लहानपणी मी कधीच वडील बसण्याच्या आधी बसत नसे. त्यामुळे त्या दिवशी ते माझ्यानंतर बसले, तेव्हा ते मला काहीसे विचित्र वाटले. पण दुसरा पर्याय नव्हता. माझी पहिली कार – सेकंड-हँड फियाट – पार्किंगमधून काढून त्यांच्यापर्यंत आणायची होती. त्यांनी कारच्या छतावर हात ठेवला. जणू तिला आशीर्वादच देत होते. माझ्या बहिणीने पुढच्या सीटचे दार उघडले. त्यांना माझ्या शेजारी बसवले. त्यांचा हात धरावा म्हणून मी पुढे झालो. तो अनुभव पूर्णपणे वेगळा होता. माझ्या संपूर्ण बालपणात त्यांनीच माझा हात धरला होता. माझी लहान बोटे त्यांच्या रुंद तळहाताला घट्ट पकडून असत. पण त्या दिवशी त्यांच्या बोटांना माझ्याकडून आधाराची गरज होती. आम्ही दोन वेगळ्या काळात जन्मलो होतो. त्यांचा जन्म 1927 मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतात झाला होता तर मी स्वातंत्र्योत्तर पिढीतील होतो. तरी त्या दुपारी आम्ही दोघेही एकमेकांच्या शेजारी समानतेने बसलो होतो. मुंबईच्या उपनगरांतून जाताना आम्ही दोघेही खिडकीबाहेरचे आणि विंडशील्डमधून दिसणारे जग न्याहाळत होतो. कधी-कधी ते माझ्याकडे वळून पाहत व माझी नजर त्यांच्याशी मिळण्याची वाट पाहत. वाहतूक मंदावल्यावर आमच्या नजरा जुळल्या व मला अचानक बालपणीचा तो रोमांचक क्षण आठवला. तेव्हा मी त्यांच्या सायकलीच्या पुढील दांड्यावर बसत असे. त्या वेळी मागे सरकणारे रस्ते, झाडे व दुकाने पाहणे म्हणजे जणू काही जादूच वाटत असे. आता तीच आनंदाची भावना मला त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. घरी पोहोचलो आणि मी इंजिन बंद केले. त्यांच्या बाजूचे दार उघडण्यासाठी पुढे सरकलो, तेवढ्यात त्यांनी माझा हात धरला. ‘आपण थोडा वेळ इथेच बसून गप्पा मारू शकतो का?’ त्यांनी विचारले. मी थक्क झालो. आमच्या घरी त्यांचेच अंतिम मत असे. पण त्या दिवशी ते केवळ संवाद साधू इच्छित नव्हते, तर त्यासाठी माझी परवानगीही मागत होते. ‘का नाही?’ मी उत्तर दिले. मी कर्ज न घेता कार कशी विकत घेतली, याची चौकशी केल्यानंतर ते हळूच म्हणाले, ‘तुला काही आर्थिक मदतीची गरज आहे का?’ मी ‘नाही’ असे म्हणताच त्यांनी माझ्या डोळ्यांत खोलवर पाहिले आणि मंद आवाजात म्हणाले, ‘मला माफ कर. सेकंड-हँड सायकलपेक्षा जास्त काही मी तुला घेऊन देऊ शकलो नाही.’ त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि माझ्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आम्ही जवळपास पंधरा मिनिटे कारमध्येच बसलो. त्यांनी रेल्वेतील साध्या नोकरीबद्दल व आयुष्यात कधीही कर्ज न घेण्याच्या आपल्या ठाम तत्त्वाबद्दल सांगितले. ते म्हणाले, उत्पन्नाच्या मर्यादेत राहून जगल्यामुळे आपण नेहमी अभिमानाने मान उंच ठेवून रस्त्यावर चालू शकलो. दीर्घ सेवाकाळात निवृत्तीच्या वेळी सुट्ट्यांचे पैसे मिळावेत आणि माझ्यावर आर्थिक भार पडू नये म्हणून त्यांनी क्वचितच रजा घेतली होती. त्या दिवशी मला उमगले की आई-वडील व मुलांचे नाते स्थिर नसते; ते सतत बदलत राहते आणि अनेकदा अत्यंत सुंदर रूप धारण करते. स्वतः एका मुलीचा पिता झाल्यानंतर मी त्यांचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो. आमच्यात मतभेद होते. त्यांच्या काही विचित्र सवयीही होत्या. पण त्यांनी त्यांच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केले होते, याची जाणीव झाली. चाळिशीनंतर मला हे समजू लागले की आपल्या पालकांचे स्वतःचे बालपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असते. पालकत्व ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्याचा परिपूर्ण अर्थ कुणालाच पूर्णपणे उमगत नाही. बहुतेक वडील आपल्या कमतरता आणि संघर्ष मुलांशी मित्राप्रमाणे शेअर करतात. आपली मुले कुटुंबातील मूल्ये जपत आयुष्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात आल्यानंतरच ते संवाद साधतात. मी आणि माझे वडील विवाह, आरोग्य, पैसा, भू-राजकारण आणि असुरक्षितता अशा अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलत असू. आमच्यात एक समान धागा होता – समर्पण. ते नेहमी आपल्या कुटुंबासाठी व कामासाठी पूर्णपणे समर्पित राहिले. ते स्थिर, कष्टाळू, खंबीर व वचनबद्ध अशा खडकासारखे उभे राहिले आणि त्यांनी माझ्यामध्येही तेच गुण पाहिले. फंडा असा की... वडील मुलाचे सर्वात चांगले मित्र असतात. त्यांना आपल्या मुलावर कुटुंबाची परंपरा, मूल्ये व जबाबदारी सोपवण्याइतका आत्मविश्वास वाटू लागतो, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने त्याचे जिवलग मित्र बनतात.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: MPSC वाद अधिकच पेटला! आंदोलनकर्त्यांनी सचिव महेंद्र हरपळकर यांच्या तोंडाला फासला काळा रंग; संभाजी ब्रिगेडकडून उच्चपदस्थांच्या राजीनाम्याची मागणी!
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
महाराष्ट्र
- बीड: साहित्य क्षेत्राचा मोठा सन्मान! प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना प्रतिष्ठेचा 'स्व. भगवानराव लोमटे राज्य पुरस्कार' प्रदान!
- नागपुर: आर्थिक विवंचनेतून अत्यंत दुर्दैवी घटना; उधारीचे पैसे फेडता येत नसल्याने ५० वर्षीय शेतकऱ्याने शेतात संपवले जीवन!
- कोल्हापुर: दहीहंडीचा आनंद क्षणार्धात विरला! दहीहंडी फोडून गावकडे परतत असताना २८ वर्षीय तरुण गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: MPSC वाद अधिकच पेटला! आंदोलनकर्त्यांनी सचिव महेंद्र हरपळकर यांच्या तोंडाला फासला काळा रंग; संभाजी ब्रिगेडकडून उच्चपदस्थांच्या राजीनाम्याची मागणी!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा




























Subscribe to my channel



