रुग्णालयात दाखल केलेल्या माझ्या एका नातेवाइकाला कधी डिस्चार्ज मिळेल, असा प्रश्न मी बुधवारी डॉक्टरांना विचारला. डॉक्टर म्हणाले, एवढी घाई का? मी म्हणालो, घाई नाही, पण मला गुरुवार आणि शुक्रवारी माझ्या काकांच्या 80 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. सुशिक्षित व्यक्ती एखाद्याच्या आजारापेक्षा उत्सवाला प्राधान्य देत आहे, अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग आपण 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे इतक्या थाटामाटात का साजरे करतो, हे त्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आकडे आध्यात्मिक आहेत की केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर महाभारतातील राजा ययातीच्या कथेत आहे. ययातीने जीवन पूर्णत्वाने जगले - सत्ता, सुख, यश आणि सर्वकाही. पण अचानक वृद्धत्वाची सुरुवात झाल्याने त्याला धक्का बसला. खोलवर आत्मपरीक्षण केल्यानंतर त्याला जाणवले की “सुखाला मर्यादा असतात, पण इच्छा कधीच संपत नाहीत.’ ही गोष्ट उमगल्यानंतर ययातीचे जीवन बदलले. त्यांनी म्हातारपण स्वीकारले. स्पष्ट केले की जीवनात पाच अंतर्गत वळणे असतात - ती वयावर नव्हे तर शहाणपणावर आधारित असतात. ही वळणे 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे वयाच्या भारतीय परंपरांशी संबंधी आहेत. त्यांची व्याख्या खालीलप्रमाणे आहे- 60 व्या वर्षी षष्ट्यब्दीपूर्ती : 60 व्या वर्षी काहीतरी बदलते - शरीरात नाही तर प्राधान्यक्रमांमध्ये. “मी आणखी किती साध्य करू शकतो?’ हा प्रश्न नाहीसा होऊ लागतो. त्याच्या जागी प्रश्न येतो, “आता खरोखर काय महत्त्वाचे आहे?’ तुमचे मन संचयातून समजून घेण्याकडे जाते. आत्ममंथन सुरू होते. आता आवाज, प्रशंसा किंवा बाह्य प्रमाणीकरणाची गरज नाही. शोध स्पष्टतेचा आहे. ही कमकुवतपणा नाही तर महत्त्वाकांक्षेसह येणारी परिपक्वता आहे. 70 व्या वर्षी भीमरथ शांती : स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते. तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. युक्तिवाद आकर्षक वाटत नाहीत. युक्तिवाद जिंकण्यापेक्षा नातेसंबंध जपणे अधिक महत्त्वाचे बनते. असे दिसते की शांत राहणे बरोबर असण्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. 80 व्या वर्षी शताभिषेकम : तुमची केवळ उपस्थिती सांत्वन देते. 80 व्या वर्षी लोक सल्ला घेण्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोलवर शोधतात - जीवन जगता येते आणि समजून घेतले जाऊ शकते याची खात्री. या वयात तुमची उपस्थिती स्वतःच एक आशीर्वाद बनते. शब्दांची गरज नसते. तुमची उपस्थितीच सांगते की सर्वकाही ठीक आहे. म्हणूनच वयाचा ऐंशीचा टप्पा पवित्र मानला जातो. 90 व्या वर्षी नवती : येथे काहीतरी दुर्मिळ घडते. अहंकार नाहीसा होतो. तुम्हाला इतरांना सुधारण्याची इच्छा होत नाही. तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिकरीत्या घेतल्या जात नाहीत. तुम्ही सहज दुखावत नाही. हे कमकुवतपणामुळे नाही तर जीवनाने तुम्हाला खूप काही दाखवले आहे म्हणून होते. तुम्ही क्षुल्लक गोष्टींवर ऊर्जा वाया घालवत नाही. एक शांत-स्थैर्य येते. ही नम्रताच खरे अध्यात्म आहे. 100 व्या वर्षी शतमानम : जीवन वैयक्तिक कथांच्या पलीकडे जाते. वयाची शंभरी गाठणे ही केवळ वर्षांची संख्या नाही तर एक टप्पा आहे. तेथे व्यापक चित्र दृश्यमान होते. तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहून घेतलेल्या चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम खरोखर महत्त्वाचे होते. आयुष्य नेहमीच एका गूढ, करुणामय शक्तीने चालत आले आहे. 100 व्या वर्षी व्यक्ती कमी पण त्याची उपस्थिती जास्त जाणवू लागते. या पाच टप्प्यांचे सार आपल्या ऋषी आणि पूर्वजांच्या जीवनात दिसून येते. त्यांनी वय नाही तर वयानुसार येणारे बदल साजरे केले. 60 व्या वर्षी प्राधान्यक्रम बदलतात. 70 व्या वर्षी शांती शक्ती बनते. 80 व्या वर्षी उपस्थिती समाधान देते. 90 व्या वर्षी अहंकार नाहीसा होतो. 100 व्या वर्षी जीवन परिपूर्णतेला पोहोचते. म्हणूनच आपण या वयात वृद्धांना पाहतो तेव्हा आपण त्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि म्हणतो, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हालाही चांगल्या जीवनासाठी त्याच गुणांची गरज आहे. तुम्हाला असे वृद्ध लोक दिसले तर त्यांचे आशीर्वाद जरूर घ्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




