
Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही अनेक गावकरी बेपत्ता आहे. या दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या आपल्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. ढिगाऱ्याखालून आपला व्यक्ती जिवंत बाहेर येईल या आशेने ते त्याच ठिकाणी एकटक बघत बसले आहेत. घटनास्थळावर एनडीआरएफ, लष्कराचे जवानांकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पण मुसळधार पाऊस, खराब हवामानामुळे मदतकार्यामध्ये अडथळा येत आहे.
वायनाड भूस्खलनामध्ये ६८ वर्षीय शिवानंदन याचे कुटुंबीय बेपत्ता झाले आहेत. शिवानंदन आपला भाऊ शिवनसोबत याठिकाणी आले असून ते आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. त्यांची आई, दोन धाकटे भाऊ आणि त्यांचे कुटुंब भूस्खलनानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. चूरलमाला या गावामध्ये त्यांचे घर होते. पण भूस्खलनानंतर सहाही जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच शिवनंदन यांनी आपल्या गावाकडे धाव घेतली. आपले कुटुंबीय जिवंत सापडतील या आशेने ते मातीच्या ढिगाऱ्याकडे पाहत आहेत. पण आता घटना होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यांना फक्त त्यांचा धाकट्या भावाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर इतर सर्वजण अजूनही बेपत्ता आहेत. 'ते माझे रक्त आहेत. मला त्यांचे मृतदेह तरी मिळतील.', अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
|
|
वायनाडच्या मेपाडी सरकारी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून शिवनंदन आणि त्यांचा भाऊ शिवन आपल्या कुटुंबातील सदस्यांना शोधत आहे. त्यांनी सर्व मृतदेह तपासले. पण त्यांना कोणीही सापडले नाही. शिवनंदन हे गुरूवारी घटनास्थळावर त्याचे घर होते त्याठिकाणी कुटुंबीयांना शोधण्यासाठी गेले. ते आपल्यासोबत काही मित्रांना घेऊन आले आहेत. त्यांचे मित्र देखील शिवनंदन यांच्या कुटुंबीयांना मातीच्या ढिगाऱ्याखाली शोधत आहेत. पण त्यांना देखील काहीच सापडले नाही.
शहर
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा आरोप; मात्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) राज्य अजूनही अव्वल!
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!





























Subscribe to my channel




