून ते 2028 च्या निवडणुकीतमुख्यमंत्रिपदाचे नैसर्गिक उत्तराधिकारी बनू शकतील.याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये जेव्हा पक्षाने निम्म्याकार्यकाळासाठी टी.एस. सिंहदेव यांच्याकडे राज्याचीधुरा सोपवण्याचा विचार केला, तेव्हा बहुतांशआमदारांचा पाठिंबा असलेल्या भूपेश बघेल यांनीहीअसा प्रयत्न हाणून पाडला होता. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला गटबाजीचा फटकासहन करावा लागला आणि 2023 मध्ये त्यांनी सत्ता गमावली. याउलट, कर्नाटकात सत्ता हस्तांतरण शांततेतपार पडले. याचे श्रेय सिद्धरामय्या यांना जाते, जे आपल्या उपमुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडण्यासतयार झाले. या वेळी पक्षश्रेष्ठींनाही नेमकं काय हवंययाबाबत स्पष्टता होती. शीर्ष नेतृत्वामध्ये एकजूट आणिआपला निर्णय मान्य करून घेण्याची ठाम भूमिका दिसूनआली. दक्षिणेत काँग्रेसचा वाढता दबदबा पाहता,कर्नाटकबाबत त्यांचे डावपेच आता अधिक महत्त्वाचेठरत आहेत. गेहलोत आणि बघेल यांच्याप्रमाणेचसिद्धरामय्या यांच्याकडेही समर्थक आमदारांचे बहुमतहोते. मात्र त्यांनी बंडखोरी करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींच्यासूचनेचे पालन करणे पसंत केले. भविष्यात त्यांना याचाराजकीय फायदा मिळो वा न मिळो, पण त्यांनी आपलीविश्वासार्हता नक्कीच निर्माण केली आहे. त्यांना माहीतहोते की डी.के. शिवकुमार केंद्रीय नेतृत्वावर दबावआणत आहेत. अशा स्थितीत सिद्धरामय्या आणिडीकेएस यांच्यासह काँग्रेससाठीही परिस्थिती गोंधळाचीठरू शकली असती. एका वेळी तर डीकेएस यांचीभाजपशीही जवळीक वाढत असल्याच्या बातम्याआल्या होत्या. कुरुबा ओबीसी समुदायातील सिद्धरामय्याहे जनाधार असलेले नेते आहेत आणि ते ‘अहिंदा’(मागास, अल्पसंख्याक, दलित) आघाडीचे शिल्पकारमानले जातात, ज्याने काँग्रेसला मजबूत स्थितीत ठेवले.याच जोरावर सिद्धरामय्या दोनदा विरोधी पक्षनेते आणिदोनदा मुख्यमंत्रीही राहिले. त्यांचे राजकीय वजन आणिओबीसी ओळख यामुळेच राहुल गांधी सतत त्यांनापाठिंबा देत राहिले आहेत. मात्र आता उद्या म्हणजेच 3जून रोजी डीकेएस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणित्यांच्या नावाचा प्रस्ताव सिद्धरामय्या यांनीच मांडलाहोता. सिद्धरामय्या यांनी पद सोडले याचा अर्थ तेराजकारणही सोडत आहेत असा काढता येणार नाही.याउलट, आपण आमदार म्हणून कर्नाटकात सक्रियराहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षानेत्यांना राज्यसभेच्या जागेची ऑफर दिली होती, मात्रत्यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्यास नकार दिला. असेअसले तरी, जर काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीऑफर दिली तर ते तीही नाकारतील की नाही, हे सांगणेकठीण आहे. खरगे यांचा कार्यकाळ लवकरच संपणारआहे आणि अशा परिस्थितीत ओबीसी समाजातूनआलेला एखादा अध्यक्ष राहुल यांच्या राजकारणालानवी गती देऊ शकतो. मुख्यमंत्रिपद सोडण्यापूर्वी काही तास आधीचसिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील जातीय जनगणनेलामंजुरी दिली, ज्याचे आदेश त्यांनीच 202५ मध्ये दिलेहोते. असे करून त्यांनी डीकेएस यांच्यासमोर एककठीण राजकीय आव्हान उभे केले आहे. जर डीकेएसयांनी हे स्वीकारले, तर त्यांचा स्वतःचा वोक्कलिगासमाज नाराज होऊ शकतो. जर त्यांनी हे बासनातगुंडाळले, तर ओबीसी समाज नाराज होऊन पुन्हासिद्धरामय्या यांच्या बाजूने उभा राहू शकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
कर्नाटकचे उदाहरण हे सांगते की,काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याची वेळ येतेतेव्हा राहुल आणि प्रियांका आता अधिकसमन्वयाने काम करत आहेत. यामुळेदक्षिण भारतात काँग्रेसने स्वतःला अधिकबळकटी दिली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



