अंबरनाथमध्ये उपचारादरम्यान एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झालेल्या डॉ. स्वप्नाली गायकर यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक छळामुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप डॉक्टर गायकर यांनी केला आहे. सध्या त्यांच्यावर उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकी घटना काय?
अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या विजय विनोद जयस्वाल या ६ वर्षीय मुलाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. डॉ. स्वप्नाली गायकर या त्याच्यावर उपचार करत होत्या. ७ फेब्रुवारी रोजी उपचारांदरम्यान त्या मुलाला सलाईन लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिथे त्याचा मृत्यू झाला. यानंतर मुलाच्या पालकांनी डॉ. गायकर यांच्यावर चुकीच्या उपचारांचा आणि हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला.
डॉक्टरांचा आरोप काय?
डॉ. स्वप्नाली गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवाल (PM Report) येणे अद्याप बाकी आहे. असे असतानाही प्रवीण गोसावी, संदीप भरड, वैशाली नलावडे आणि मिलिंद मगर या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणतीही अधिकृत तक्रार नसताना त्यांना टार्गेट केले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आणि सातत्याने मानसिक दडपण आणून बदनामी केल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. याप्रकरणी कायदेशीर मार्गाने तपास व्हावा, पण अशा प्रकारे विनाकारण बदनामी करून मला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे, असे डॉ. स्वप्नाली गायकर यांनी म्हटले.
तर दुसरीकडे, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असून आपल्या चुकीच्या कामावर पडदा टाकण्यासाठी डॉक्टर ड्रामा करत आहेत, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असून आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या सर्व प्रकरणाची अंबरनाथ पोलीस चौकशी करत आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
[embedded content]
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



