डिलांचा गणवेश रक्ताने माखला होता!"; दिल्ली आंदोलनातील जखमी पोलिसांच्या मुलांनी मांडली आपबीती, संसदेत चर्चेची मागणी!

नवी दिल्ली: दिल्लीत २० जुलै रोजी जंतरमंतर येथे पार पडलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी (३१ जुलै) नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत जखमी पोलिसांच्या पत्नी, मुले आणि नातेवाईकांनी त्या दिवसाची भीषण परिस्थिती, पोलिसांवर झालेले दगडफेक-हल्ले आणि सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या एकांगी वृत्तांतांवर आपली तीव्र खंत व्यक्त केली. "गणवेशामागेही एक कुटुंब असते" असे सांगत, या हिंसाचारात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची बाजू संसदेतही मांडली जावी आणि यावर सविस्तर चर्चा व्हावी, अशी जोरदार मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

"रक्ताने माखलेला गणवेश अन् सोशल मीडियावर आरोपींचा शिक्का": पत्रकार परिषदेत एका जखमी सब-इन्स्पेक्टरच्या (उपनिरीक्षक) मुलीने आपल्या वडिलांचा अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले. "माझे वडील १५ वर्षे नौदलात मरीन कमांडो म्हणून सेवेत होते आणि नंतर दिल्ली पोलिसांत रुजू झाले. आंदोलनाच्या दिवशी ते घरी परतले तेव्हा त्यांचा गणवेश रक्ताने पूर्णपणे माखलेला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना टाके पडले होते. पण ज्यावेळी मी सोशल मीडिया उघडला, तेव्हा त्यांनाच गुन्हेगार आणि अत्याचारी म्हणून घोषित केले जात होते," असा संतापजनक अनुभव तिने मांडला.

तसेच एका सहाय्यक उपनिरीक्षकांच्या (ASI) मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांना आंदोलकांच्या गर्दीने घेरून डोक्यावर दगड आणि जड वस्तू फेकून मारल्या, ज्यामुळे त्यांना आरएमएल रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करावे लागले होते.

२५० हून अधिक जवान जखमी, मोठे नुकसान: पत्रकार परिषदेत कुटुंबीयांनी स्लाईड शोच्या माध्यमातून जखमी आणि रक्तबंबाळ पोलिसांची छायाचित्रे, फुटलेले हेल्मेट्स आणि रक्ताळलेले गणवेश पत्रकारांसमोर मांडले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार:

  • या हिंसाचारात २५० हून अधिक पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

  • ११० हून अधिक बॅरिकेड्स, ३०० हून अधिक बॉडी प्रोटेक्टर्स, ३५० हेल्मेट्स आणि २५ हून अधिक सरकारी वाहनांचे आंदोलनातील असामाजिक घटकांकडून नुकसान करण्यात आले.

असामाजिक घटकांवर कडक कारवाईची मागणी: "विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे समजण्यासारखे आहे. ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी तपासून खात्री केली जाईल त्यांना सोडून द्यावे; मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन पोलिसांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या आणि देशाच्या संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या दंगलखोर, असामाजिक घटकांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी," अशी मागणी एका जखमी एएसआयच्या पत्नीने केली.

राजकीय वर्तुळात पडसाद: पोलिसांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. संसदेत एका बाजूने आंदोलकांवरील पोलीस कारवाईवरून सरकारला घेरले जात असताना, आता पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा आणि त्यांच्या कुटुंबीयांची हाक यावरही लोकसभेत व राज्यसभेत चर्चा व्हावी, असा सूर निघू लागला आहे.



गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *