कोल्हापूर: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली. खराब रस्त्यांवर वाहनधारकांकडून टोल आकारणी करता येणार नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशाचे पालन करण्यासंबंधी राज्य सरकारला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सर्किट बेंचमधील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ही याचिका मागे घेण्यात आली, परंतु न्यायालयाने राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास सुचवले आहे.
काय आहे प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या खटल्यात निकाल देताना स्पष्ट केले होते की, ज्या राष्ट्रीय महामार्गांवर मोठे खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडीमुळे रस्ते प्रवास प्रवाशांसाठी बिकट झाला आहे, अशा खराब रस्त्यांवर वाहनधारकांकडून सक्तीने टोल वसूल केला जाऊ शकत नाही. याच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील दयनीय अवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारी टोल वसुली पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली होती.
सर्किट बेंचमधील सुनावणी आणि न्यायालयाचे निरीक्षण:
कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या जनहित याचिकेची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, अशा प्रकारच्या सर्वसाधारण स्वरूपाच्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर सातत्याने किंवा प्रत्यक्षपणे देखरेख ठेवणे न्यायालयाच्या थेट कार्यक्षेत्रात किंवा अधिकारात येत नाही. हे लक्षात घेता, याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील ॲड. योगेश पांडे यांनी ही याचिका मागे घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने ती विनंती मान्य करत याचिका निकाली काढली.
तथापि, जरी याचिका मागे घेण्यात आली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच खराब रस्त्यांवरील टोलवसुलीबाबत देशभरासाठी स्पष्ट व कायदेशीर आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची पूर्ण माहिती राज्य सरकारला असल्याने, त्या आदेशातील सर्व निर्देश व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे, अशा सक्त सूचना खंडपीठातर्फे सरकार पक्षाला आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. वाहनधारकांच्या वेळेचा अपव्यय आणि खराब रस्त्यांमुळे होणारी नाहक पिळवणूक थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या धोरणांनुसार योग्य ते निर्णय घेण्याचे आदेशात सुचवण्यात आले आहे.
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

























Subscribe to my channel




