नवी दिल्ली: देशभरात कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचं लोण प्रचंड प्रमाणात पसरलं आहे. सोनम वांगचूक यांनी २६ दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. केंद्र सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा होत आहे. दिल्लीतील जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या संख्येनं तरुणांचे मोर्चे निघत आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळी जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. याचदरम्यान, या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं भाष्य केलं आहे.
मोहन भागवत काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील आंबेडकर भवनात विश्वमांगल्य सभेत 'युगानुकूलत्व मातृत्व' कार्यक्रमात विद्यार्थी आंदोलनावर मोठं वक्तव्य केलं. मोहन भागवत म्हणाले की, "युवा पिढी आता प्रश्न विचारू लागली आहे. आपण तरुण होतो तेव्हा प्रश्न विचारत नव्हतो, आज्ञाधारक होतो. आत्ताची पिढी वेगळी आहे, प्रश्न विचारतेय. युवकांसोबत संवाद महत्त्वाचा आहे. त्यांना आदेश देता येणार नाही. नवीन पिढी विश्लेषण करत असते. त्यामुळे आपल्याला संवाद साधण्याची पद्धती बदलावी लागेल," असं भागवत यांनी यावेळी नमूद केलं.
पुढे ते म्हणाले की, "आधीचा काळ आज्ञांचं पालन करण्याचा काळ होता. आई-वडिलांनी जे म्हटलं, त्यावर कोणतीही चर्चा होत नव्हती. त्यांच्या आदेशानंतर शांत राहावं लागत होतं. त्यांच्यावर विश्वास होता. आपला त्यांच्या अनुभवावर विश्वास होता."
'नवीन पिढी प्रश्न विचारते'
भागवत पुढे म्हणाले, "आता काळ आधीसारखा राहिलेला नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते. आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांना वेळ देणे आणि त्यांच्याशी संवाद करण्याची गरज आहे. आता कुटुंबात संवाद होत नाही. कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्याचा मोबाईल घेऊन बसलेला असतो. घरात कोणी भेटायला आलं असेल, तरी त्याची कोणालाच माहिती नसते. हे सर्व बदलण्यासाठी भरपूर वेळ जाईल. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा बोलणे होईल. कुटुंबात संवाद झाल्यास मुले मोकळेपणाने बोलतील."
"बाळाचं पालनपोषण १२ वर्षांपर्यंत हातात असतं. आपण जे काही सांगतो, त्यावर स्वतः कृती केली पाहिजे. नवीन पिढीला तुम्ही थेट सांगितल्यास स्वीकारणार नाही. कारण ते आधी विश्लेषण करत असतात," असेही मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.
शहर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
- छत्रपती संभाजीनगर: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आनंदाश्रू अनावर विद्यार्थी नेता अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांचा भावनिक संदेश; म्हणाले- "बाळा, आता तू घरी ये!"
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
महाराष्ट्र
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- रत्नागिरी: गेल्या ११ वर्षांत तब्बल ९० बिबट्यांचा मृत्यू; मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
- छत्रपती संभाजीनगर: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आनंदाश्रू अनावर विद्यार्थी नेता अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांचा भावनिक संदेश; म्हणाले- "बाळा, आता तू घरी ये!"
गुन्हा
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड


























Subscribe to my channel


