जेव्हा एखादा कॉलेजचा विद्यार्थी मला विचारतो की, एआयच्या या नवीन जगात कोणते कौशल्य सर्वात महत्त्वाचे आहे, तेव्हा माझे उत्तर नेहमी ‘सातत्य’ हे असते. म्हणजे एखादे काम फक्त काही महिने किंवा वर्षे नाही, तर दशकानुदशके करणे. त्यात एक दिवसाचाही खंड न पडू देणे. ही केवळ कष्टाची गोष्ट नाही, तर तो एक असा शिस्तबद्ध भाव आहे, जो प्रत्येक आई कोणतीही तक्रार न करता आयुष्यभर जपते. या प्रश्नावर मनुष्यबळ (एचआर) क्षेत्रातील तज्ज्ञांची उत्तरे वेगळी असू शकतात. जसे की - सुव्यवस्थित असणे, प्रामाणिकपणा, सकारात्मकता, विश्वासार्हता, समर्पण किंवा उत्तम संवाद कौशल्य. मात्र, जर तुम्ही ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम आल्टमॅन यांना विचारले, तर त्यांचे उत्तर यशासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व गुणवत्तेपेक्षा वेगळे असेल. ते म्हणतील, ‘हाय-एजन्सी बना.’ आल्टमॅन दीर्घकाळ टिकणाऱ्या लवचिकतेवर आणि दीर्घकालीन ध्येयावर भर देत आले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘हाउ टु बी सक्सेसफुल’ या निबंधातही याचा उल्लेख केला आहे. पण जसजसे एआय रोजची कामे स्वयंचलित (ऑटोमेट) करत आहे, तसतसे त्यांचे लक्ष ‘हाय-एजन्सी’ या संकल्पनेवर स्थिरावले आहे. हे तुम्ही 2024 ते 2026 या काळात त्यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये पाहू शकता. ‘हाय-एजन्सी’ म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी एका ‘डिटेन्शन टेस्ट’पासून सुरुवात करूया. तयार आहात? पूर्ण लेख वाचण्यापूर्वी स्वतःला फसवू नका, तर मोकळ्या मनाने या चाचणीत सहभागी व्हा. कल्पना करा की, तुम्हाला एका परदेशी विमानतळावर अडकवण्यात आले आहे आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला फक्त एक फोन कॉल करण्याची परवानगी दिली आहे. आता सांगा, तुम्ही कुणाला फोन कराल? तुमच्या गृहिणी पत्नीला, जी घाबरून जाईल? 70 वर्षांच्या वडिलांना? की तुमच्या भावाला, जो एका प्रभावशाली सरकारी पदावर आहे. जर तुम्हाला ‘हाय-एजन्सी’चा अर्थ माहीत असेल, तर तुम्ही तुमच्या भावालाच फोन कराल. कारण कदाचित तोच तुमच्या आयुष्यातील ‘सर्वात जास्त एजन्सी’ असलेली व्यक्ती असेल. तो घाबरणार नाही. कदाचित तुमच्याकडून डझनभर प्रश्न विचारून घेईल. यंत्रणेला दोष देत बसण्याऐवजी समस्या सोडवण्याचे मार्ग शोधू लागेल. ‘हाय-एजन्सी’ ही एक अशी मानसिक स्थिती आहे, ज्यात तुम्ही एक निष्क्रिय प्रवासी न बनता तुमच्या आयुष्याचे चालक स्वतः बनता. ही विचारसरणी परिस्थिती किंवा मर्यादा जशा आहेत तशा स्वीकारण्यास नकार देते. यामध्ये असा आंतरिक विश्वास असतो की, तुमच्या कृतीचा परिणामांवर प्रभाव पडतो. ‘हाय-एजन्सी’ व्यक्तीमध्ये खालील गुण दिसतात: 1. कृतीची तत्परता: त्यांना स्पष्ट परवानगी, आदर्श परिस्थिती किंवा अचूक सूचनांची वाट पाहावी लागत नाही. समस्या समोर आली की ते त्वरित कामाला लागतात.
2. पूर्ण जबाबदारी घेणे: ते समस्या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी स्वतः घेतात, मग ती त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची का असेना.
3. संसाधनांचा वापर: ‘हे अशक्य आहे’ असे म्हणून थांबण्याऐवजी, ते विचार करतात की ‘चला, दुसरा मार्ग आजमावून पाहू.’ हवा तो निकाल मिळेपर्यंत ते नवनवीन मार्ग अवलंबत राहतात.
कामाच्या ठिकाणी ‘हाय-एजन्सी’ मानसिकता कशी विकसित करावी? नियमित व्यायामाने शरीर कमावतो तसे, मुद्दाम अंगीकारलेल्या काही सवयी ‘हाय-एजन्सी’ विकसित करू शकतात. यासाठी पाच क्षेत्रांवर काम करणे आवश्यक आहे:
1. समस्या नको, उपाय घेऊन जा: आपल्या मॅनेजरकडे समस्या घेऊन जाण्यापूर्वी किमान दोन व्यावहारिक उपाय सुचवा.
2. नियमांना मार्गदर्शक समजा: वेगाने निकाल देण्यासाठी कठोर कॉर्पोरेट प्रक्रियांचा वापर कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून आपल्या सोयीनुसार करा.
3. अडथळ्यांवर मात करा: जर एखाद्या सहकाऱ्याने ‘नाही’ म्हटले, तर इतर पर्याय, डेटा किंवा मार्ग शोधा.
4. मर्यादित संसाधनांत काम करा: बजेट कमी असेल तरीही मोफत टूल्सचा वापर करून उच्च दर्जाचे उत्पादन बनवा.
5. धोका पत्करा: जेव्हा नेतृत्व उपलब्ध नसेल, तेव्हा आवश्यक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्या. ‘हाय-एजन्सी’ची मूळ संकल्पना ही आहे की, आपले आयुष्य बदलण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे. याचा स्वीकार करणे हा नैराश्य आणि हतबलतेवरचा उत्तम उपाय ठरू शकतो. सतत काम करण्याच्या या युगात, नेमके आपले लक्ष कुठे असावे हे ठरवणे, हाच आपला ‘हाय-एजन्सी’चा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. फंडा असा की, ‘हाय-एजन्सी’ ही एक मूल्यनिरपेक्ष संज्ञा आहे, ती सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही. हे अशा व्यक्तीचे वर्णन आहे, जो धोका पत्करूनही कृती करतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



