धाराशिव: तुळजापुरात मोठी दुर्घटना; उघड्या खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, सरपंचसह ५ जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे दोन वर्षीय आरुषी पवारचा उघड्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सोमवारी सरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे, कारण वारंवार सूचना देऊनही खड्डा बुजवण्यात आलेला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास चिमुकली आरुषी ही आपल्या घराशेजारी खेळत होती. घराशेजारील शेतात कोणत्याही प्रकारचे कंपाउंड वॉल, कुंपण किंवा संरक्षक कट्टा न करता एक मोठा खड्डा उघडाच ठेवण्यात आला होता. खेळता खेळता चिमुकलीचा पाय घसरून ती या खड्ड्यात पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.

फिर्यादी दिव्या अजय पवार (२०) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खड्डा अत्यंत धोकादायक असून, तो बुजवून घ्यावा, अशी विनंती आरोपींना वारंवार करण्यात आली होती. मात्र, आरोपींनी या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कमालीची हयगय व निष्काळजीपणा दाखवला. याच बेफिकिरीमुळे निष्पाप चिमुकलीला जीव गमवावा लागला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यावरून तुळजापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे....

यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद
भाऊ उर्फ भाऊसाहेब मनोहर लाटे (पाटील), लखन भाऊ लाटे (पाटील), तेजस चांगदेव माने (सरपंच), ग्रामपंचायत सदस्य गुणवंत बळीराम देशमुख, बालाजी तुकाराम शेंडगे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *