नवनीत गुर्जर यांचा कॉलम:दात घशात घालण्याचा काळ

ऋतू, गाणी आणि लोकगीते आता जवळपास एकसुरी‎झाली आहेत.‎ कोणता प्रदेश, कोणते शहर आणि कोणती गल्ली कोरडी‎राहील अन् कोणती गल्ली भिजून जाईल, हे आता‎सांगताच येत नाही.‎ कधी पावसाची अखंड रिपरिप पाहिलीच नसलेल्या‎प्रदेशांच्या आशा ढगांच्या भिंतींवर आदळून जणू‎रक्तबंबाळ होत होत्या, तिथे आता ढग मनसोक्त बरसत‎आहेत.‎ जिथे सात-सात, आठ-आठ दिवस संततधार असायची,‎तिथे आता दुष्काळ पडला आहे.‎ हा सप्टेंबरचा महिना आहे. कासचे फूल फुलू लागले.‎पावसाचा जोरही ओसरला असला, तरी हवामानाचा हा‎खेळ सुरूच आहे. - //"फूले काश सकल महि छाई, जनु‎वर्षाकृत प्रकट बुढ़ाई।''‎ खरे तर गाणी आणि लोकगीतेसुद्धा याच ऋतूसारखी‎असतात. कोणता माणूस कोणत्या देशात किंवा प्रदेशात‎जाऊन गाण्यांचा अथवा लोकगीतांचा विषय बनेल, हे‎सांगता येत नाही. पुस्तके सांगतात- ग्रीसमध्ये सिकंदर‎आणि त्याच्या चंदनाच्या खुर्चीबद्दल अनेक गाणी‎लिहिली गेली. साहजिकच ही गाणी तिथल्या‎मॅसेडोनियातून आली असतील. पण भारतात मात्र तो एक ‎‎आक्रमणकर्ता होता. म्हणूनच इथल्या लोकगीतांमध्ये ‎‎त्याच्याबद्दल कडवटपणाच पाहायला मिळतो. आणि तो ‎‎असणारच होता.‎ याउलट किस्सा इज्जत बेगचा आहे. तो आपल्या देशात ‎‎आला. त्याचे कुंभाराच्या एका सुंदर मुलीवर प्रेम जडले. ‎‎तेव्हा आपण त्याच्यावर अनेक गाणी रचली. समरकंदच्या ‎‎लोकांना विचारले गेले की, तुम्हीही असे काही लिहिले‎आहे का? तेव्हा उत्तर आले- आमच्या देशात तर तो फक्त ‎‎एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. त्यापलीकडे‎काहीही नाही. प्रेमी तर तो तुमच्या देशात जाऊन बनला. ‎‎त्यामुळे गाणी तुम्हालाच लिहायची होती. आम्ही कशी ‎‎लिहिणार? गाणी, लोकगीते आणि ऋतूवरून आठवले‎की, सध्या राजकारणातही या तिन्हींना एकत्र करून एक‎नवा इतिहास लिहिला जात आहे. हा इतिहास लिहिणारी‎आहे आजची नवी पिढी, म्हणजेच जेन-झी आणि ‎‎जेन-अल्फा. थोडक्यात सांगायचे तर आजचा तरुण‎आणि किशोरावस्थेतील वर्ग. त्यांच्यात प्रचंड जोश आहे. ‎‎व्यवस्थेविरुद्ध, खास करून गैरव्यवस्थेविरुद्ध त्यांच्या‎मनात तीव्र राग आहे. ते आपला हा राग व्यक्तही करत‎आहेत. पूर्ण ताकदीने. लहान-लहान मुले मोठमोठ्या ‎‎अधिकाऱ्यांकडून आणि नेत्यांकडून आपल्या मागण्या‎मान्य करून घेत आहेत. त्यांच्या मागण्या तरी किती‎छोट्या आहेत! पोत्यांऐवजी बसायला बाकडे, शाळेच्या‎इमारतीची दुरुस्ती, शाळेपर्यंतचा रस्ता इत्यादी.‎ नेते, राज्यकर्ते आणि राजकीय पक्ष आता त्यांना‎चुचकारण्यात, समजावण्यात आणि त्यांचे मन‎वळवण्यात व्यग्र आहेत. पण हे तरुण मात्र कोणत्याही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎परिस्थितीत झुकायला तयार नाहीत. कारण पायांच्या‎आवाजाची सवय असणाऱ्या गल्ल्याही संध्याकाळ‎होताच शांत होऊन झोपी जायच्या. ते दिवस आता गेले.‎ पूर्वजांच्या डोळ्यांतील भाव जुन्या वडाच्या झाडासारखे‎शांत असायचे. ते दिवस आता उरले नाहीत.‎ खरे तर वयाचा हा असा टप्पा असतो, जिथे आतापर्यंतचे‎ओळखीचे जग अंगावरील कपड्यांसारखे घट्ट आणि‎तोकडे वाटू लागते. ओठ आयुष्याच्या तहानलेल्या आशेने‎कोरडे पडतात. आकाशातील ताऱ्यांकडे सप्तर्षींच्या रूपात‎पाहून हात जोडायचे असतात. त्यांना जवळ जाऊन स्पर्श‎करावासा वाटतो. आजूबाजूला, दूरवरच्या हवेत इतके‎नकार, इतकी बंधने आणि इतका विरोध असतो की,‎श्वासांमध्ये रागाची ठिणगी पडते.‎ आपल्या या संतापाची ठिणगी हे तरुण ईव्हीएममध्ये‎ओततील त्या दिवशी राजकीय पक्षांची पाचावर धारण‎बसेल. हाच धाक आता प्रत्येक राजकीय पक्षाला सतावत‎आहे. नेत्यांनी आणि पक्षांनी सत्तेच्या लालसेपोटी दगडांवर‎घासून आपल्या इच्छांचे दात धारदार केले होते. तेच दात‎आता घशात जाऊ लागले आहेत.‎ पण राजकीय पक्ष कदाचित येत्या काळात या तरुणांचा‎राग शांत होईल अशी खेळी खेळतील. कारण राजकारण‎काहीही करू शकते. नातेसंबंध, भाऊ-बहीण,‎आप्तस्वकीय या राजकारणासाठी नेहमीच सोयीनुसार‎ओळखीचेही असतात. अनोळखीही.‎ वेळ येईल तसा राग आळवला जातो. तशीच भांडणे‎उकरून काढली जातात.‎ येणाऱ्या काळाबद्दल मात्र निश्चित असे काहीही सांगता‎येत नाही. कारण माणसाला चालायला फक्त दोनच पाय‎असतात, पण नशिबाला मात्र हजारो पाय असतात!‎ तरुण वर्ग आपला असंतोष‎ ईव्हीएममध्ये ओतील तेव्हा...‎तरुण वर्ग आपला असंतोष ईव्हीएममध्ये‎ओतील त्या दिवशी राजकीय पक्षांची‎पाचावर धारण बसेल. हाच धाक आता‎प्रत्येक राजकीय पक्षाला सतावत आहे.‎राजकीय पक्ष कदाचित वेळ निघून‎जाण्यासोबत या तरुणांचा राग शांत होईल‎अशी काही खेळी खेळतील. कारण‎राजकारण काहीही घडवून आणू शकते.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *