भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. स्मृतीचे संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होते. पण शेवटच्या क्षणी हे लग्न मोडले आहे. आता टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिने ८२ धावांची जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर आता स्मृतीने आपल्या खेळाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. या वेळी ती भावुक झाल्याचे दिसून आले. तिची इंस्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
इंस्टाग्राम स्टोरीत स्मृतीने काय लिहिले?
स्मृतीने आपल्या स्टोरीत खेळाच्या कठोर वास्तवाबद्दल लिहिले आहे. “खेळ कधीच तुमच्या भावनांची कदर करत नाही. हे एक कटू सत्य आहे. तो तुम्ही थकलेला आहात की नाही याची पर्वा करत नाही. तुम्ही थकलेले असाल, नुकतेच जिंकले असाल, सर्वोत्तम खेळाडू असाल किंवा अगदी नवखे असाल तरीही… खेळाला यापैकी कशाचीच फिकीर नसते. तुम्ही किती आत्मविश्वासात आहात किंवा किती नर्वस आहात, यानेही काही फरक पडत नाही,” असे तिने लिहिले आहे.
Smriti Post
तिने पुढे म्हटले, “खेळाला फक्त एकाच गोष्टीशी देणंघेणं असतं – ती म्हणजे तुम्ही मैदानावर तो सामना कसा खेळता. त्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुम्ही कोणत्या जिद्दीने उतरता, हेच सर्वांत महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही खेळाला पूर्ण आदर देऊन तुमचे सर्वस्व अर्पण केले, तरच यशाची संधी मिळू शकते. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा अनुभवण्याची मिळणारी संधी ही खरोखरच अप्रतिम आहे. मला वाटतं ही एक भयानक (अद्भुत) भावना आहे.”
वेदनेतून कमबॅक
गेल्या काही महिन्यांपासून स्मृती मानधना वैयक्तिक स्तरावर खूप कठीण काळातून गेली आहे. संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी झालेल्या लग्नाच्या नात्यातील ब्रेकअपनंतर तिला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काही काळ ती सर्वांपासून दूर राहिली होती. मात्र, तिने हार मानली नाही. पुन्हा मैदानावर पाऊल ठेवले, सराव सुरू केला आणि महिला प्रीमियर लीगमध्येही ट्रॉफी जिंकली. आता ती पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये परतली आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील तिची खेळी याचा पुरावा आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




