नवी दिल्ली: १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. १४ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी देशात 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी फाळणीच्या काळातील भीषण आठवणींना उजाळा दिला आणि या दुर्दैवी घटनांतून धडा घेऊन पुढे जाण्याचे आवाहन देशाला केले आहे.
पंतप्रधान आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, "आज आपण फाळणीच्या भीषणतेचा स्मरण दिवस पाळत आहोत. फाळणीचा फटका बसलेल्या त्या सर्वांच्या धैर्याचे आणि संघर्षाचे आपण स्मरण करतो. इतिहासातील तो एक अत्यंत वेदनादायी क्षण होता, ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, कुटुंबे विस्थापित झाली, अनेक प्रियजन हिरावले गेले आणि असीम दुःख सोसावे लागले." १९४७ मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हाच फाळणीच्या रूपात देशाने मोठी किंमत मोजली होती. विशेषतः पंजाब आणि बंगालच्या प्रांतात लाखो लोकांनी आपले सर्वस्व त्यागून स्वतंत्र भारतात आश्रय घेतला होता, त्यांची ही सहनशक्ती आणि जिद्द आजही प्रेरणादायी आहे.
पंतप्रधान मोदींनी या दुखातून बाहेर पडलेल्या नागरिकांच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले आहे. ते पुढे म्हणतात, "संकटांवर मात करून ज्यांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले, त्यांचे जीवनप्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात."
या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान मोदींनी देशाला एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, "हा दिवस आपल्या राष्ट्रातील सलोखा, बंधुभाव आणि एकता जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो. फाळणीच्या त्या वेदनांमधून बाहेर पडून, आता आपल्याला 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने सर्वांनी मिळून एकजुटीने कार्य करायचे आहे." फाळणीच्या स्मरण दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी देशातील सामाजिक एकोपा अधिक बळकट करण्याची आणि भारताच्या प्रगतीला वेग देण्याची गरज व्यक्त केली आहे.
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा आर्थिक घोटाळा; संशोधन संचालकांसह ७ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल!
- सातारा: कॉलेज हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीचे टोकाचे पाऊल, शिक्षुता वर्तुळात व महाविद्यालयात शोककळा!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
गुन्हा
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात




























Subscribe to my channel




