
Vinayak Raut : अवकाळीमुळे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजारांची तात्काळ मदत करा, शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही असा थेट इशारा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सरकारला दिला आहे. कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतीच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाचे नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात विनायक राऊत, नितीन बानगुडे पाटील यांच्यासह नाशिकच्या ठाकरे गटाचे इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. पिक विमा कंपन्यांकडूनही मदत मिळत नाही, गेल्या वेळेच्या गारपीटीची देखील मदत सरकारने केली नाही, शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडून सरकार बाहेर मौज मजा करत असल्याचा आरोप विनायक राऊत केला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता तोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. पण, तेलंगणामध्ये जाऊन लोचत गिरी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकरी टाहो फोडतो आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, पण तसे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार अधिवेशन चालू देणार नाही, असे राऊत म्हणाले.
|
Rohit Pawar News : स्वार्थासाठी बाहेर पडलेल्यांकडे आगामी काळात पक्ष नसेल; आमदार रोहित पवार |
मिंधे सरकारकडून पोलिस बळाचा वापर...
दरम्यान ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, सत्तेचा माज आलेल्या मिंधे सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात त्याप्रमाणे कारवाई करत दळवी यांना पकडले. पण याचवेळी सुर्वे आणि सरवणकर यांच्या कृत्याचे काही नाही. सारवणकर यांनी गोळीबार केल्याचा रिपोर्ट आला तरीही त्यांच्यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.
भुजबळांवर टीका...
मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण करण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रातले मंत्री व्यासपीठावर येऊन विसंवाद निर्माण करत आहे हे योग्य नाही. मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन शड्डू ठोकणे योग्य नाही. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून हे होत असल्याचा संशय आहे. पण राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल मला कौतुक वाटत आहे. त्यांनी भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट बोलून धारिष्ट्य दाखवले ते मुख्यमंत्री यांनी दाखवायला पाहिजे. समाजात भांडण लावले जात असल्याचे देखील विनायक राऊत म्हणाले.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



