महाराष्ट्र: राज्यात मागील पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ३६ हजार २११ खाजगी कंपन्या बंद झाल्यावरून राजकीय वर्तुळात मोठे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संसदेत उघड झालेल्या एका अधिकृत आकडेवारीचा हवाला देत विरोधकांनी राज्य सरकारच्या औद्योगिक व व्यावसायिक धोरणावर कडाडून टीका केली आहे. मात्र, या सर्व वादानंतरही थेट परकीय गुंतवणुकीच्या (FDI) बाबतीत महाराष्ट्र देशात आजही अव्वल स्थानावर कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसभेतील अधिकृत आकडेवारी आणि विरोधकांचा दावा: केंद्रीय कर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्रात ३६ हजार २११ खाजगी कंपन्या लिक्विडेट, डीझॉल्व्ह किंवा स्ट्रेक ऑफ (बंद) झाल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी असा दावा केला आहे की, सरकारचा कारभार, वाढता भ्रष्टाचार आणि प्रतिकूल व्यावसायिक वातावरणामुळे राज्यातील उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. विशेषतः व्यवसाय सेवा (Business Services) क्षेत्रात सुमारे १४ हजार आणि उत्पादन (Manufacturing) क्षेत्रात जवळपास ६,५०० कंपन्या बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे या प्रमुख जिल्ह्यांमध्ये कंपन्या बंद होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.
सत्ताधाऱ्यांचे आणि उद्योगमंत्र्यांचे प्रत्युत्तर: दुसरीकडे, विरोधक या आकडेवारीच्या माध्यमातून राज्याची आणि उद्योग क्षेत्राची बदनामी करत असल्याचा पलटवार सत्ताधारी नेत्यांनी केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, "राज्यात गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद पडल्याचा हा आकडा नेमका कोणत्या स्रोतातून आणि कसा आला, याचा सखोल शोध घेण्यासाठी आणि वस्तुस्थिती तपासण्यासाठी थोडा वेळ द्यावा." तसेच, विरोधकांचे हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून प्रत्यक्ष ग्राउंडवर महाराष्ट्र देशामध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करणारे अग्रगण्य राज्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
- गडचिरोली: धावत्या एसटी बसचे चाक निखळून १०० फूट दूर शेतात पडले; चालकाच्या प्रसंगावधानाने २८ प्रवाशांचा जीव वाचला!
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."




























Subscribe to my channel




