ऋतू, गाणी आणि लोकगीते आता जवळपास एकसुरीझाली आहेत.
कोणता प्रदेश, कोणते शहर आणि कोणती गल्ली कोरडीराहील अन् कोणती गल्ली भिजून जाईल, हे आतासांगताच येत नाही.
कधी पावसाची अखंड रिपरिप पाहिलीच नसलेल्याप्रदेशांच्या आशा ढगांच्या भिंतींवर आदळून जणूरक्तबंबाळ होत होत्या, तिथे आता ढग मनसोक्त बरसतआहेत.
जिथे सात-सात, आठ-आठ दिवस संततधार असायची,तिथे आता दुष्काळ पडला आहे.
हा सप्टेंबरचा महिना आहे. कासचे फूल फुलू लागले.पावसाचा जोरही ओसरला असला, तरी हवामानाचा हाखेळ सुरूच आहे. - //"फूले काश सकल महि छाई, जनुवर्षाकृत प्रकट बुढ़ाई।''
खरे तर गाणी आणि लोकगीतेसुद्धा याच ऋतूसारखीअसतात. कोणता माणूस कोणत्या देशात किंवा प्रदेशातजाऊन गाण्यांचा अथवा लोकगीतांचा विषय बनेल, हेसांगता येत नाही. पुस्तके सांगतात- ग्रीसमध्ये सिकंदरआणि त्याच्या चंदनाच्या खुर्चीबद्दल अनेक गाणीलिहिली गेली. साहजिकच ही गाणी तिथल्यामॅसेडोनियातून आली असतील. पण भारतात मात्र तो एक आक्रमणकर्ता होता. म्हणूनच इथल्या लोकगीतांमध्ये त्याच्याबद्दल कडवटपणाच पाहायला मिळतो. आणि तो असणारच होता.
याउलट किस्सा इज्जत बेगचा आहे. तो आपल्या देशात आला. त्याचे कुंभाराच्या एका सुंदर मुलीवर प्रेम जडले. तेव्हा आपण त्याच्यावर अनेक गाणी रचली. समरकंदच्या लोकांना विचारले गेले की, तुम्हीही असे काही लिहिलेआहे का? तेव्हा उत्तर आले- आमच्या देशात तर तो फक्त एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. त्यापलीकडेकाहीही नाही. प्रेमी तर तो तुमच्या देशात जाऊन बनला. त्यामुळे गाणी तुम्हालाच लिहायची होती. आम्ही कशी लिहिणार? गाणी, लोकगीते आणि ऋतूवरून आठवलेकी, सध्या राजकारणातही या तिन्हींना एकत्र करून एकनवा इतिहास लिहिला जात आहे. हा इतिहास लिहिणारीआहे आजची नवी पिढी, म्हणजेच जेन-झी आणि जेन-अल्फा. थोडक्यात सांगायचे तर आजचा तरुणआणि किशोरावस्थेतील वर्ग. त्यांच्यात प्रचंड जोश आहे. व्यवस्थेविरुद्ध, खास करून गैरव्यवस्थेविरुद्ध त्यांच्यामनात तीव्र राग आहे. ते आपला हा राग व्यक्तही करतआहेत. पूर्ण ताकदीने. लहान-लहान मुले मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून आणि नेत्यांकडून आपल्या मागण्यामान्य करून घेत आहेत. त्यांच्या मागण्या तरी कितीछोट्या आहेत! पोत्यांऐवजी बसायला बाकडे, शाळेच्याइमारतीची दुरुस्ती, शाळेपर्यंतचा रस्ता इत्यादी.
नेते, राज्यकर्ते आणि राजकीय पक्ष आता त्यांनाचुचकारण्यात, समजावण्यात आणि त्यांचे मनवळवण्यात व्यग्र आहेत. पण हे तरुण मात्र कोणत्याहीपरिस्थितीत झुकायला तयार नाहीत. कारण पायांच्याआवाजाची सवय असणाऱ्या गल्ल्याही संध्याकाळहोताच शांत होऊन झोपी जायच्या. ते दिवस आता गेले.
पूर्वजांच्या डोळ्यांतील भाव जुन्या वडाच्या झाडासारखेशांत असायचे. ते दिवस आता उरले नाहीत.
खरे तर वयाचा हा असा टप्पा असतो, जिथे आतापर्यंतचेओळखीचे जग अंगावरील कपड्यांसारखे घट्ट आणितोकडे वाटू लागते. ओठ आयुष्याच्या तहानलेल्या आशेनेकोरडे पडतात. आकाशातील ताऱ्यांकडे सप्तर्षींच्या रूपातपाहून हात जोडायचे असतात. त्यांना जवळ जाऊन स्पर्शकरावासा वाटतो. आजूबाजूला, दूरवरच्या हवेत इतकेनकार, इतकी बंधने आणि इतका विरोध असतो की,श्वासांमध्ये रागाची ठिणगी पडते.
आपल्या या संतापाची ठिणगी हे तरुण ईव्हीएममध्येओततील त्या दिवशी राजकीय पक्षांची पाचावर धारणबसेल. हाच धाक आता प्रत्येक राजकीय पक्षाला सतावतआहे. नेत्यांनी आणि पक्षांनी सत्तेच्या लालसेपोटी दगडांवरघासून आपल्या इच्छांचे दात धारदार केले होते. तेच दातआता घशात जाऊ लागले आहेत.
पण राजकीय पक्ष कदाचित येत्या काळात या तरुणांचाराग शांत होईल अशी खेळी खेळतील. कारण राजकारणकाहीही करू शकते. नातेसंबंध, भाऊ-बहीण,आप्तस्वकीय या राजकारणासाठी नेहमीच सोयीनुसारओळखीचेही असतात. अनोळखीही.
वेळ येईल तसा राग आळवला जातो. तशीच भांडणेउकरून काढली जातात.
येणाऱ्या काळाबद्दल मात्र निश्चित असे काहीही सांगतायेत नाही. कारण माणसाला चालायला फक्त दोनच पायअसतात, पण नशिबाला मात्र हजारो पाय असतात! तरुण वर्ग आपला असंतोष ईव्हीएममध्ये ओतील तेव्हा...तरुण वर्ग आपला असंतोष ईव्हीएममध्येओतील त्या दिवशी राजकीय पक्षांचीपाचावर धारण बसेल. हाच धाक आताप्रत्येक राजकीय पक्षाला सतावत आहे.राजकीय पक्ष कदाचित वेळ निघूनजाण्यासोबत या तरुणांचा राग शांत होईलअशी काही खेळी खेळतील. कारणराजकारण काहीही घडवून आणू शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: मी मनोज जरांगेंवर बोलणे का टाळतोय? छगन भुजबळांनी स्वतःच सांगितलं कारण, सरकारलाही खडा सवाल
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान




























Subscribe to my channel




