भारताने पाकिस्तानची जिरवली…100 देशांना आवतण दिलं, पण पाकला खड्यासारखं… AI इम्पॅक्ट समिटचं मोठं आयोजन

भारत १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान AI-Impact Summit चे यजमान पद भुषवत आहे.या समिटमध्ये १०० हुन अधिक देश सामील होत आहेत. ज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्सची पॉलीसी, इनोव्हेशन, एथिक, सिक्युरिटी आणि ग्लोबल को-ऑपरेशन सारख्या महत्वाच्या विषयांवर मंथन होणार आहे. या महत्वाच्या ग्लोबल समीटसाठी आपला शेजारील देश पाकिस्तानला मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला पेव फुटले आहे. ही परिषद तीन मुलभूत सूत्रे पिपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस या तत्वांवर आधारित आहे.

AI-Impact Summit या शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या देशांची निवड धोरणात्मक आणि धोरणात्मक निकषांवर आधारित करण्यात आली आहे. जबाबदार, सुरक्षित आणि मानव-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाचे समर्थन करणाऱ्या देशांसोबत सहकार्य वाढवण्यावर भारताचे लक्ष आहे. या शिखर परिषदेत आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक विकास यासारख्या जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीगत निमंत्रणावरुन अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारचे प्रमुख या परिषदेत भाग घेत आहेत. युरोप, अमेरिका, आशिया पॅसिफीक, आफ्रीका आणि आखाती देशातून येणारे प्रमुख नेते या व्यासपीठावर एआयचे भविष्य,जागतिक मानके आणि सहकार्याच्या मार्गावर विचार विनिमय करतील. याशिवाय ४५ हून अधिक देशांचे मंत्री स्तरीय शिष्ठमंडळाची उपस्थिती निश्चित आहे. त्यामुळे ही परिषद खरोखरच एक जागतिक व्यासपीठाचे स्वरुप घेणार आहे. युनायटेड नेशनचे महासचिव आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाचे ज्येष्ठ अधिकारी देखील या समीटमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

या एआय – इम्पॅक्ट समीटचा उद्देश्य केवळ तांत्रिकीचे प्रदर्शन नाही तर निती निर्मिती, गुंतवणूक, स्टार्टअप शोकेस आणि द्विपक्षीय बैठकांचे आयोजन देखील केले जाणार आहे. या समीटसाठी पाकिस्तानला आमंत्रण न देण्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *