छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर झालेली ओळख आणि मैत्री एका ३५ वर्षीय विवाहित महिलेसाठी अत्यंत धोकादायक ठरल्याची एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका नराधमाने विवाहितेचे अपहरण केले, तिला तब्बल २४ तास एका निर्जन ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार अमानुष अत्याचार केल्याची भीषण घटना घडली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील असून ते दोघेही ऊसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपी राजू मसू माळी याने या विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. महिलेने ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंग आणि संवाद सुरू झाला. दरम्यान, पीडिता आणि तिचा पती गंगापूर परिसरात ऊसतोडीसाठी गेले असताना आरोपी तिथेही पोहोचला, ज्यामुळे त्यांच्यातील संपर्क अधिक वाढला.
घाटी रुग्णालयातून केले अपहरण:
गेल्या काही दिवसांपूर्वी १४ जुलै रोजी ही पीडित महिला आपल्या मावसभावाला भेटण्यासाठी आपल्या बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात आली होती. दुपारी चारच्या सुमारास तिची बहीण घरी निघून गेल्यानंतर ती आपल्या भावासोबत रुग्णालयातच थांबली होती. हीच संधी साधून आरोपी राजू माळी तिथे पोहोचला. पीडिता पाणी आणण्यासाठी खाली गेली असता, आरोपीने तिला अडवले. "तुझे इन्स्टाग्रामवरील चॅट आणि खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या भयंकर धमक्यांमुळे प्रचंड घाबरलेली महिला नाइिलाजाने त्याच्या दुबलीवर बसली. मात्र, आरोपीने क्षणात तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून शहरापासून दूर एका निर्जन भागातील पत्र्याच्या शेडमध्ये नेले.
२४ तास ओलीस ठेवून अत्याचार:
त्या निर्जन ठिकाणी नेऊन नराधम राजू माळी याने त्या विवाहितेला तब्बल २४ तास ओलीस (बंधक) ठेवले आणि तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान पीडितेने हतबल होत मला माझ्या लहान मुलांची खूप आठवण येत आहे, मला कृपया घरी जाऊ द्या, अशी वारंवार हात जोडून विनवणी केली. मात्र, त्या विकृताच्या मनात जराही दया आली नाही. त्यानंतर १६ जुलै रोजी आरोपी तिला नेवासा परिसरातील आणखी एका दुसऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला आणि तिथेही दिवसभर डांबून ठेवत रात्री पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर १७ जुलै रोजी आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवून दिले. परंतु, जाताना "जर तू पोलिसांत तक्रार केलीस किंवा पुन्हा माझ्या नादी लागलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी खूनाची धमकीही त्याने दिली.
पतीला सांगितला संपूर्ण प्रकार आणि पोलिसांत धडक:
घरी पोहोचल्यानंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या आणि मानसिक धक्का बसलेल्या त्या विवाहितीने घडलेला सर्व भयंकर प्रकार आपल्या पतीला सविस्तर सांगितला. पतीने अत्यंत धाडस दाखवत व पत्नीला धीर देत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गाठून याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी वेगाने शोध घेत आरोपी राजू मसू माळी याला नेवासा येथून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- पुणे:८८ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मास्टरमाइंड दुबईहून प्रत्यार्पित; फरार आरोपी अविनाश राठोड पोलिसांच्या जाळ्यात
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
महाराष्ट्र
- पुणे:८८ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मास्टरमाइंड दुबईहून प्रत्यार्पित; फरार आरोपी अविनाश राठोड पोलिसांच्या जाळ्यात
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- सातारा: वाठार निंबाळकरजवळ भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू तर अन्य तिघे गंभीर जखमी
- महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता बिहारमधून जेरबंद; महिनाभरानंतर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई"
गुन्हा
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel


