
Pune : नैर्ऋत्य मान्सूनच्या उर्वरित हंगामात (ऑगस्ट, सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो, असे ‘आयएमडी’ने अंदाजात म्हटले आहे.
संस्थेचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी मान्सून हंगामाचा उत्तरार्ध आणि ऑगस्ट महिन्याच्या हवामानाचा अंदाज ऑनलाइन पत्रकार परिषदेत जाहीर केला. ‘जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसानंतर जुलैमध्ये राज्यासह देशभरात बहुतेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एकत्रितपणे सर्वसाधारण ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.
|
|
ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजाबाबत डॉ. महापात्रा म्हणाले, ‘ईशान्येकडील राज्ये, लडाख आणि गुजरातचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या उर्वरित हंगामात सरासरीपेक्षा जास्त (दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.’
दोन महिन्यांत अधिक पाऊस
‘महाराष्ट्रात आगामी दोन महिन्यांत एकत्रितपणे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र, ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. येत्या आठ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहणार असून, त्यानंतरच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे,’ असेही डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले.
‘ला निना’ सप्टेंबरमध्ये
‘आयएमडी’सह जगभरातील हवामानशास्त्रीय मॉडेलनुसार प्रशांत महासागरात सध्या न्यूट्रल स्थिती असून, ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये तिथे ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये देशात पाऊस अधिक पडू शकतो,’ असे डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
मान्सूनचा पूर्वार्ध (जून, जुलै) (सरासरीच्या तुलनेत)
देशभरातील एकूण पाऊस : १०२ टक्के
राज्यातील एकूण पाऊस : ३९ टक्के जास्त
कोकण : ४२ टक्के जास्त
मध्य महाराष्ट्र : ४६ टक्के जास्त
मराठवाडा : २८ टक्के जास्त
विदर्भ : ३७ टक्के जास्त
ताम्हिणीत सर्वोच्च पाऊस
जुलै महिन्यात देशभरात अतिशय जास्त पावसाच्या (२४ तासांत २०४.५ मिलीमीटरपेक्षा जास्त) १९३ घटना; तर जास्त पावसाच्या (२४ तासांत ११५.६ ते २०४.५ मिलीमीटर) १०३० घटनांची नोंद झाली. महाराष्ट्रातील ताम्हिणी येथे २५ जुलै रोजी नोंदला गेलेला ५६० मिलीमीटर पाऊस हा जुलैमध्ये देशातील सर्वोच्च्च पाऊस ठरला.
पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
पश्चिम बंगालजवळ वातावरणात हवेची चक्रिय स्थिती असून, पुढील २४ तासांत तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टाही (ऑफ शोअर ट्रफ) सक्रिय आहे. या स्थितीमुळे तीन ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. पाच ऑगस्टपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, तर चार ऑगस्टपर्यंत विदर्भात काही ठिकाणी जास्त ते अतिजास्त पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



