सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड्स समोर येत असतात. सध्या चीनच्या तरुणांमध्ये एकाच ट्रेंड्ची जोरदार चर्चा सुरू आहे. काहीजण प्लास्टिकने गुंडाळलेले अन्न खात असल्याचे व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यामुळे आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. टिकटॉक, डोयिन आणि इतर प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून या प्रकारावर जोरदार चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे प्रयोग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
काय आहे प्लास्टिक ईटिंग ट्रेंड?
सध्या सोशल मीडियावर “प्लास्टिक ईटिंग” नावाचा एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला आहे. या प्रकारात काही जण आपल्या तोंडावर प्लास्टिक रॅप लावून त्याच्या आत अन्न ठेवतात, ते चावतात आणि नंतर थुंकून टाकतात. काही समर्थकांचा दावा आहे की यामुळे कॅलरी न घेता पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.
मात्र तज्ज्ञांच्या मते हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आणि आरोग्यासाठी धोकादायक आहे. प्लास्टिकमधील रसायनांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय, अन्नाशी असा प्रयोग केल्याने गुदमरल्याचा किंवा संसर्गाचा धोका देखील संभवतो. त्यामुळे अशा व्हायरल ट्रेंडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो?
विचित्र ट्रेंडचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. काही संशोधनांनुसार मायक्रोप्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण शरीरात गेले तर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखी, गॅस, मळमळ यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
इतकेच नव्हे तर प्लास्टिकचे सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे खोकला किंवा श्वसनास अडथळा निर्माण होऊ शकतो. प्लास्टिकमध्ये आढळणारे BPA सारखे रसायन शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करू शकते. दीर्घकाळ असा संपर्क राहिल्यास यकृत आणि फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मानसिक आरोग्यावरही ट्रेंडचा परिणाम
या ट्रेंडचा परिणाम फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. खाण्याबाबत भीती किंवा अपराधीपणाची भावना निर्माण झाल्यास अन्नाशी नकारात्मक नातं तयार होऊ शकतं. कॅलरीच्या भीतीमुळे वारंवार अन्न चावून थुंकण्याची सवय लागल्यास ते पुढे जाऊन ‘इटिंग डिसऑर्डर’चे रूप घेऊ शकते.
या ट्रेंडमुळे वजन कमी होतं का ?
वजन कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो का, याबाबतही स्पष्ट नकार दिला जातो. अशा पद्धतीमुळे शरीराची भूक नियंत्रणात राहत नाही; उलट नंतर जास्त खाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दीर्घकाळात याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते.
सोशल मीडियावर ट्रेंडवर टीका
सोशल मीडियात अनेकांनी या ट्रेंडवर टीका केली आहे. काही तरुणांनी अशा धोकादायक प्रयोगांपासून दूर राहावे, असा सल्ला दिला आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला हेच वजन नियंत्रणाचे सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




