रुग्णालयात दाखल केलेल्या माझ्या एका नातेवाइकाला कधी डिस्चार्ज मिळेल, असा प्रश्न मी बुधवारी डॉक्टरांना विचारला. डॉक्टर म्हणाले, एवढी घाई का? मी म्हणालो, घाई नाही, पण मला गुरुवार आणि शुक्रवारी माझ्या काकांच्या 80 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. सुशिक्षित व्यक्ती एखाद्याच्या आजारापेक्षा उत्सवाला प्राधान्य देत आहे, अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग आपण 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे इतक्या थाटामाटात का साजरे करतो, हे त्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आकडे आध्यात्मिक आहेत की केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर महाभारतातील राजा ययातीच्या कथेत आहे. ययातीने जीवन पूर्णत्वाने जगले - सत्ता, सुख, यश आणि सर्वकाही. पण अचानक वृद्धत्वाची सुरुवात झाल्याने त्याला धक्का बसला. खोलवर आत्मपरीक्षण केल्यानंतर त्याला जाणवले की “सुखाला मर्यादा असतात, पण इच्छा कधीच संपत नाहीत.’ ही गोष्ट उमगल्यानंतर ययातीचे जीवन बदलले. त्यांनी म्हातारपण स्वीकारले. स्पष्ट केले की जीवनात पाच अंतर्गत वळणे असतात - ती वयावर नव्हे तर शहाणपणावर आधारित असतात. ही वळणे 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे वयाच्या भारतीय परंपरांशी संबंधी आहेत. त्यांची व्याख्या खालीलप्रमाणे आहे- 60 व्या वर्षी षष्ट्यब्दीपूर्ती : 60 व्या वर्षी काहीतरी बदलते - शरीरात नाही तर प्राधान्यक्रमांमध्ये. “मी आणखी किती साध्य करू शकतो?’ हा प्रश्न नाहीसा होऊ लागतो. त्याच्या जागी प्रश्न येतो, “आता खरोखर काय महत्त्वाचे आहे?’ तुमचे मन संचयातून समजून घेण्याकडे जाते. आत्ममंथन सुरू होते. आता आवाज, प्रशंसा किंवा बाह्य प्रमाणीकरणाची गरज नाही. शोध स्पष्टतेचा आहे. ही कमकुवतपणा नाही तर महत्त्वाकांक्षेसह येणारी परिपक्वता आहे. 70 व्या वर्षी भीमरथ शांती : स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते. तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. युक्तिवाद आकर्षक वाटत नाहीत. युक्तिवाद जिंकण्यापेक्षा नातेसंबंध जपणे अधिक महत्त्वाचे बनते. असे दिसते की शांत राहणे बरोबर असण्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. 80 व्या वर्षी शताभिषेकम : तुमची केवळ उपस्थिती सांत्वन देते. 80 व्या वर्षी लोक सल्ला घेण्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोलवर शोधतात - जीवन जगता येते आणि समजून घेतले जाऊ शकते याची खात्री. या वयात तुमची उपस्थिती स्वतःच एक आशीर्वाद बनते. शब्दांची गरज नसते. तुमची उपस्थितीच सांगते की सर्वकाही ठीक आहे. म्हणूनच वयाचा ऐंशीचा टप्पा पवित्र मानला जातो. 90 व्या वर्षी नवती : येथे काहीतरी दुर्मिळ घडते. अहंकार नाहीसा होतो. तुम्हाला इतरांना सुधारण्याची इच्छा होत नाही. तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिकरीत्या घेतल्या जात नाहीत. तुम्ही सहज दुखावत नाही. हे कमकुवतपणामुळे नाही तर जीवनाने तुम्हाला खूप काही दाखवले आहे म्हणून होते. तुम्ही क्षुल्लक गोष्टींवर ऊर्जा वाया घालवत नाही. एक शांत-स्थैर्य येते. ही नम्रताच खरे अध्यात्म आहे. 100 व्या वर्षी शतमानम : जीवन वैयक्तिक कथांच्या पलीकडे जाते. वयाची शंभरी गाठणे ही केवळ वर्षांची संख्या नाही तर एक टप्पा आहे. तेथे व्यापक चित्र दृश्यमान होते. तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहून घेतलेल्या चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम खरोखर महत्त्वाचे होते. आयुष्य नेहमीच एका गूढ, करुणामय शक्तीने चालत आले आहे. 100 व्या वर्षी व्यक्ती कमी पण त्याची उपस्थिती जास्त जाणवू लागते. या पाच टप्प्यांचे सार आपल्या ऋषी आणि पूर्वजांच्या जीवनात दिसून येते. त्यांनी वय नाही तर वयानुसार येणारे बदल साजरे केले. 60 व्या वर्षी प्राधान्यक्रम बदलतात. 70 व्या वर्षी शांती शक्ती बनते. 80 व्या वर्षी उपस्थिती समाधान देते. 90 व्या वर्षी अहंकार नाहीसा होतो. 100 व्या वर्षी जीवन परिपूर्णतेला पोहोचते. म्हणूनच आपण या वयात वृद्धांना पाहतो तेव्हा आपण त्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि म्हणतो, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हालाही चांगल्या जीवनासाठी त्याच गुणांची गरज आहे. तुम्हाला असे वृद्ध लोक दिसले तर त्यांचे आशीर्वाद जरूर घ्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

15 July 2026
15 July 2026
इंदौर : रोड रेजचा थरार! कारच्या बोनटवर चढून तरुणाचा धिंगाणा #इंदौर #रोडरेज #व्हायरलव्हिडिओ #ब्रेकिंग
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




