सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड्स समोर येत असतात. सध्या चीनच्या तरुणांमध्ये एकाच ट्रेंड्ची जोरदार चर्चा सुरू आहे. काहीजण प्लास्टिकने गुंडाळलेले अन्न खात असल्याचे व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यामुळे आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. टिकटॉक, डोयिन आणि इतर प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून या प्रकारावर जोरदार चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे प्रयोग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
काय आहे प्लास्टिक ईटिंग ट्रेंड?
सध्या सोशल मीडियावर “प्लास्टिक ईटिंग” नावाचा एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला आहे. या प्रकारात काही जण आपल्या तोंडावर प्लास्टिक रॅप लावून त्याच्या आत अन्न ठेवतात, ते चावतात आणि नंतर थुंकून टाकतात. काही समर्थकांचा दावा आहे की यामुळे कॅलरी न घेता पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.
मात्र तज्ज्ञांच्या मते हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आणि आरोग्यासाठी धोकादायक आहे. प्लास्टिकमधील रसायनांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय, अन्नाशी असा प्रयोग केल्याने गुदमरल्याचा किंवा संसर्गाचा धोका देखील संभवतो. त्यामुळे अशा व्हायरल ट्रेंडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो?
विचित्र ट्रेंडचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. काही संशोधनांनुसार मायक्रोप्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण शरीरात गेले तर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखी, गॅस, मळमळ यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
इतकेच नव्हे तर प्लास्टिकचे सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे खोकला किंवा श्वसनास अडथळा निर्माण होऊ शकतो. प्लास्टिकमध्ये आढळणारे BPA सारखे रसायन शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करू शकते. दीर्घकाळ असा संपर्क राहिल्यास यकृत आणि फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मानसिक आरोग्यावरही ट्रेंडचा परिणाम
या ट्रेंडचा परिणाम फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. खाण्याबाबत भीती किंवा अपराधीपणाची भावना निर्माण झाल्यास अन्नाशी नकारात्मक नातं तयार होऊ शकतं. कॅलरीच्या भीतीमुळे वारंवार अन्न चावून थुंकण्याची सवय लागल्यास ते पुढे जाऊन ‘इटिंग डिसऑर्डर’चे रूप घेऊ शकते.
या ट्रेंडमुळे वजन कमी होतं का ?
वजन कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो का, याबाबतही स्पष्ट नकार दिला जातो. अशा पद्धतीमुळे शरीराची भूक नियंत्रणात राहत नाही; उलट नंतर जास्त खाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दीर्घकाळात याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते.
सोशल मीडियावर ट्रेंडवर टीका
सोशल मीडियात अनेकांनी या ट्रेंडवर टीका केली आहे. काही तरुणांनी अशा धोकादायक प्रयोगांपासून दूर राहावे, असा सल्ला दिला आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला हेच वजन नियंत्रणाचे सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




