भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. स्मृतीचे संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होते. पण शेवटच्या क्षणी हे लग्न मोडले आहे. आता टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिने ८२ धावांची जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर आता स्मृतीने आपल्या खेळाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. या वेळी ती भावुक झाल्याचे दिसून आले. तिची इंस्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
इंस्टाग्राम स्टोरीत स्मृतीने काय लिहिले?
स्मृतीने आपल्या स्टोरीत खेळाच्या कठोर वास्तवाबद्दल लिहिले आहे. “खेळ कधीच तुमच्या भावनांची कदर करत नाही. हे एक कटू सत्य आहे. तो तुम्ही थकलेला आहात की नाही याची पर्वा करत नाही. तुम्ही थकलेले असाल, नुकतेच जिंकले असाल, सर्वोत्तम खेळाडू असाल किंवा अगदी नवखे असाल तरीही… खेळाला यापैकी कशाचीच फिकीर नसते. तुम्ही किती आत्मविश्वासात आहात किंवा किती नर्वस आहात, यानेही काही फरक पडत नाही,” असे तिने लिहिले आहे.
Smriti Post
तिने पुढे म्हटले, “खेळाला फक्त एकाच गोष्टीशी देणंघेणं असतं – ती म्हणजे तुम्ही मैदानावर तो सामना कसा खेळता. त्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुम्ही कोणत्या जिद्दीने उतरता, हेच सर्वांत महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही खेळाला पूर्ण आदर देऊन तुमचे सर्वस्व अर्पण केले, तरच यशाची संधी मिळू शकते. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा अनुभवण्याची मिळणारी संधी ही खरोखरच अप्रतिम आहे. मला वाटतं ही एक भयानक (अद्भुत) भावना आहे.”
वेदनेतून कमबॅक
गेल्या काही महिन्यांपासून स्मृती मानधना वैयक्तिक स्तरावर खूप कठीण काळातून गेली आहे. संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी झालेल्या लग्नाच्या नात्यातील ब्रेकअपनंतर तिला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काही काळ ती सर्वांपासून दूर राहिली होती. मात्र, तिने हार मानली नाही. पुन्हा मैदानावर पाऊल ठेवले, सराव सुरू केला आणि महिला प्रीमियर लीगमध्येही ट्रॉफी जिंकली. आता ती पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये परतली आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील तिची खेळी याचा पुरावा आहे.
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel


