
Pune : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच भारतीय विद्यापीठ परिसरातील धक्कादायक घटना उघड झाली आहे. देहविक्रय करणाऱ्या एका महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या वादातून तिला दगडाच्या खाणीत ढकलून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी महिलेला पुण्यातील खडी मशीन चौक परिसरात नेले. तेथे तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात आले. त्यानंतर काही कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी तिला काठीने गंभीर मारहाण केली आणि नंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत ढकलल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात कोंढवा येथील जुन्या खाणीत सदर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शवविच्छेदन अहवालात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे हा खून असल्याचे स्पष्ट झालं आणि त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
"मृत महिला आणि मुख्य आरोपी एकमेकांना ओळखत होते व त्यांच्यात काही काळापासून संपर्क होता. दोघेही दारूचे व्यसनी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व पुणे गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली.
दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये म्हणून आरोपींनी वापरलेल्या रिक्षाचा काही भाग बदलल्याचं तपासात आढळून आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




