टीम इंडियाचं वाढलं टेन्शनImage Credit source: PTI
IND vs PAK, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना रंगणा आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम वर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. राजकीय वाद आणि बॉयकॉ करण्याची धमकी यामुळे ही मॅच पहिल्यापासूनच चर्चेत आहे. मात्र अखेर 15 तारखेला हा सामना खेळवला जाणार आहे. असं असलं तरीही या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियासमोर काही आव्हाने आहेत. नामिबियाविरुद्ध अलिकडेच मिळालेल्या विजयानंतरही, टीम इंडिया अडचणीत सापडू शकते, त्याची 4 प्रमुख कारणं आहेत.
अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल अनिश्चिती
भारतीय संघातील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गाशी झुंजत आहे. पहिल्या सामन्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यामुळे त्याला नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. मात्र, त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि टीम मॅनेजमेंट सतर्क आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने असेही संकेत दिले की शर्माला परतण्यासाठी आणखी एक किंवा दोन सामने लागू शकतात. अशा परिस्थितीत, जर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही तर संघाचा ताण वाढू शकतो.
रिंकू सिंगचा खराब फॉर्म
मधल्या फळीत फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या रिंकू सिंगने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने 14 चेंडूत फक्त 6 धावा काढल्या. या काळात त्याने एकही फोर किंवा सिक्सर मारली नाही. तर दुसऱ्या सामन्यात, तो 6 चेंडूत फक्त 1 धाव काढू शकला, ही टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब आहे. रिंकू सहसा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जातो, परंतु सध्या त्याची बॅट शांत असल्याचे दिसते.
स्पिनर्ससमोर फलंदाज अडचणीत
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 209 धावा केल्या, पण मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांसमोर ते फसले. नामिबियाचा फिरकीपटू बर्नार्ड स्कोल्झ आणि गेरहार्ड इरास्मस यांनी विकेट घेतल्या आणि मधल्या षटकांमध्ये भारताची घोडदौड रोखली. याचा अर्थ असा की स्पिनर्ससमोर भारतीय फलंदाजांचा कमकुवतपणा पुन्हा एकदा उघड झाला. पाकिस्तानकडे मजबूत स्पिन अटॅक आहे आणि कोलंबोची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असू शकते, ही बाब टीम इंडियासाठी एक मोठा धोका ठरू शकते.
पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीची कमजोरी
पॉवरप्लेमध्ये नामिबियाने जलद सुरुवात केली आणि भारताचे गोलंदाज सुरुवातीलाच खूप महागडे ठरले. पॉवरप्लेमध्ये धावा दिल्याने संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. नामिबियाने पहिल्या सहा षटकांत 1 गडी गमावून 57 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध पॉवरप्ले महत्त्वाचा ठरू शकतो, तिथे त्यांचे सलामीवीर आक्रमक खेळ करू शकतात. भारतीय गोलंदाजांना त्यांच्यावर चांगलं नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पाकिस्तानी संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




