रुग्णालयात दाखल केलेल्या माझ्या एका नातेवाइकाला कधी डिस्चार्ज मिळेल, असा प्रश्न मी बुधवारी डॉक्टरांना विचारला. डॉक्टर म्हणाले, एवढी घाई का? मी म्हणालो, घाई नाही, पण मला गुरुवार आणि शुक्रवारी माझ्या काकांच्या 80 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. सुशिक्षित व्यक्ती एखाद्याच्या आजारापेक्षा उत्सवाला प्राधान्य देत आहे, अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग आपण 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे इतक्या थाटामाटात का साजरे करतो, हे त्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आकडे आध्यात्मिक आहेत की केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर महाभारतातील राजा ययातीच्या कथेत आहे. ययातीने जीवन पूर्णत्वाने जगले - सत्ता, सुख, यश आणि सर्वकाही. पण अचानक वृद्धत्वाची सुरुवात झाल्याने त्याला धक्का बसला. खोलवर आत्मपरीक्षण केल्यानंतर त्याला जाणवले की “सुखाला मर्यादा असतात, पण इच्छा कधीच संपत नाहीत.’ ही गोष्ट उमगल्यानंतर ययातीचे जीवन बदलले. त्यांनी म्हातारपण स्वीकारले. स्पष्ट केले की जीवनात पाच अंतर्गत वळणे असतात - ती वयावर नव्हे तर शहाणपणावर आधारित असतात. ही वळणे 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे वयाच्या भारतीय परंपरांशी संबंधी आहेत. त्यांची व्याख्या खालीलप्रमाणे आहे- 60 व्या वर्षी षष्ट्यब्दीपूर्ती : 60 व्या वर्षी काहीतरी बदलते - शरीरात नाही तर प्राधान्यक्रमांमध्ये. “मी आणखी किती साध्य करू शकतो?’ हा प्रश्न नाहीसा होऊ लागतो. त्याच्या जागी प्रश्न येतो, “आता खरोखर काय महत्त्वाचे आहे?’ तुमचे मन संचयातून समजून घेण्याकडे जाते. आत्ममंथन सुरू होते. आता आवाज, प्रशंसा किंवा बाह्य प्रमाणीकरणाची गरज नाही. शोध स्पष्टतेचा आहे. ही कमकुवतपणा नाही तर महत्त्वाकांक्षेसह येणारी परिपक्वता आहे. 70 व्या वर्षी भीमरथ शांती : स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते. तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. युक्तिवाद आकर्षक वाटत नाहीत. युक्तिवाद जिंकण्यापेक्षा नातेसंबंध जपणे अधिक महत्त्वाचे बनते. असे दिसते की शांत राहणे बरोबर असण्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. 80 व्या वर्षी शताभिषेकम : तुमची केवळ उपस्थिती सांत्वन देते. 80 व्या वर्षी लोक सल्ला घेण्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोलवर शोधतात - जीवन जगता येते आणि समजून घेतले जाऊ शकते याची खात्री. या वयात तुमची उपस्थिती स्वतःच एक आशीर्वाद बनते. शब्दांची गरज नसते. तुमची उपस्थितीच सांगते की सर्वकाही ठीक आहे. म्हणूनच वयाचा ऐंशीचा टप्पा पवित्र मानला जातो. 90 व्या वर्षी नवती : येथे काहीतरी दुर्मिळ घडते. अहंकार नाहीसा होतो. तुम्हाला इतरांना सुधारण्याची इच्छा होत नाही. तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिकरीत्या घेतल्या जात नाहीत. तुम्ही सहज दुखावत नाही. हे कमकुवतपणामुळे नाही तर जीवनाने तुम्हाला खूप काही दाखवले आहे म्हणून होते. तुम्ही क्षुल्लक गोष्टींवर ऊर्जा वाया घालवत नाही. एक शांत-स्थैर्य येते. ही नम्रताच खरे अध्यात्म आहे. 100 व्या वर्षी शतमानम : जीवन वैयक्तिक कथांच्या पलीकडे जाते. वयाची शंभरी गाठणे ही केवळ वर्षांची संख्या नाही तर एक टप्पा आहे. तेथे व्यापक चित्र दृश्यमान होते. तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहून घेतलेल्या चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम खरोखर महत्त्वाचे होते. आयुष्य नेहमीच एका गूढ, करुणामय शक्तीने चालत आले आहे. 100 व्या वर्षी व्यक्ती कमी पण त्याची उपस्थिती जास्त जाणवू लागते. या पाच टप्प्यांचे सार आपल्या ऋषी आणि पूर्वजांच्या जीवनात दिसून येते. त्यांनी वय नाही तर वयानुसार येणारे बदल साजरे केले. 60 व्या वर्षी प्राधान्यक्रम बदलतात. 70 व्या वर्षी शांती शक्ती बनते. 80 व्या वर्षी उपस्थिती समाधान देते. 90 व्या वर्षी अहंकार नाहीसा होतो. 100 व्या वर्षी जीवन परिपूर्णतेला पोहोचते. म्हणूनच आपण या वयात वृद्धांना पाहतो तेव्हा आपण त्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि म्हणतो, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हालाही चांगल्या जीवनासाठी त्याच गुणांची गरज आहे. तुम्हाला असे वृद्ध लोक दिसले तर त्यांचे आशीर्वाद जरूर घ्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


