महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी प्रसिद्ध केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघातानंतर ३० दिवसांच्या आत प्राथमिक माहिती सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ही संस्था या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. या अहवालातून विमानाची तांत्रिक स्थिती, हवामानाचा अंदाज आणि वैमानिकाचे शेवटच्या क्षणांतील निर्णय यावर अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या अहवालाकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
अपघाताच्या दिवशी नक्की काय घडले?
२८ जानेवारी रोजी सकाळी ८:१८ वाजता विमानाचा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क झाला. सकाळी ८:४३ वाजता विमान उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमान धावपट्टीच्या सुरुवातीलाच कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवारांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांनी या अपघातात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच वैमानिकाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ३००० फूट दृश्यमानता असतानाही विमान का कोसळले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही सोशल मीडियावरून सत्य समोर आलेच पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
अधिकृत अहवालातून स्पष्टीकरण मिळणार
दरम्यान या भीषण अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आता सर्वांच्या नजरा २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणाऱ्या AAIB च्या प्राथमिक अहवालाकडे लागल्या आहेत. यातून ब्लॅक बॉक्समधून मिळणारी विमानाची तांत्रिक माहिती आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा शेवटचा संवाद, या प्रकरणातील संशयाचे धुके दूर करण्यास मदत करेल. हा अपघात निव्वळ एक तांत्रिक त्रुटी होती की त्यामागे आणखी काही गंभीर कारण दडलेले आहे, याचे उत्तर या अधिकृत अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
[embedded content]
शहर
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
महाराष्ट्र
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- महाराष्ट्र: रेशनधारकांसाठी मोठा दिलासा, आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!


























Subscribe to my channel

