ऑस्कर विजेते संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेवरून मांडलेल्या मतामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यावर आपापली मतं मांडली आणि त्यापैकी काहींनी रेहमान यांना चुकीचंही ठरवलं. इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या आठ वर्षांत मला काम मिळालं नाही, असं रेहमान यांनी म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायिका अनुराधा पौडवाल यांनी रेहमान यांच्या वक्तव्यावर आपलं मत मांडलं आहे. “ए. आर. रेहमान यांना मी त्यांच्या संगीतातूनच ओळखते. मी कधीच त्यांना वैयक्तिकरित्या भेटले नाही. पण त्यांचं संगीत सांगतं की ते अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत”, असं अनुराधा म्हणाल्या.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “मी या इंडस्ट्रीचीच आहे आणि मी अनेकदा पाहिलंय की जेव्हा एखादा कलाकार, मग ते ए. आर. रेहमानच नाही तर कोणताही कलाकार मुलाखतीसाठी बसतो, तेव्हा मुलाखत घेणारे सहसा अशाप्रकारे प्रश्न तयार करून विचारतात, जेणेकरून त्यांना अपेक्षित असं उत्तर मिळेल. मीडिया, चॅनल्स यांना थेट किंवा सरळ मुलाखती आवडत नाहीत. कारण त्यांना दुसरं काहीतरी हवं आहे. रेहमान यांनी या संगीत विश्वात भरभरून योगदान दिलं आहे, त्यामुळे यांसारख्या वादापेक्षा ते मोठे आहेत.”
“ए. आर. रेहमान यांनी आपल्याला खूप मोठे आकडे दिले आहेत आणि या सर्व वादांच्या पलीकडचे ते आहेत. त्यांनी खूप काही मिळवलंय. त्यामुळे ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे कोणीही येऊन त्यांच्या करिअरला प्रभावित करू शकतील. एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मला हेच वाटतं. त्यांनी गाण्यांमधून खूप कमाल काम केलंय, त्यामुळे या वादाला काहीच अर्थ नाही”, असं मत अनुराधा पौडवाल यांनी मांडलंय.
याआधी ‘IANS’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले होते, “जातीय मुद्दे हे गेल्या बऱ्याच काळापासून समाजात चर्चेत आहेत आणि जे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करतात त्यांना अशा वादविवादांनी काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे मी हेसुद्धा सांगू इच्छितो की एखाद्याच्या एकाच विधानाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करून तो एक मोठा मुद्दा बनवू नका. जे लोक त्यांचं काम जाणतात, ते याने प्रभावित होत नाहीत. ते त्यांच्या कलेवर लक्ष केंद्रीत करतात. ज्यांना राजकारण करायचं आहे ते तेच करतात.”
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
